शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

भिवंडीत भात उत्पादक शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 9:36 PM

सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली प्रमाणेच मुंबईत देखील आंदोलन छेडण्याचा इशारा भात उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली प्रमाणेच मुंबईत देखील आंदोलन छेडण्याचा इशारा भात उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. २८ ) भिवंडीतील दुगाड फाटा केंद्रावर भात उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी भात खरेदी केंद्रावर आंदोलन केलं आहे. या आंदोलना दरम्यान भात खरेदीतील ऑनलाईन पद्धत बंद करून हेक्‍टरी ३७ क्विंटल पर्यंत भात खरेदी करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आलीय. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली प्रमाणेच मुंबईत देखील आंदोलन छेडण्याचा इशारा भात उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

देशभर सध्या शेतकरी आंदोलन तापले असतांनाच भिवंडीतील दुगाड फाटा येथे असलेल्या भात खरेदी केंद्रावर प्रति हेक्टर १५ क्विंटल भात खरेदी करण्यात येत असल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात विक्रीसाठी या खरेदीकेंद्रावर आणला होता. यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रापर्यंत भाताची मालवाहतूकीसाठी ट्रान्सपोर्ट व इतर खर्च मोठ्या प्रमाणात उचलला असूनही या खरेदी केंद्रावर फक्त प्रति हेक्टरी १५ क्विंटल भाताची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी किमान ३७ क्विंटल प्रति हेक्टरी भात खरेदी करावी अशी विनंती केली मात्र त्यास खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून नकार दिल्याने अखेर भात उत्पादक शेतकऱ्यांनी या खरेदीकेंद्राची खरेदी विक्री प्रक्रिया बंद करून या ठिकाणी आंदोलन केले. यावेळी भात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी शासनाने लागू केलेली ऑनलाइन पद्धत देखील रद्द करावी अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांनी केली. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा अशी मागणी ठाणे जिल्हा शेतकरी संघर्ष संघटनेने या आंदोलना दरम्यान केली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी