शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

डोंबिवलीतील वायुप्रदूषण; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 1:28 AM

नागरिकांनी १० दिवसांत मागितले उत्तर

- अनिकेत घमंडी डोंबिवली : एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे काही दिवसांपासून त्रस्त असलेल्या पूर्वेतील खंबाळपाड्यातील भोईरवाडी भागातील काही नागरिकांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबईतील संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पोस्टाद्वारे बुधवारी अधिकाऱ्यांना ही नोटीस मिळाली असून, अधिकारी त्याला काय उत्तर देतात, याकडे डोंबिवली अ‍ॅक्शन कमिटी फॉर सिव्हिक अ‍ॅण्ड सोशल होप्स (दक्ष) समितीच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

खंबाळपाडा परिसरात एका बाजूला निवासी इमारती तर, त्यासमोरच्या बाजूला एमआयडीसीतील कारखाने आहेत. तेथील रासायनिक कारखान्यांमुळे वायुप्रदूषण होत असल्याने खंबाळपाडा, ठाकुर्ली व एमआयडीसी परिसरातील गावठाणांमधील रहिवासी त्रस्त आहेत. हे प्रदूषण एमआयडीसीतील काही रासायनिक कंपन्यामुळेच होत असल्याचे तेथील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले होते. तसेच वारंवार ई-मेल करून काही ठोस मागण्या ठेवल्या होत्या, परंतु सकारात्मक पावले उचलली गेल्याचे दिसत नाही. अनेकदा पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास रसायनांचा प्रचंड दर्प आल्याने श्वसनाचा त्रास झाल्याच्या तक्रारी खंबाळपाड्यातील रहिवाशांनी केल्या आहेत.

वायुप्रदूषण रोखण्यात केडीएमसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी या यंत्रणा हतबल ठरल्या आहेत. या यंत्रणांचे अधिकारी एकमेकांना दोष देताना दिसतात. पण, जबाबदारी कोणीही घेत नाही. प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी ही सर्वस्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. प्रदूषणकारी कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. पण, आतापर्यंत केवळ टोलवाटोलवी करण्यात येत असल्याने कायदेशीर पाऊल उचलण्याचा निर्णय नागरिकांच्या दक्ष समितीने घेतला.

वायुप्रदूषणप्रकरणी जाब विचारण्यासाठी खंबाळपाड्यातील काही नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाºयांना अखेर कायदेशीर नोटीस पाठविली आहे. नोटिशीत नजीकच्या काळातील सर्व घटनांचा उल्लेख आहे. नागरिकांच्या मागण्यांसंदर्भात कोणती पावले उचलली, याबाबत अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट सादर करण्यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांना १० दिवसांची मुदत दिली आहे.

प्रसंगी न्यायालयात दाद मागणार

प्रदूषणाविरोधात सुरू असलेला हा लढा केवळ खंबाळपाडा भागापुरता मर्यादित नाही. तो सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटिशीला उत्तर देण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. त्यावर उत्तर आल्यास त्याची माहिती १५ फेब्रुवारीला सर्वांना कळवली जाईल. मात्र, मंडळाने उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत उच्च न्यायालयाकडे दाद मागण्यात येईल, असे दक्ष समितीचे सदस्य व तक्रारदार अक्षय फाटक यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्रMIDCएमआयडीसीenvironmentपर्यावरणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार