शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव क्षमतेचे प्रकल्प उभारणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 02:34 IST

नगरविकास खाते घालणार मनमानीला वेसण : मुख्याधिकारी, आयुक्तच राहणार जबाबदार

नारायण जाधवठाणे : केंद्र आणि राज्य शासनाकडून राज्यातील सर्वच नगरपालिका आणि महापालिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध प्रकल्पांसाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी, अनुदान मिळत आहे. मात्र. या निधीचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्याने राज्य नगरविकास खात्याने या मनमानीला वेसण घालण्याचे ठरवले आहे.

राज्यकर्ते प्रशासनाला हाताशी धरून नको तिथे वाढीव क्षमतेचे मलप्रक्रिया प्रकल्प उभारून त्यानुसारच मलवाहिन्या टाकतात किंवा पाणीपुरवठा प्रकल्प उभारतात. तसेच प्रकल्पांसाठी लागणाºया जागा ताब्यात नसतानाही डीपीआर तयार करून दरवर्षी शासनाच्या निधींची उधळण करत असल्याने हा निर्णय घेतला आहे. यापुढे अशी कामे केल्यास त्यास नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच महापालिकांच्या आयुक्तांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

वाट्टेल त्या कामांचे डीपीआर नकोकेंद्र आणि राज्य शासनाकडून दरवर्षी मिळणारे कोट्यवधींचे अनुदान खर्च करण्यासाठी राज्यातील सर्वच नगरपालिका आणि महापालिका या नको त्या कामांचे डीपीआर तयार करत आहेत. अशा प्रकारचे डीपीआर तयार करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतो. विशेष म्हणजे यातील अनेक प्रकल्पांची शहराला काहीही गरज नसते. तसेच अनेक प्रकल्पांसाठी लागणारा निधी खर्च करण्याची, तसेच त्यांच्यासाठी लागणाºया जागाही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात नसतात, ही गंभीर बाब विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्याही निदर्शनास आली आहे.

या समितीच्या सूचनांनुसारच आता असे अनावश्यक डीपीआर तयार करण्यास नगरविकास खात्याने नगरपालिका आणि पालिकांना मनाई केली आहे. यापुढे डीपीआर तयार करताना त्या प्रकल्पांची खरोखरच गरज आहे का, त्यासाठीची जागा ताब्यात आहे का तसेच संबंधित संस्थेकडे तो प्रकल्प उभा करण्याची तांत्रिक व वित्तीय क्षमता आहेत का, या बाबी विचारात घ्याव्यात, असे बजावले असून तसे नसल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी, आयुक्तांचीच राहणार आहे.

केंद्राच्या निकषांचे पालन करावेराज्यातील अनेक शहरांत अलीकडच्या काळात शहराची विद्यमान व भविष्यातील लोकसंख्या विचारात न घेता नगरपालिका, महापालिकांसह मोठ्या प्रमाणात वाढीव क्षमतेचे मलप्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. यात शासनाने ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा जास्त निधी खर्च होत असल्याने तो वाया जात आहे. शिवाय, जास्त क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प उभारून त्याप्रमाणात मलवाहिन्या टाकल्याने त्यांचे नियोजन कोलमडून जात आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर यपुढे प्रत्येक नगरपालिका आणि महापालिकेने त्यांचे मलप्रक्रिया अन् पाणीपुरवठा प्रकल्प राबवताना केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि सार्वजनिक अभियांत्रिकी संघटनेने आखून दिलेल्या निकषांनुसारच या प्रकल्पांचे डीपीआर तयार करून त्यानुसारच कामे करावीत, असे नगरविकासने बजावले आहे.

कॅगच्या ताशेऱ्यानंतर जागराज्य आणि केंद्र शासनाच्या निधीतून जो प्रकल्प उभा आहे, त्याचा त्याचा वापर होऊन जनतेला तो लाभदायक ठरतो किंवा नाही. शासनाच्या निधीतून उभ्या केलेल्या प्रकल्पांच्या मालमत्ता पडून तर नाहीत ना, शासनाने केलेली गुंतवणूक वाया तर जाणार नाही ना, याची पूर्ण जबाबदारी आता मुख्याधिकाºयासह आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. कॅगने याबाबत ताशेरे ओढल्यानंतर नगरविकासने हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार