शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

भातसा धरणाच्या मजबूतीकरणासाठी २०० कोटींचा निधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 17:35 IST

Bhatsa Dam : भातसा धरणाच्या या बळकटीकरणाच्या कामामुळे धरणाची पाण्याची गळती थांबणार असून पुढील काळात धरणाची गळती पुर्णत रोखण्यात जलसंपदा विभागाला यश येणार आहे, असा दावा अभियंत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देसरकारने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने भातसा धरणास हा निधी मंजूर केल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात येत आहे.

- रविंद्र सोनावळे

शेणवा : मुंबई व ठाणे महानगरांना पाणी पुरवठा करणा-या शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या मजबूतीकरणासाठी व धरणक्षेत्रातील अन्य अवश्य असलेल्या विकास कामांसाठी राज्य सरकारने २०० कोटी ६६ लाख रुपयांचा भरीव असा निधी मंजूर केला आहे. भातसा धरणाच्या या बळकटीकरणाच्या कामामुळे धरणाची पाण्याची गळती थांबणार असून पुढील काळात धरणाची गळती पुर्णत रोखण्यात जलसंपदा विभागाला यश येणार आहे असा दावा अभियंत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

सरकारने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने भातसा धरणास हा निधी मंजूर केल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वपूर्ण मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील महत्वाच्या धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने निविदा प्रक्रीयेस मान्यता दिली आहे. यांत मुंबई व ठाणे या प्रमुख शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या कामांचा देखील समावेश असून धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा-२ व ३ या धरण प्रकल्पातील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. 

सरकारच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिलेल्या या निधीपैकी पहिल्या टप्यात भातसा धरणासाठी ११४ कोटी रुपयांची कामे हाती घेतली जाणार असून विशेष म्हणजे ही कामे अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केली जाणार आहेत.यामध्ये भातसा धरणाच्या उर्ध्व व अधो बाजूकडील (रँकिंग) सांधे भरणे, या महत्वपूर्ण कामाचा समावेश आहे. या कामांमुळे धरणाची गळती रोखण्यास मदत होईल.

धरणावरील मॅकनिकल उपकरणाची तसेच धरण मुख्य गेट, अंतर्गत लिफ्ट या (यंत्रसामग्रीची)डागडुजी करणे ,व धरणावरील विद्युत प्रणालीचे देखभाल व दुरुस्तीकरण करणे, धरण माथ्यावर जाणारे पोचरस्ते तयार करणे,प्रामुख्याने अशी महत्वाची कामे या मंजूर निधीतून केली जाणार आहेत अशी माहिती भातसा धरणाचे सहाय्यक अभियंता श्याम हंबीर, व गणेश कचरे  यांनी बोलताना दिली.  

धरण परिसरातील अन्य कामांसाठी दुसऱ्या टप्यात ८६ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीत उर्वरीत प्रस्तावित व आवश्यक कामे हाती घेतली जाणार आहेत असे भातसा धरणाच्या सहाय्यक अभियंत्यांनकडून सांगण्यात येत आहे. धरणांच्या सुरक्षिततेमध्ये सुधारणा करताना त्यांचे बळकटीकरण, व्यवस्थापन करणे, धरणांचे परिचालन व देखभाल यामध्ये सातत्य राखणे हा महत्वाचा उद्देश जलसंपदा विभागाचा आहे असे सांगितले जात आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करण्याची भातसावर महत्वाची जबाबदारी आहे.प्रतिदीन २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९  मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्ष घनमीटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चोरस किलोमिटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तीर कालवा ६७ किलोमिटर मधून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. तर डावा कालव्याचे काम अपूर्ण आहे.भातसा धरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राव्दारे १५ मेगावॅट एवढी विजनिर्मिती केली जाते .

भातसा धरणाची गळती रोखण्याचे प्रयत्न यापूर्वी भातसा धरणाच्या मुख्य धरण बांधातून छिद्रांद्वारे पाण्याची होणारी गळती रोखण्यासाठी मोजणी क्रमांक १ डी ते मो. क्र. ११ व मो. क्र. १२ अ ते मो. क्र. २५ ब तसेच तपासणी गॅलरी आणि उच्चस्तर गॅलरी मधील छिद्रांचे ड्रिलींग व सिमेंट ग्राऊटींगचे कामे करण्यात आली यासाठी जलसंपदा विभागाने २६ कोटी रुपये खर्च करुन धरणाची गळती काही अंशी थांबविण्यासाठीचे प्रयत्न केले गेले आहेत. 

या ग्राऊटींगच्या कामामुळे ९८ हजार प्रतिमिनीट असणारी गळती ६० हजार प्रतीमिटर इतकी कमी झाली आहे.असे सांगितले जाते परंतु अद्यापही धरणातून पाण्याची गळती सूरु असल्याने ही गळती थांबविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन धरणाच्या मजबूतीकरणाची कामे अत्यावश्यक आहेत, असे भातसा धरणाच्या जलसंपदा विभागातील अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेDamधरण