शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भिवंडीत मंत्री कपिल पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 7:51 PM

Bhiwandi News: भिवंडीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्य सरकारमधील मंत्री कपिल पाटील यांच्यात सल्ला मसलत व आरोप प्रत्यारोपांमधून या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी अधिकच पाहायला मिळाली.  

-नितिन पंडीत भिवंडी - जो विद्यार्थी शाळेच्या बाहेर बसून शिकला त्या विद्यार्थ्याने देशाची राज्यघटना लिहिली हे आमच्यासाठी गौरवाचे असून डॉ बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळेच देशात सर्वश्रेष्ठ अशी लोकशाही नांदत आहे असे गौरवोद्गार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत मनपा मुख्यालयासमोर उभारलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उदघाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शुक्रवारी व्यक्त केले . संविधानामुळेच भारत देश एकसंघ आहे त्यामुळे प्राण गेला तरी बेहत्तर पण संविधान बदलून देणार नाही अशी शपथ घेण्याचा सल्ला मंत्री आव्हाड यांनी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भीम अनुयायांना दिला . त्यानंतर ओबीसी आरक्षणावर बोलतांना मंत्री आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पक्ष बाजूला ठेवून केंद्र सरकारमुळे ओबीसींचे आरक्षण रद्द होत आहे याचा निषेध करण्याचा सल्ला दिला.

त्यांनतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्याच्या मुलाला मिळाली हे माझे भाग्य आहे आणि हीच संविधानाची ताकद आहे. आता इंदू मिलच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा लवकरात लवकर बसवावा अशी विनंती वजा कोपरखळी मंत्री पाटील यांनी मंत्री आव्हाड तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली. तसेच राज्याचे गृहनिर्माण व नगरविकास मंत्र्यांनी ठाणे शहराचा विकास केला मात्र भिवंडी शहराचा विकास अजूनही हवा तास झालेला नाही त्यामुळे शहर विकासात समानता आणून भिवंडीच्याही विकासाकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे असा खोचक सल्ला देखील मंत्री पाटील यांनी यावेळी मंत्री आव्हाड व शिंदे यांना लगावला. त्यांनतर कुठेही काही झाले तरी जो तो उठतो आणि खासदारांवर आरोप करतो अशी खंत मंत्री पाटील या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली. त्यामुळे सल्ला मसलत व आरोप प्रत्यारोपांमधून या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी अधिकच पाहायला मिळाली.  

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलJitendra Awhadजितेंद्र आव्हाडbhiwandiभिवंडी