शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

भाजपाच्या ठिय्या आंदोलनातून दिवावासीयांचा पाणीटंचाईवर संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 3:40 PM

Water scarcity in diva : दिवा परिसरात अनेक महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, त्याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

ठाणे - दिवा परिसरातील तीव्र पाणीटंचाईबाबत नागरिकांचा संताप भाजपाच्या आंदोलनातून उघड झाला. आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची महापालिका प्रशासनाने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. दिवा परिसरात अनेक महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, त्याकडे महापालिकेकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे दाद मागण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती. अखेर भाजपातर्फे आज दिव्यात हंडा-कळशी मोर्चा काढण्यात आला होता. 

आंदोलनात दोन आमदारांचा सहभाग होता. मात्र, मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. त्यावेळी संतप्त होऊन भाजपाचे कार्यकर्ते व नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. महापालिकेला सामान्य नागरिकांविषयी आस्था नसल्याचेच उघड होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. अखेर या आंदोलनाची दखल आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतली. मात्र, ते मुंबईत सुनावणीमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना दिव्यात निवेदन स्वीकारण्यासाठी पाठविले. तसेच दिव्यातील पाणीटंचाईबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील, दिवा मंडल अध्यक्ष आदेश भगत, विजय भोईर, विनोद भगत, अशोक पाटील, रोहिदास मुंडे, गणेश भगत, दिवा महिला अध्यक्ष अर्चना पाटील, सुप्रिया भगत, रेश्मा पवार, संगीता भोईर, सीमा भगत,आदी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणेwater scarcityपाणी टंचाई