शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१९५ गावांसह ५७२ आदिवासी पाड्यांत पाणी समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 23:53 IST

ठाणे जिल्ह्याची परिस्थिती; उपाययोजनेसाठी साडेसात कोटींचा खर्च; विहिरी खोल करणार, नवीन विंधण विहिरी खोदणार

- सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील १९५ गावे आणि ५७२ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांंमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणून ठाणे जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर हालचाली करून सात कोटी ४२ लाख रूपये खर्चाचे नियोजन केले आहे. या निधीतून विहिरी खोल करण्यासह टँकर - बैलगाडीने पाणी पुरवठा, नळपाणी पुरवठ्याची दुरूस्ती, पुरक योजना, नवीन विंधन विहिरी तयार करणे आदी कामे हाती घेण्याचे नियोजन आहे.‘ग्रामीण भागात टंचाईच्या झळा तीव्र’, या मथळ्याखाली लोकमतने ८ जानेवारी रोजी वृत्त प्रसिध्द करून जिल्हा परिषदेचे लक्ष वेधले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्वरित हालचाली करून सात कोटी ४२ लाखांच्या खर्चाचे नियोजन केले. या निधीतून पाणी टंचाईवर मात केली जाईल. महापालिकांसह औद्योगिक क्षेत्राच्या पाणी कपातीपेक्षाही जिल्ह्णातील ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागात पाणी टंचाईच्या झळा तीव्र आहेत.शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामीण, दुर्गम भागात धरणांचे जाळे पसरले आहे. मात्र त्यापासून जवळच्या गावखेड्यांना सर्वच पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीमुळे वर्षानुवर्षे पाणी टंचाई सोसावी लागते आहे. दरवर्षी कोट्यवधी खर्च होऊनही उन्हाळ्यात पाणी समस्या उद्भवते. प्रशासनाच्या निष्काळजीमुळे भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहातील पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या नाही. या अर्धवट योजनांच्या गावातील पाणी टंचाईवरील उपाययोजनेसाठी साधी बोरवेलही घेता येत नसल्याची खंतही लोाकप्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी १२१ मोठे गावे आणि ३२७ पाड्यांनी पाणी समस्येला तोंड दिले. यंदा ही १९५ गावे आणि ५७२ पाडे पाणी टंचाईच्या चक्रव्युहात अडकले आहेत.टंचाई भेडसावणाºया गांवपाड्यांपैकी ८८ गावे अािण २३० पाड्यांना एक कोटी ३५ लाख रूपये खर्चून टँकर किंवा बैलगाडीने यंदा पाणी पुरवठा होईल. जेथे वाहन जाणे शक्य नाही, तेथे बैलगाडीने पाणी पुरवठा होईल. या नियोजनात शहापूर तालुक्यातील सर्वाधिक ६५ गावे, १८३ पाड्यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एक कोटी पाच लाखांच्या खर्चाची तरतूद झाली आहे. या खालोखाल मुरबाड तालुक्यात १८ गावे व ३३ पाड्यांना टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा होईल. त्यावर २१ लाख ७६ हजार रूपये खर्च होतील. यानंतर भिवंडीला तीन गावे सहा पाडे आणि अंबरनाथला दोन गावे आठ पाड्यांना टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा होईल.योजनांची दुरूस्ती- नवीन बोरवेलविहिरी खोल करण्यासाठी १८लाखांची तरतूद केली आहे. यातून शहापूरच्या ३० गावांसह ६३ पाड्यांच्या विहिरी खोल होतील. नळपाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी दोन कोटी २२ लाखांची तरतूद आहे. यातून शहापूरचे सहा गावे, सहा पाड्यांसाठीह एक कोटी ५४ लाखांच्या खर्चा नियोजन आहे.मुरबाडमधील पाच गावे आणि एक पाड्यासाठी ५८ लाखांचा खर्च होणार आहे. चार गावे आणि दोन पाड्यांना पुरक पाणी पुरवठा योजना होईल. त्यासाठी एक कोटी ६८ लाखांचे नियोजन केले. नवीन विंधन विहिरीसाठी एक कोटी ९८ लाखांचा खर्च निश्चित केला.त्यातून ६२ गावे आणि २३९ पाड्यांना विंधन विहिरी (बोरवेल) तयार होणार आहे. यापैकी सर्वाधिक मुरबाड तालुक्यामधील २० गावे ४४ पाड्यांना ३८ लाख ४० हजारांचे नियोजन असून, शहापूरच्या १८ गावांसह ५० पाड्यांवर ४० लाख ८० हजार रूपये खर्च होईल.टंचाईग्रस्त गावे, पाड्यांवरील खर्चाचे नियोजनतालुका        गावे      पाडे        निधीची तरतूदअंबरनाथ      १२        ४४            ४१ लाखकल्याण        १०        ३६         १ कोटी १६ लाखभिवंडी         ०९        ११०        ६९ लाख ८४ हजारमुरबाड        ४३         ७९         १ कोटी ३३ लाखशहापूर       १२१       ३०३         ३ कोटी ८२ लाख

टॅग्स :water shortageपाणीटंचाईthaneठाणे