शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

केंद्राचा उल्लेख टाळल्याने कपिल पाटील यांनी व्यक्त केली जाहीर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 16:52 IST

ठाण्यात पालकमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री असतांना देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष होणे अयोग्य असून या दोघांनी एकत्र बैठक घेऊन पंतप्रधान आवास योजना मार्गी लावावी अशा सुचना देखील त्यांनी केल्या.

ठाणे:  लॉकडाऊनमुळे स्वत:चे घर काय असते, हे प्रत्येकालाच समजले. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या किंवा भाडेतत्वावर वास्तव्य करणा:यांचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद असल्याचे मत केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले. परंतु म्हाडाच्या या ८ हजार ९८४ घरांपैकी पंतप्रधान आवास योजनेतील ६१८० घरे असतांनाही पंतप्रधानांचा साधा कुठेही उल्लेख नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. या घरांसाठी अनुदान स्वरुपात केंद्राकडून दिड लाख तर राज्याकडून एक लाखांचा निधी दिला गेला आहे. त्यामुळे यात केंद्राचा वाटा निश्चितच मोठा आहे. असे असतांनाही केंद्राचा नाम्मोलेख टाळणो चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

म्हाडाच्या वतीने ८ हजार ९८४ घरांची सोडत गुरुवारी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणोकर नाटय़गृहात काढण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणो म्हणून कपिल पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. परंतु या कार्यक्रमात केंद्राचाही कुठेही साधा उल्लेख करण्यात आला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणात जाहीर नाराजी व्यक्त केली. म्हाडांच्या या एकूण सोडती पैकी घरांमध्ये ६ हजार १८० घरे ही पंतप्रधान आवास योजनेतील आहेत. त्यातील १९०५ घरे तयार असून उर्वरीत घरे लवकरच तयार होणार आहेत. त्यानुसार या घरांसाठी केंद्राकूडन दिड लाखांचे अनुदान देखील दिले जाणार आहे. तसेच राज्याकडून एक लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. परंतु असे असतांनाही पंतप्रधानाचा किंवा केंद्राची कुठेही उल्लेख नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या ठिकाणी कुठेही पंतप्रधान आवास योजना साकार होतांना दिसत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

ठाण्यात पालकमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री असतांना देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष होणो अयोग्य असून या दोघांनी एकत्र बैठक घेऊन पंतप्रधान आवास योजना मार्गी लावावी अशा सुचना देखील त्यांनी केल्या. शिवाय जर या महापालिकांना ही योजना राबविणो शक्य नसल्याच म्हाडाच्या माध्यमातून ही घरे उभारण्यात यावीत यासाठी गृहनिर्माणमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी सुचनाही त्यांनी केली. तसेच बदलापुरमध्ये सुरु असलेल्या अमृत योजनकडेही दुर्लक्ष केले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे देखील २०२२ र्पयत प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न साकार होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सहा हजार घरे पडून आहेत. भविष्यात सिडकोच्या माध्यमातून आणखी ८९ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. परंतु घरी पडून राहत असतील तर निश्चितच हा चिंतेंचा विषय असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे सहा हजार घरांसाठी आता सिडको खाजगी संस्थेची मदत घेणार आहे. परंतु कोंबडा कोणाचाही असो तो आरवला पाहिजे आणि लोकांना घरे उपलब्ध झाली पाहिजे यासाठी पालकमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाthaneठाणे