शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही; ठाण्यातून ३८ तर कल्याणमधून १२ बस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:11 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सार्वजनिक वाहतुकीला ब्रेक लागला होता.

ठाणे : शासनाने एसटी वाहतूक सेवा सुरू केल्यानंतर आता शिवशाहीदेखील रस्त्यावर धावणार आहेत. त्यानुसार ठाणे, बोरिवली, कल्याण येथून बोरिवली, मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर आणि अलिबाग या मार्गांवर वातानुकूलित शिवशाहीची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ठाणे-१ आगारातून २२, ठाणे-२ आगारातून १६, तर कल्याण आगारातून १२ बस धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. यामुळे या मार्गांवरील प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सार्वजनिक वाहतुकीला ब्रेक लागला होता. त्याचा परिणाम खासगी व शासकीय क्षेत्रातील प्रवासी वाहतूक व्यवस्थेला बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा फटकादेखील बसला आहे. त्यात एसटी महामंडळालादेखील आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असून कामगारांचे वेतनदेखील थकीत राहिले होते. त्यात टाळेबंदीत शिथिलता आणून आर्थिकचक्र गतिमान करण्यासाठी विविध व्यवसायांना व वाहतुकीला शासनाने परवानगी दिली. यात आता वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून उपरोक्त मार्गांवर शिवशाही धावणार आहे. 

टॅग्स :state transportएसटी