शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा?; राष्ट्रवादीच्या सत्तेला 55 नगरसेवक लावणार सुरुंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 10:22 AM

नवी मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी 56 नगरसेवकांची गरज आहे.

नवी मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांचा भाजपा प्रवेश अखेर 9 सप्टेंबरला पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश नाईकभाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत. मात्र तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता धोक्यात आली आहे. 

गणेश नाईक यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे 55 नगरसेवक आणि अपक्ष 2 नगरसेवक असा एक वेगळा गट आज कोकण भवन कार्यालयात जाऊन नोंदणी करणार आहे. नवी मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी 56 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे नाईक समर्थक नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात येईल आणि नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल. 

काही दिवसांपूर्वी संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देत माजी महापौर सागर नाईक यांच्यासह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. पण गणेश नाईक व त्यांचे ज्येष्ठ पुत्र संजीव नाईक यांनी भाजपप्रवेशाबाबत मौन बाळगल्याने कार्यकर्त्यांत चलबिचल सुरू झाली होती. यातच शनिवारी नेरुळ येथील कार्यकर्ता मेळाव्याला आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भाजपच्या वाटेवर असलेल्या संजीव नाईक यांनी सपत्नीक स्वागत केले. कार्यक्रमानंतर तासभर त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे संजीव नाईक राष्ट्रवादीतच राहणार अशा आशयाच्या चर्चेला उधाण आले; परंतु आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला होता. मागील पाच वर्षांपासूनच नाईकांनी राष्ट्रवादीला खड्ड्यांत घालण्याचे कारस्थान रचले असल्याचा थेट आरोपच त्यांनी केला. गणेश नाईक यांचा पूर्वीपासून ठाण्यासह कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर तसेच ग्रामीण भागात वरचष्मा आहे. त्यामुळे आता त्याचा फायदा त्यांना भाजपामध्ये गेल्यानंतर होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचे काम ते यानिमित्ताने करतील, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

टॅग्स :BJPभाजपाGanesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे