शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
5
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
6
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
7
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
8
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
9
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
10
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
11
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
12
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
13
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
14
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
15
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
16
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
17
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
18
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
19
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
20
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!

मुरबाडमधील ग्रामीण भागात २८ दिवसांत बांधले ३० वनराई बंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 02:00 IST

मुरबाड तालुक्याथील पेंढारी आणि वाघाची वाडी या आदिवासी गावाने ही किमया केली आहे. २८ दिवसात ग्रामस्थांनी ३० वनराई बंधारे उभारले आहेत.

- पंकज पाटीलमुरबाड : मुरबाडमधील ग्रामीण भागात जानेवारी फेब्रुवारीनंतर गावे ओस पडण्याचे प्रमाण वाढते. शेती आणि इतर व्यवसाय नसल्याने अनेक गावे रोजगारासाठी जुन्नरच्या दिशेने जातात. मात्र हे स्थलांतर रोखण्यात आदिवासी बांधवांना यश आले आहे. ग्रामस्थांनी गावातून वाहणाऱ्या ओढ्यावर वनराई बंधारे उभारुन गाव पाणीदार केले आहे. त्यामुळे आता गावातच शेती आणि त्याच्याशी निगडीत व्यवसाय सुरू झाला आहे. त्यामुळे गावातील स्थलांतराचे प्रमाणही थांबले आहे. मुरबाड तालुक्याथील पेंढारी आणि वाघाची वाडी या आदिवासी गावाने ही किमया केली आहे. २८ दिवसात ग्रामस्थांनी ३० वनराई बंधारे उभारले आहेत.जलसंधारणाची साधी, सोपी सूत्रे अंमलात आणून मुरबाड तालुक्यातील पेंढरी आणि वाघाची वाडीतील ग्रामस्थांनी गावावरील टंचाईचा कलंक धुवून टाकला आहे. गेली तीन वर्षे टप्याटप्याने या दोन गावांमध्ये लहान मोठे जलसंधारणाचे उपक्र म राबवले जात असून यंदा २८ दिवसात तब्बल ३० वनराई बंधारे बांधून अवघा परिसर जलमय केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे यंदा सुमारे शंभर ते सव्वाशे एकर जागा ओलिताखाली आली आहे. परिणामी एकेकाळी शुष्क, कोरड्या, असणाºया या प्रदेशात आता जागोजागी पाण्याचे पाट आणि त्यामुळे राखली गेलेली हिरविगार शेती हेच या बंधाऱ्यांचे यश आहे. वसुंधरा संजीवनी मंडळ या संस्थेच्या वतीने गेली तीन वर्षे पेंढरी, वाघाची वाडी परिसरात लोक सहभाग आणि ‘सीएसआर’ योजनेतून उपलब्ध झालेल्या निधीद्वारे जलसंधारणाचे प्रकल्प उभारले जात आहेत. वनराई बंधाºयांमुळे एरवी जानेवारी महिन्यात कोरडया होणाºया ओढया नाल्यांमध्ये सध्या पाच ते सहा फूट इतके पाणी आहे.त्यामुळे या परिसरातील भेंडी उत्पादकांना फायदा झाला आहे. पावसाळयानंतर या भागातून वाहणाºया कनकविरा नदीच्याजवळचे शेतकरी भेंडीची लागवड करतात. पूर्वी या शेतकºयांना डिसेंबर आणि जानेवारी असे दोनच महिने भेंडीचे पीक घेता येत होते. गेल्या दोन वर्षांपासून अगदी एप्रिल ते मे महिन्यापर्यंत नदीच्या पात्रात पाणी टिकते. जलसंधारणामुळे हे साध्य झाले आहे.स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून सुरू असलेल्या या कामांची दखल घेऊन गेली दोन वर्षे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासन ग्रामस्थांना मदत करू लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा परिसरातील गाव तलावांमधील गाळ उपसला जाणार आहे. काँक्रि टच्या बंधाºयांमुळे कनकविरा नदीला जीवदान मिळाले असून त्यामुळे परिसरातील शेतकºयांना त्याचा लाभ झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही जलसंधारणाच्या या मोहिमेत उत्साहाने सहभागी झाले आहेत. त्यांचा हा सहभागच या भागाला पाणीदार करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.पूर्वी आम्ही पावसाळयानंतर मजुरीसाठी आळेफाटयाला जात होतो. तीनशे रूपये मजुरी मिळायची. प्रवास खर्च आणि जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ पाहता हे अजिबात परवडणारे नव्हते. आता पाणी उपलब्ध असल्याने गावातच शेतीची कामे मिळू लागली आहेत.- गीता पारधी, पेंढरीवर्षानुवर्षे आमचे गाव टंचाईग्रस्त गावांच्या यादीत होते. वसुंधरा संजीवनी मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीमुळे आम्ही सर्व ग्रामस्थांनी आता पाणीटंचाई हद्दपार केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसाठी प्रगतीचे मार्ग खुले झाले आहेत.- गणेश पारधी, सरपंच, पेंढरी.

टॅग्स :murbadमुरबाडDamधरणWaterपाणी