शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

भार्इंदर पालिका : कार्यशाळेला दोघेच नगरसेवक, ९३ जणांनी फिरवली पाठ, अधिकारी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 1:03 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने २०१८ मध्ये केंद्राकडून पुन्हा स्वच्छ भारत अभियानातंर्गत मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी नगरसेवकांसाठी कार्यशाळा ठेवली होती.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने २०१८ मध्ये केंद्राकडून पुन्हा स्वच्छ भारत अभियानातंर्गत मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी नगरसेवकांसाठी कार्यशाळा ठेवली होती. याला भाजपाचे केवळ दोन नगरसेवक सोडल्यास ९३ नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने प्रशासनाला ही कार्यशाळाच गुंडाळावी लागली.या कार्यशाळेत नगरसेवकांना प्रभागातील नागरिकांना जागरूक करण्याचे प्रशिक्षण अधिकाºयांकडून देण्यात येणार होते. स्वच्छतेबाबत प्रश्नावली तयार केली आहे. त्यात स्वच्छ सर्वेक्षणात शहराने सहभाग घेतल्याची माहिती लोकप्रतिनिधींसह नागरिकांना आहे का, सध्या शहर स्वच्छ आहे का, कचराकुंड्यांचा वापर तसेच कचरा वर्गीकरणाबाबतचे समाधान, शहर हगणदारीमुक्त झाले आहे का आदी प्रश्न नमूद केले आहेत. त्याची उत्तरे थेट लोकप्रतिनिधींसह नागरिकांना द्यावी लागणार आहेत.तत्पूर्वी या प्रश्नांद्वारे अद्यापही शहरातील अस्वच्छतेबाबत काही सूचना असल्यास त्या प्रशासनाकडे द्याव्यात, या हेतूने आरोग्य विभागाने नगरसेवकांची कार्यशाळा घेतली होती. परंतु, कार्यशाळेला ९५ पैकी भाजपाचे नगरसेवक सुरेश खंडेलवाल व राकेश शहा या दोन नगरसेवकांनीच हजेरी लावली. उर्वरित ९३ नगरसेवकांनी पाठ फिरवली. यामुळे माहिती पुस्तिका व नाष्ताचा खर्च वाया गेला.११ वाजता सुरू झालेल्या या कार्यशाळेत उपस्थिती वाढेल या उद्देशाने उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी तब्बल दोन तास वाट पाहिली.नगरसेवकांची उदासीनताउपस्थित नगरसेवकांनी पालिकेच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली तर पालिका अधिकारी व कर्मचाºयांनीही नगरसेवकांच्या स्वच्छतेप्रती असलेल्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक