शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

काजूपाड्याचे वळण ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 05:42 IST

वारंवार घडतात अपघात : रस्ता सरळ करण्याची नागरिकांची मागणी

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर या मुख्य वाहतूक मार्गावरील काजूपाडा येथील रस्ता तीव्र वळणाचा असल्याने तेथे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे येथील हा वळणाचा भाग काढून तो सरळ करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. पश्चिम मुंबईहून ठाणेमार्गे भिवंडी, कसारा, पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी घोडबंदर हा राज्य महामार्ग महत्त्वाचा आहे. हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील आहे. वरसावे वाहतूक जंक्शनपासून पुढे ठाणे महापालिका हद्दीत या महामार्गाचा विस्तार आहे. या महामार्गावरील काजूपाडा येथे तीव्र वळण असून त्याच्या एका बाजूला नागरीवस्ती आहे.

येथील नागरिकांना मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी रस्ता ओलांडून तेथील बसथांब्यावर जावे लागते. तसेच नागरीवस्तीच्या बाजूलाही बसथांबा असून त्याअगोदर सुमारे १० मीटर अंतरावर तीव्र वळण आहे. त्यामुळे भरधाव वेगातील वाहनांचा अंदाज रस्ता ओलांडताना येत नाही. मुंबई दिशेकडील वळण सुमारे १५ ते २० फूट खाली खोल असून त्या बाजूला लोखंडी पट्ट्यांचे कुंपण घालण्यात आले आहे. परंतु, रात्रीच्या वेळी या वळणाचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. महामार्ग असल्याने या मार्गावरील वाहने भरधाव वेगाने येजा करत असतात. तीव्र वळणाचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने त्यांचे वाहनांच्या वेगावरील नियंत्रण सुटून ते खाली कोसळते अथवा ते उलटून अपघात होतो. याच मार्गावरून अनेक अवजड वाहनांची रेलचेल असल्याने त्या वाहनचालकांना या तीव्र वळणावरून वळण घेताना चांगलीच कसरत करावी लागते. त्यातच, वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्यास ते वाहन उलटून अपघात होतो.अपघातांची ही मालिका सतत सुरूच असते. मात्र, त्याकडे एमएसआरडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. काजूपाडा येथील ग्रामस्थांनी अनेकदा विविध सरकारी विभागांकडे संपर्क साधून वळण सरळ किंवा त्याची तीव्रता कमी करण्याची मागणी केली. परंतु, त्याला दाद दिली जात नसल्याने येथे अपघाताची मालिका आजही सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे येथून बोरिवलीकडे जाणाऱ्या एसटीला याच वळणावर अपघात झाला होता. ती काही प्रमाणात एका बाजूला कलंडल्याने सुदैवाने ती उलटली नाही. मंगळवारी रात्रीही याच वळणावर एक ट्रेलर उलटला.काजूपाडा येथील तीव्र वळणाच्या ठिकाणी पथदिवे असूनही ते अनेकदा बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रामुख्याने अवजड वाहनचालकांना वळणाची तीव्रता लक्षात येत नसल्याने वाहने उलटतात. याच ठिकाणाहून स्थानिक येजा करत असल्याने या अपघातात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे येथील तीव्र वळण काढून टाकणे अपघात टाळण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.- राजेंद्र ठाकूर, स्थानिक समाजसेवक

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक