शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

काजूपाड्याचे वळण ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 05:42 IST

वारंवार घडतात अपघात : रस्ता सरळ करण्याची नागरिकांची मागणी

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर या मुख्य वाहतूक मार्गावरील काजूपाडा येथील रस्ता तीव्र वळणाचा असल्याने तेथे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे येथील हा वळणाचा भाग काढून तो सरळ करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. पश्चिम मुंबईहून ठाणेमार्गे भिवंडी, कसारा, पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी घोडबंदर हा राज्य महामार्ग महत्त्वाचा आहे. हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील आहे. वरसावे वाहतूक जंक्शनपासून पुढे ठाणे महापालिका हद्दीत या महामार्गाचा विस्तार आहे. या महामार्गावरील काजूपाडा येथे तीव्र वळण असून त्याच्या एका बाजूला नागरीवस्ती आहे.

येथील नागरिकांना मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी रस्ता ओलांडून तेथील बसथांब्यावर जावे लागते. तसेच नागरीवस्तीच्या बाजूलाही बसथांबा असून त्याअगोदर सुमारे १० मीटर अंतरावर तीव्र वळण आहे. त्यामुळे भरधाव वेगातील वाहनांचा अंदाज रस्ता ओलांडताना येत नाही. मुंबई दिशेकडील वळण सुमारे १५ ते २० फूट खाली खोल असून त्या बाजूला लोखंडी पट्ट्यांचे कुंपण घालण्यात आले आहे. परंतु, रात्रीच्या वेळी या वळणाचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. महामार्ग असल्याने या मार्गावरील वाहने भरधाव वेगाने येजा करत असतात. तीव्र वळणाचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने त्यांचे वाहनांच्या वेगावरील नियंत्रण सुटून ते खाली कोसळते अथवा ते उलटून अपघात होतो. याच मार्गावरून अनेक अवजड वाहनांची रेलचेल असल्याने त्या वाहनचालकांना या तीव्र वळणावरून वळण घेताना चांगलीच कसरत करावी लागते. त्यातच, वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्यास ते वाहन उलटून अपघात होतो.अपघातांची ही मालिका सतत सुरूच असते. मात्र, त्याकडे एमएसआरडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. काजूपाडा येथील ग्रामस्थांनी अनेकदा विविध सरकारी विभागांकडे संपर्क साधून वळण सरळ किंवा त्याची तीव्रता कमी करण्याची मागणी केली. परंतु, त्याला दाद दिली जात नसल्याने येथे अपघाताची मालिका आजही सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे येथून बोरिवलीकडे जाणाऱ्या एसटीला याच वळणावर अपघात झाला होता. ती काही प्रमाणात एका बाजूला कलंडल्याने सुदैवाने ती उलटली नाही. मंगळवारी रात्रीही याच वळणावर एक ट्रेलर उलटला.काजूपाडा येथील तीव्र वळणाच्या ठिकाणी पथदिवे असूनही ते अनेकदा बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रामुख्याने अवजड वाहनचालकांना वळणाची तीव्रता लक्षात येत नसल्याने वाहने उलटतात. याच ठिकाणाहून स्थानिक येजा करत असल्याने या अपघातात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे येथील तीव्र वळण काढून टाकणे अपघात टाळण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.- राजेंद्र ठाकूर, स्थानिक समाजसेवक

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक