शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

मच्छीमारीसाठी गेलेल्या २५६ बोटी किनाऱ्याला लागण्याची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:50 AM

सातपाटी, एडवन, डहाणू , वसईच्या बंदरात ३३४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. मात्र १७८ बोटींची वाट पाहिली जात आहे.

-  सुरेश लोखंडे

ठाणे : मच्छीमारीसाठीठाणे- पालघर जिल्ह्यातील बंदरांतून ८१७ बोटी गेल्या असता आतापर्यंत ५६१ बोटीं बंदरात परत आलेल्या आहेत. मात्र अध्याप २५६ बोटी अजून किनार्याला लागलेल्या नसल्याने त्यांची प्रतिक्षा करण्यात येत आहे. अरबी समुद्रातील 'तौकते' चक्रीवादळाच्या दृष्टीने समुद्रातील या बोटींबाबत चिंता वाढली आहे. यामध्ये ठाणे उत्तन बंदरातील ७८ बोटींसह पालघरच्या सातपाटी, डहाणू आणि वसई बंदरातील १८७ बोटी समुद्रातून आलेल्या नसल्याने चिंता वाढली आहे.  ठाणेच्या उत्तन बदरातून ३०५ बोटी समुद्रात गेलेल्या असता २२७ परत आलेल्या आहेत. सातपाटी, एडवन, डहाणू , वसईच्या बंदरात ३३४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. मात्र १७८ बोटींची वाट पाहिली जात आहे.

अरबी समुद्रातील 'तौत्के' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी समुद्र किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवण्यात आली आहे. विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्यासाठी सतर्क दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सुमुद्र व खाडी किनारा, उत्तन बंदर विशेषतः पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील किनार पट्टीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनास आपत्ती नियंत्र  ‌व मदत कार्य कक्ष सतर्क आहे. 

मनुष्यबळ, आवश्यक साधन सामुग्री तयार ठेवण्यासाठी तजवीस ठाणे, पालघरमध्ये होत आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून पूर्वतयारी हाती घेतली जात आहे. आजपासून १७ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर चक्रीवादळ  गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे. त्यापासून ठाणे, पालघर जिल्ह्यास फारसा फटका बसणार नसला तरी सावधानता बाळगली जात आहे. समुद्रात गेलेल्या बोटींना किनार्यावर लागण्यासाठी, बंदरात येण्यासाठी मच्छीमार्यांना आवाहन करण्यात येत आहे.      

मच्छीमारीसाठी उत्तन बंदरातून गेलेल्या ३०५ बोटींपैकी २२७ बोटी बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ७८ बोटींची वाट पाहिली जात आहे. पालघरघ्या डहाणू बंदरातून गेलेल्या ७७ बोटींपैकी ७१ बंदरात आल्या आहेत. उर्वरित सहा बोटी समुद्रात आहे.सातपाटी बंदराच्या ३४ पैकी केवळ आठ बोटी परतल्या आहेत. तब्बल २६ बोटी समुद्रात आहे. याशिवाय वसई बदरातून ४०१ बोटी मच्छीमारीसाठी गेलेल्या आहेत.यातून २५५ बोटी बंदरात आल्या आहेत. उर्वरित १४६ बोटी समुद्रात आहेत.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळमहाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. १५ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

अरबी समुद्रात तयार झालेल्या तौत्के चक्रीवादळाने आता मोठ्या प्रमाणात वेग पकडल्याची माहिती हवामान खात्यानं सांगितली आहे. तसेच हे चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे.  

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळthaneठाणेFishermanमच्छीमार