शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

नदी प्रदूषणाचा मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 11:39 PM

उल्हास नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या खेमानी नाल्याची पाहणी जातीने करण्याचे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी अचानक खेमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

उल्हासनगर : उल्हास नदीच्याप्रदूषणास कारणीभूत असलेल्या खेमानी नाल्याची पाहणी जातीने करण्याचे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी अचानक खेमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. नदीच्याप्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या कंपन्यांची विस्तृत माहिती सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.उल्हास नदी प्रदुषित करणाºया खेमानी नाल्याचा प्रश्न वारंवार विधानसभेत अनेक आमदारांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नाल्याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल देण्याचे आश्वासन सभागृहाला दिले होते. त्यानुसार कदम यांनी बुधवारी दुपारी अचानक खेमानी व उल्हास नदीची पाहणी केली. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ३६ कोटीच्या निधीतून खेमानी नाल्याचा प्रवाह वळविण्याचे काम महापालिकेने सुरू केले होते. खेमानी नाल्याचे सांडपाणी अडवून विहिरीत आणले जाते. तेथून शांतीनगर येथे पाईपलाईनद्बारे नेवून मलनिस्सारण केंद्रात प्रक्रीया केली जाणार आहे. मात्र मलनिस्सारण केंद्राचे काम पूर्ण न झाल्याने खेमानी नाल्याचे सांडपाणी पम्पिंगद्वारे उल्हास नदी खाडीत सोडले जात आहे. गेल्या ३ वर्षांपासून खेमानी नाला योजनेचे काम संथगतीने सुरू असून, यासाठी ठेकेदारावर दंडात्मक कारवाईही केली आहे.महापालिका आयुक्तांसह स्थानिक शिवसेना पदाधिकाºयांनाही त्यांच्या दौºयाची पूर्वकल्पना नसल्याने, ते गैरहजर होते. त्यांच्यासोबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार, उल्हासनगर पालिकेचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन, बी. एस. पाटील यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.अंबरनाथमधील प्रदूषित नाल्याचीही पाहणीअंबरनाथमधून वाहणाºया वालधुनी नदीला प्रदुषित करणाºया एमआयडीसी भागातील नाल्याचीही पाहणी रामदास कदम यांनी केली. ते कल्याण येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असता, त्यांनी अंबरनाथ फॉरेस्ट नाका येथील एमआयडीसी भागातील नाल्याची पाहणी केली. या भागातील सर्व नाले थेट वालधुनी नदीला जोडले गेले असल्याने नदी प्रदुषित झाली आहे.गेल्या महिनाभरापासून अंबरनाथ शहरातील प्रदुषणाचा मुद्दा हा गाजत आहे. डम्पिंगमुळे आधीच पालिका प्रशासन त्रस्त असताना, आता वालधुनी नदीच्या प्रदुषणाचा मुद्दादेखील समोर आला आहे. एमआयडीसी भागातील सर्व सांडपाण्यावर एमआयडीसीमध्येच प्रक्रिया करण्याची अट असतानादेखील अनेक कारखानदार थेट नाल्यातच प्रदुषित पाणी सोडत आहेत.यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रारदेखील करण्यात आली होती. यापार्श्वभूमिवर कदम यांनी अंबरनाथ शहरातील प्रदुषणाची माहिती घेतली. वालधुनीपाठोपाठ ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाºया उल्हास नदीच्या प्रदुषणाचीदेखील त्यांनी दखल घेतली. उल्हास नदीत सांडपाणी सोडले जात असल्याने नदीच्या संवर्धनाबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी पर्यावरण मंत्र्याकडे करण्यात आली होती.प्रशासनाची उडाली झोपवालधुनी आणि उल्हासनदीमधील प्रदुषणाच्या मुद्यावर कदम यांनी अचानक अंबरनाथ आणि उल्हासनगरचा दौरा आयोजित केला. त्यांच्या ऐनवेळच्या दौºयाने प्रशासनाची झोप उडाली. कदम येणार असल्याने पालिकेचा ताफा या ठिकाणी हजर होता. कदम यांनी आधी नाल्याची आणि नंतर डम्पिंगची पाहणी केली. डम्पिंगवर सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्याधिकारी देविदास पवार यांनी कदम यांना दिली. अंबरनाथचा दौरा आटोपून कदम लगेचच उल्हासनगमध्ये प्रदुषणाचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले.वालधुनी नदीचा अहवाल मागितलाशहरातील जीन्स कारखाने बंद झाल्यावरही वालधुनी नदीचे प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढले आहे. वालधुनी नदीमध्ये कोणत्या नाल्यामुळे प्रदूषण होते, याची इत्थंभूत माहिती पुढील आठवड्यात देण्याचे आदेश पालिका आयुक्त अच्यूत हांगे यांनी महापालिकेचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांना दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणRamdas Kadamरामदास कदम