शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

डायघर डम्पिंगवर होणार १३ मेगावॅट वीजनिर्मिती; मुख्यमंत्री करणार भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 01:58 IST

दोन हजार रोजगारनिर्मिती

ठाणे : कचऱ्याच्या विल्हेवाटीवरून स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे महाननगरपालिकेची घसरण झाली असताना, ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मार्च २०२१ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. यातून रोज १३ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या ठिकाणी स्थानिक दोन हजार नागरिकांना रोजगार निर्माण होणार असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

ठाणे शहरात सुमारे ९६३ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यामध्ये ५१५ मेट्रिक टन ओला कचरा, ४४१ मेट्रिक टन सुका आणि १२५ मेट्रिक टन सीएनडी वेस्ट (डेब्रिज) चा समावेश आहे. त्यानुसार, सीएनडी वेस्टचा प्रकल्प सुरूझाला. पनवेल, भिवंडी आदी महापालिकांनीदेखील यासाठी ठामपाकडे संपर्क साधला आहे. परंतु, ठामपा स्थापन झाल्यापासून डम्पिंगचा प्रश्न सुटलेला नाही.

१२ वर्षांपूर्वी डायघर येथे पालिकेने कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु, स्थानिकांचा विरोध झाल्याने तो अर्ध्यावरच गुंडाळावा लागला. त्यानंतर, कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न पुढे आला. त्यानुसार कधी गायमुख, कधी खर्डी, कधी वागळे असा प्रवास करीत सध्या दिवा भागात कचरा टाकला जात आहे.

आता शीळ येथील वनविभागाची जागाही पालिकेच्या ताब्यात असून तीवर कचरा टाकण्यास वनविभागाने हिरवा कंदील दिला आहे. या ठिकाणी १०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. यावर तोडगा निघावा म्हणून पालिकेने तळोजा येथील सामूहिक भरावभूमीमध्येही सहभाग घेण्याचे निश्चित केले होते.

परंतु, एमएमआरडीएकडून आलेले दर आणि पालिकेने दिलेले दर यावरून ठामपाने या प्रकल्पातून माघार घेतली होती. त्यानंतर पुन्हा शहरात कचºयाचा प्रश्न डोके वर काढू लागल्याने महापालिकेने पुन्हा या योजनेत सहभागी होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु,आता ही योजनाच बारगळल्याने पालिकेला कचरा टाकायचा कुठे, असा पेचपडला आहे.

स्थानिकांचा विरोध मावळला

स्थानिकांचा विरोध मावळला असून त्यानुसार आता येथे आजूबाजूला वृक्षलागवड आणि इतर कामे सुरूकेली आहेत. तसेच संरक्षक भिंतीचेही काम पूर्ण झाले आहे. एकूणच प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होणार असून ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन, त्यानंतर प्रत्यक्षात प्रकल्पउभारणीला लवकरच सुरुवात होईल, अशी आशा महापालिकेने व्यक्त केली आहे.

दुर्गंधी टाळण्यासाठी निगेटिव्ह प्रेशर प्रणाली

पालिकेने दीड वर्षांपूर्वी डायघर येथे कचºयावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी बंदिस्त पद्धतीने कचºयावर प्रक्रिया केली जाणार असून त्याची दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून निगेटिव्ह प्रेशर प्रणालीचा वापर करण्याबरोबरच कचºयापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प खाजगी कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.

येथे रोज १३ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यानुसार, एका कंपनीला काम देण्यात आले असून त्यांच्याकडूनदेखील वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. १८ महिन्यांत हा प्रकल्प उभारायचा असून त्यातील सुमारे आठ महिने विविध प्रक्रिया आणि संमंती मिळविण्यात गेले आहेत. त्यानंतर, आता वर्ष उलटत आले आहे. असे असले तरी आता खºया अर्थाने येथील प्रकल्प मार्गी लागले, असा दावा पालिकेने केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेelectricityवीजthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र