शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 12:09 AM

‘आमा’ची नाराजी : आनंदनगर एमआयडीसीतील चित्र

अंबरनाथ : येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र अनेक वर्षांपासून धूळखात आहे. हा प्रकल्प सुरू न केल्यास रासायनिक उद्योग अन्य राज्यांत स्थलांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात ‘आमा’ संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.एमआयडीसीमधील कारखानदार पर्यावरणस्नेही पद्धतीने उत्पादन प्रक्रिया करू इच्छित आहेत. मात्र, त्यासाठी आवश्यक असणारे सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) सुरू करण्याबाबत एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ उदासीन असल्याचा आरोप अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आमा) चे अध्यक्ष उमेश तायडे यांनी बुधवारी केला. गेली सात वर्षे संघटनेतर्फे पाठपुरावा करूनही सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झालेले नाही.

या औद्योगिक वसाहतीतील १२७ कंपन्या या केंद्राच्या सभासद आहेत. केंद्र सुरू झाल्यास रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणे सोपे होईल. वैयक्तिकरीत्या अशा प्रकारचे प्रक्रिया केंद्र उभारणे सर्वच उद्योजकांना परवडणारे नाही. प्रत्येक कंपनीने स्वतंत्र अशी यंत्रणा बसवली, तर एक घनमीटर रासायनिक सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ९० ते ११० रुपये खर्च येतो. तीच प्रक्रिया जर सामायिक केंद्रातून झाली, तर एक घनमीटर पाण्यासाठी फक्त २९ रुपये खर्च उद्योजकांना परवडणारा आहे. मात्र, विनंती करूनही केंद्र सुरू करण्याबाबत यंत्रणा उदासीन आहे.नऊ हजार कोटींची होते निर्यातच्उद्योजकांचे प्रतिनिधी म्हणून संघटना हे केंद्र सुरू करण्याबाबत आग्रही आहे. कारण, हे केंद्र सुरू होत नसल्याचा ठपका उद्योजकांवर ठेवला जात आहे. आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधून दरवर्षी नऊ हजार कोटींचा माल निर्यात होतो. त्यातून सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळतो.च्मात्र, गेल्या काही वर्षांत या त्रासाला कंटाळून अनेक उद्योग स्थलांतरित झाले. काही स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे व्यवस्थापन कोणत्याही कंपनीला द्या, परंतु सीईटीपी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी तायडे यांनी केली आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरWaterपाणी