शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

१ मे पासून ठाण्यात आंबा महोत्सव, गावदेवी मैदानात ५५ स्टॉल्स मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 4:12 PM

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील गावदेवी मैदानात आंबा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात आंबा आणि आंब्याच्या पदार्थांचे ५५ स्टॉल्स मांडण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे १ मे पासून ठाण्यात आंबा महोत्सवगावदेवी मैदानात ५५ स्टॉल्स मांडणार  १० मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार

ठाणे : महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव गावदेवी मैदान येथे १ मेपासून सुरू होत आहे. यंदाचे या महोत्सवाचे १३ वे वर्ष आहे अशी माहिती संस्कारचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.    १० मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. १ मे रोजी सायं. ४.३० वा. या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कोकणातील बागायतदारांचे सेंद्रीय पद्धतीचे आंबे या महोत्सवात असणार आहे. आंबे व आंब्यांचे इतर पदार्थांचे ५५ स्टॉल्स मांडण्यात येणार आहे. यात कृषी विद्यापीठाचा वेगळा स्टॉल देखील असणार आहे. कोकणताली आंबा उत्पादक शेतकरी वेळोवेळी अडचणीत असतो. परंतू हा शेतकरी सर्व संकटावर मात करुन आंब्याची शेती करतो, या वर्षी ४० टक्के आंब्याचे उत्पादन झाले आहे अशी माहिती आ. केळकर यांनी दिली. या महोत्सवात २ व ३ मे रोजी मृणाल कुलकर्णी आणि निमिर्ती सावंत भेट देणार आहेत. कोकणातील १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड होते. २०१५ साली ३ लाख २० हजार मेट्रीक टन, २०१६ साली २ लाख ५६ हजार मेट्रीक टन तर २०१७ साली १ लाख २८ हजार मेट्रीक टन उत्पन्न झाले अशी खंत व्यक्त करत आंबा उत्पादन घटतंय याला हवामानातील बदल कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. गेल्यावर्षी या महोत्सवात एक कोटीच्यावर उलाढाल झाली होती. २०१६ ला हाच आकडा दीड कोटी होता असे आ. केळकर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMangoआंबाMarketबाजार