शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

लोकमत इम्पॅक्ट! आवाजाच्या मर्यादेचा भंग करणाऱ्या गरबा आयोजकांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 9:58 PM

लोकमतच्या बातमीनंतर पोलिसांकडून आयोजकांना कारवाईचा इशारा

मीरारोड - मीरारोडमध्ये रात्री ११ नंतरही सर्रास गरब्याचा दणदणाट सुरु असल्याचे वृत्त लोकमतने देताच पोलिसांनी नवरात्रोत्सव मंडळांची बैठक घेऊन रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वा वाद्यवृंद सुरु असेल तर गुन्हा दाखल करु असा इशारा दिला आहे. पोलिसांनी कारवाईसाठी विशेष पथक सुध्दा नेमले आहे. यामुळे रात्री उशीरापर्यंत कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाला लगाम घालून पोलीस सामान्य नागरिकांना दिलासा देतील अशी आशा व्यक्त होत आहे. मीरा भार्इंदरमध्ये राजकारण्यांसह अनेक मंडळांनी आणि गृहसंकुलांनी नवरात्र निमित्त गरबा - दांडियाचे आयोजन केले आहे. राजकारण्यांकडून तर गरबा उशीरापर्यंत सुरु ठेवण्यात मोठेपणा मिरवला जात आहे. ध्वनी प्रदुषणाच्या कायद्यासह उच्च न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवण्याचे काम मीरारोड आणि भाईंदरमध्ये अगदी बिनदिक्कतपणे सुरू आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुलं यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. तर विद्यार्थी व नोकरदार वर्गालादेखील नाहक जाच सहन करावा लागत आहे. रात्री १० पर्यंत ध्वनीक्षेपकास परवानगी असताना देखील रात्री ११ तर काही भागात चक्क रात्री १२ पर्यंत सर्रास ध्वनीक्षेपक व वाद्यवृंद वाजवले जाते. पोलिसांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष करत आयोजकांना ११ वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करण्याची अलिखीत परवानगीच दिल्याची चर्चा होती. त्यामुळेच पोलिसांकडून कारवाई होत नव्हती. लोकमतच्या शनिवारच्या हॅलो ठाणेमध्ये या बाबतचे वृत्त येताच वरिष्ठ स्तरावरुन हालचाली सुरु झाल्या. पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना दिले. सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीदेखील सर्व आयोजकांना पाचारण करुन रात्री १० नंतर आवाज केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.  

टॅग्स :garbaगरबाNavratriनवरात्रीMira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस