शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी भिवंडीमध्ये निघाला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:13 AM

राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे- कापूरबावडी -भिवंडी - कल्याण या मेट्रो -५ मार्गिकेला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली आहे. मात्र शहरातील राजीव गांधी चौक ते टेमघर नाक्यापर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाने बाधित होणाºया नागरिकांनी मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी शुक्रवारी पालिका कार्यालयावर मोर्चा काढत विरोध केला.

भिवंडी : राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे- कापूरबावडी -भिवंडी - कल्याण या मेट्रो -५ मार्गिकेला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली आहे. मात्र शहरातील राजीव गांधी चौक ते टेमघर नाक्यापर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाने बाधित होणाºया नागरिकांनी मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी शुक्रवारी पालिका कार्यालयावर मोर्चा काढत विरोध केला.आॅक्टोबर २०१६ मध्ये कल्याण खाडीपुलाचे व मोठागाव पुलाचे उद््घाटन करताना केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो रेल्वे - ५ या प्रकल्पाची घोषणा केली. या प्रसंगी खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यानंतर एमएमआरडीएच्या बैठकीत ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो- ५ या मार्गाला मंजुरी देण्यात आली. एकूण २४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च ८ हजार ४१६ कोटी येणार आहे. या बैठकीत मेट्रो - ५ प्रकल्पासह मेट्रो - ६ च्या विस्तारीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प डीपीआरच्या मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवून मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो - ५ मध्ये एकूण १७ स्थानके आहेत. त्या स्थानकातील गोपाळनगर कल्याण नाका ते टेमघर मार्गावरील लोकवस्ती व दुकाने बाधित होत आहेत. त्यांचे प्रथम पुनर्वसन करणे आवश्यक आहे.परंतु या बाधित नागरिकांना निव्वळ नोटीसा बजावून संबंधित अधिकारी बेघर करण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप कल्याण रोड संघर्ष समितीने केला आहे. तसेच या मार्गावरील रेल्वेबाबत महासभेत घेतलेला ठराव रद्द करून या रेल्वेचा मार्ग बदलावा, अशी मागणी बाधितांनी केली आहे. सेनेचे नगरसेवक मदन बुवा नाईक, नासिर सय्यद, शादाब उस्मानी, राम शिगवण आदी सहभागी झाले होते. महापौर जावेद दळवी व पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना निवेदन दिले.

टॅग्स :Metroमेट्रो