शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

ठाण्यातील साडेचार हजार इमारतींना क्लस्टरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:54 PM

लाखो रहिवाशांचा जीव टांगणीला : कोरोनामुळे रखडले काम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडीत झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे शहरात आजघडीला चार हजार ५१७ इमारती धोकादायक असून ७९ अतिधोकादायक इमारतींपैकी ४४ इमारतींमध्ये आजही रहिवाशांचे वास्तव्य आहे. यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी क्लस्टर योजना आणली होती. परंतु, हे काम कोरोनामुळे रखडल्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.शहरातील ७९ अतिधोकादायक इमारतींपैकी महापालिका प्रशासनाने केवळ ३५ अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून उर्वरित ४४ इमारतींमध्ये अजूनही रहिवाशांचे वास्तव्य आहे. यात सर्वाधिक धोका हा नौपाडा, कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात असलेल्या इमारतींना असून ३८ पैकी केवळ १४ इमारतीच रिकाम्या केल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शहरात पावसाचा जोर कायम असून पडझडीच्या घटनादेखील सुरू आहेत. त्यामुळे या ४४ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न भिवंडी शहरात झालेल्या इमातर दुर्घटनेनंतर उपस्थित करण्यात येत आहे. यंदा केलेल्या सर्वेक्षणामध्ये महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यांमधील सुमारे चार हजार ५१७ धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सी-२ ए मध्ये १२३ इमारतींचा समावेश आहे. सी -२ बी मध्ये २३२६ आणि सी-३ मध्ये १९८९ इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक शिल्लक इमारतींमध्ये सुमारे १५० पेक्षा अधिक कुटुंबे जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. भिवंडीसारख्या दुर्घटनेला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून या इमारतींमधील रहिवाशांना खबरदारीची उपाययोजना म्हणून घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पालिकेने बजावलेल्या आहेत. मात्र, कोरोनासह पावसाळ्याच्या दुहेरी संकटामुळे अनेक रहिवाशांनी त्या रिक्त करण्यास नकार दिला आहे.

भूमिपूजनानंतर किसननगरची स्थिती जैसे थेविधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करून क्लस्टर योजनेला मंजुरी मिळाल्याचे सांगून ४४ यूआरपीपैकी सहा यूआरपीचे काम सुरू करण्याचा दावा केला होता. यामध्ये किसननगर, हाजुरी, कोपरी, लोकमान्यनगर आणि राबोडी यांचा समावेश होता.त्यानुसार, किसननगरच्या क्लस्टरचे भूमिपूजनही केले होते. परंतु, त्यानंतर आजही एक वीटही येथे लागलेली नाही. त्यातच कोरोनामुळे हे कामही लांबणीवर पडले.आता सहा महिन्यांनंतर या सहा यूआरपीमध्ये सर्व्हेचे काम सुरूकेल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता सर्व्हे झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होणार आहे. याचाच अर्थ ही योजना मार्गी लागण्यास अवधी जाणार आहे.