शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाडमधील ग्रामीण भागात २८ दिवसांत बांधले ३० वनराई बंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 02:00 IST

मुरबाड तालुक्याथील पेंढारी आणि वाघाची वाडी या आदिवासी गावाने ही किमया केली आहे. २८ दिवसात ग्रामस्थांनी ३० वनराई बंधारे उभारले आहेत.

- पंकज पाटीलमुरबाड : मुरबाडमधील ग्रामीण भागात जानेवारी फेब्रुवारीनंतर गावे ओस पडण्याचे प्रमाण वाढते. शेती आणि इतर व्यवसाय नसल्याने अनेक गावे रोजगारासाठी जुन्नरच्या दिशेने जातात. मात्र हे स्थलांतर रोखण्यात आदिवासी बांधवांना यश आले आहे. ग्रामस्थांनी गावातून वाहणाऱ्या ओढ्यावर वनराई बंधारे उभारुन गाव पाणीदार केले आहे. त्यामुळे आता गावातच शेती आणि त्याच्याशी निगडीत व्यवसाय सुरू झाला आहे. त्यामुळे गावातील स्थलांतराचे प्रमाणही थांबले आहे. मुरबाड तालुक्याथील पेंढारी आणि वाघाची वाडी या आदिवासी गावाने ही किमया केली आहे. २८ दिवसात ग्रामस्थांनी ३० वनराई बंधारे उभारले आहेत.जलसंधारणाची साधी, सोपी सूत्रे अंमलात आणून मुरबाड तालुक्यातील पेंढरी आणि वाघाची वाडीतील ग्रामस्थांनी गावावरील टंचाईचा कलंक धुवून टाकला आहे. गेली तीन वर्षे टप्याटप्याने या दोन गावांमध्ये लहान मोठे जलसंधारणाचे उपक्र म राबवले जात असून यंदा २८ दिवसात तब्बल ३० वनराई बंधारे बांधून अवघा परिसर जलमय केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे यंदा सुमारे शंभर ते सव्वाशे एकर जागा ओलिताखाली आली आहे. परिणामी एकेकाळी शुष्क, कोरड्या, असणाºया या प्रदेशात आता जागोजागी पाण्याचे पाट आणि त्यामुळे राखली गेलेली हिरविगार शेती हेच या बंधाऱ्यांचे यश आहे. वसुंधरा संजीवनी मंडळ या संस्थेच्या वतीने गेली तीन वर्षे पेंढरी, वाघाची वाडी परिसरात लोक सहभाग आणि ‘सीएसआर’ योजनेतून उपलब्ध झालेल्या निधीद्वारे जलसंधारणाचे प्रकल्प उभारले जात आहेत. वनराई बंधाºयांमुळे एरवी जानेवारी महिन्यात कोरडया होणाºया ओढया नाल्यांमध्ये सध्या पाच ते सहा फूट इतके पाणी आहे.त्यामुळे या परिसरातील भेंडी उत्पादकांना फायदा झाला आहे. पावसाळयानंतर या भागातून वाहणाºया कनकविरा नदीच्याजवळचे शेतकरी भेंडीची लागवड करतात. पूर्वी या शेतकºयांना डिसेंबर आणि जानेवारी असे दोनच महिने भेंडीचे पीक घेता येत होते. गेल्या दोन वर्षांपासून अगदी एप्रिल ते मे महिन्यापर्यंत नदीच्या पात्रात पाणी टिकते. जलसंधारणामुळे हे साध्य झाले आहे.स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून सुरू असलेल्या या कामांची दखल घेऊन गेली दोन वर्षे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासन ग्रामस्थांना मदत करू लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा परिसरातील गाव तलावांमधील गाळ उपसला जाणार आहे. काँक्रि टच्या बंधाºयांमुळे कनकविरा नदीला जीवदान मिळाले असून त्यामुळे परिसरातील शेतकºयांना त्याचा लाभ झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही जलसंधारणाच्या या मोहिमेत उत्साहाने सहभागी झाले आहेत. त्यांचा हा सहभागच या भागाला पाणीदार करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.पूर्वी आम्ही पावसाळयानंतर मजुरीसाठी आळेफाटयाला जात होतो. तीनशे रूपये मजुरी मिळायची. प्रवास खर्च आणि जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ पाहता हे अजिबात परवडणारे नव्हते. आता पाणी उपलब्ध असल्याने गावातच शेतीची कामे मिळू लागली आहेत.- गीता पारधी, पेंढरीवर्षानुवर्षे आमचे गाव टंचाईग्रस्त गावांच्या यादीत होते. वसुंधरा संजीवनी मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीमुळे आम्ही सर्व ग्रामस्थांनी आता पाणीटंचाई हद्दपार केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसाठी प्रगतीचे मार्ग खुले झाले आहेत.- गणेश पारधी, सरपंच, पेंढरी.

टॅग्स :murbadमुरबाडDamधरणWaterपाणी