शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मृत्यूनंतर तरी यंत्रणेत पारदर्शकता येईल

By admin | Updated: October 12, 2015 05:21 IST

बांधकाम व्यावसायिकांना एकाच प्रकल्पासाठी ७० ते ८० ठिकाणी परवानग्यांसाठी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात.

ठाणे : बांधकाम व्यावसायिकांना एकाच प्रकल्पासाठी ७० ते ८० ठिकाणी परवानग्यांसाठी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. बांधकाम व्यावसायिकांचे क्षेत्र आणि शासकीय यंत्रणा यांच्यात पारदर्शकता आली पाहिजे. आपल्या मृत्यूनंतर तरी यंत्रणेत काही सुधारणा होतील आणि पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत नेते आणि अधिकाऱ्यांबद्दलची प्रचंड उद्विग्नता कॉसमॉसचे मालक सूरज परमार यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत व्यक्त केली आहे.कै. सूरज यांनी लिहिलेली सुमारे २५ पानांची नोट कासारवडवली पोलिसांना घटनास्थळावर मिळाली आहे. या चिठ्ठीत त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना नेते, पालिका अधिकारी, तसेच शासकीय यंत्रणेतील अधिकारी कसे अडथळे आणून त्रास देतात, याबाबतचा उल्लेख आहे. बिल्डर म्हणजे एकप्रकारे ‘बळीचा बकरा’ असल्याचे सर्वच यंत्रणांकडून ठरविले गेले आहे. हा बिल्डरांबद्दलचा दृष्टिकोन शासकीय यंत्रणांनी बदलला पाहिजे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे एक चांगले अधिकारी आहेत, पण इतरांचे काय? राजकीय नेते आणि पालिकेतील अधिकाऱ्यांच्या ‘डिमांड’ वाढल्या. त्या मला पूर्ण करायच्या नव्हत्या. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला, असेही या पत्रात म्हटले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. त्यांनी काही नेत्यांची नावेही लिहिली आहेत. ती खोडून यांचा कुटुंबीयांना त्रास होऊ शकतो, म्हणून ती डिलीट करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पत्रातील उल्लेखाप्रमाणे त्यांना नेमकी कोणत्या अधिकाऱ्याकडून अडवणूक केली जात होती का? कोणत्या नेत्याने त्यांचे काम केल्यानंतर त्यांच्या डिमांड वाढल्या. ठाणे महापालिकेत त्यांचा कोणता प्रकल्प कशासाठी रखडला? त्यासाठी त्यांनी कोणाकडे चर्चा केली? त्यात काय अनियमितता आहे? याचबरोबर त्यांच्या लॅपटॉपमधील ई-मेल्स आणि मोबाइल कॉल्स, तसेच मेसेजेसमधील तपशिलाचीही चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांनी दिली. परमार प्रकरणामुळे गोल्डन गँग धास्तावली! ठाणे : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी प्रसंगी आपल्यावर कारवाई होऊ शकते, अशी चिन्हे दिसू लागल्यामुळे ठाणे महापालिकेतील सर्वपक्षीय ‘गोल्डन गँग’ आता धास्तावली आहे. विशेष म्हणजे या गँगमध्ये कोण आहेत, त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची ‘सेटिंग’ची कामे केली जातात, हे उघड गुपित असले, तरी त्याबद्दल उघड आणि अधिकृतपणे कोणीही बोलायला तयार नाही. परमार यांनी आत्महत्येपूर्वी जी सुमारे २५ पानांची ‘नोट’ लिहून ठेवली आहे, त्यातही खाडाखोड असल्यामुळे ती नावे कोणती आहेत, ती नावे खोडण्यामागचे कारणही आपल्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना कोणी त्रास देऊ नये, असे असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. त्यांनी ज्या अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे, त्यामध्ये या कथित ‘गोल्डन गँग’मधील नेत्यांच्या नावांचा उल्लेख आहे, परंतु त्यातही खाडाखोड असल्यामुळे ‘त्या’ नावांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. मग इतके चर्चेत असूनही चारचौघांमध्ये आपण त्यातले नसल्याचा आव आणत फिरणारी ही नेते मंडळी कोण आहेत, त्यांनी नेमक्या कोणाच्या आणि काय ‘सेटिंग’ केल्या, याची आता पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे एखादा प्रस्ताव महासभेत चर्चेला आला, तर तो मंजूर करायचा की नाही, त्याचा पाठपुरावा करायचा की नाही की, त्यात खोडा आणायचा, याबाबतचे निर्णय याच गँगमधून पुढे येतात. अर्थात, टक्केवारी ठरली की, हाच विरोध किंवा अडथळा बासनात गुंडाळला जातो.परमार यांच्या ‘कॉसमॉस’ या प्रकल्पाची कामे कोणत्या ठिकाणी अडली होती, तिथे त्यांना पालिकेच्या कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जात होता, त्यांच्याकडे कोणी खंडणीची मागणी केली होती का, त्यांच्याकडे ‘सेटिंग’साठी कोणी चर्चा केली होती का? अशा सर्वच बाजूंनी कासारवडवली पोलिसांकडून चौकशी केली जात असल्यामुळे ठाण्यातील या कथित ‘गोल्डन गँग’मध्येही धास्तीचे वातावरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)