शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

डायघर डम्पिंगवर होणार १३ मेगावॅट वीजनिर्मिती; मुख्यमंत्री करणार भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 01:58 IST

दोन हजार रोजगारनिर्मिती

ठाणे : कचऱ्याच्या विल्हेवाटीवरून स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे महाननगरपालिकेची घसरण झाली असताना, ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मार्च २०२१ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. यातून रोज १३ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या ठिकाणी स्थानिक दोन हजार नागरिकांना रोजगार निर्माण होणार असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

ठाणे शहरात सुमारे ९६३ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यामध्ये ५१५ मेट्रिक टन ओला कचरा, ४४१ मेट्रिक टन सुका आणि १२५ मेट्रिक टन सीएनडी वेस्ट (डेब्रिज) चा समावेश आहे. त्यानुसार, सीएनडी वेस्टचा प्रकल्प सुरूझाला. पनवेल, भिवंडी आदी महापालिकांनीदेखील यासाठी ठामपाकडे संपर्क साधला आहे. परंतु, ठामपा स्थापन झाल्यापासून डम्पिंगचा प्रश्न सुटलेला नाही.

१२ वर्षांपूर्वी डायघर येथे पालिकेने कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु, स्थानिकांचा विरोध झाल्याने तो अर्ध्यावरच गुंडाळावा लागला. त्यानंतर, कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न पुढे आला. त्यानुसार कधी गायमुख, कधी खर्डी, कधी वागळे असा प्रवास करीत सध्या दिवा भागात कचरा टाकला जात आहे.

आता शीळ येथील वनविभागाची जागाही पालिकेच्या ताब्यात असून तीवर कचरा टाकण्यास वनविभागाने हिरवा कंदील दिला आहे. या ठिकाणी १०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. यावर तोडगा निघावा म्हणून पालिकेने तळोजा येथील सामूहिक भरावभूमीमध्येही सहभाग घेण्याचे निश्चित केले होते.

परंतु, एमएमआरडीएकडून आलेले दर आणि पालिकेने दिलेले दर यावरून ठामपाने या प्रकल्पातून माघार घेतली होती. त्यानंतर पुन्हा शहरात कचºयाचा प्रश्न डोके वर काढू लागल्याने महापालिकेने पुन्हा या योजनेत सहभागी होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु,आता ही योजनाच बारगळल्याने पालिकेला कचरा टाकायचा कुठे, असा पेचपडला आहे.

स्थानिकांचा विरोध मावळला

स्थानिकांचा विरोध मावळला असून त्यानुसार आता येथे आजूबाजूला वृक्षलागवड आणि इतर कामे सुरूकेली आहेत. तसेच संरक्षक भिंतीचेही काम पूर्ण झाले आहे. एकूणच प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होणार असून ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन, त्यानंतर प्रत्यक्षात प्रकल्पउभारणीला लवकरच सुरुवात होईल, अशी आशा महापालिकेने व्यक्त केली आहे.

दुर्गंधी टाळण्यासाठी निगेटिव्ह प्रेशर प्रणाली

पालिकेने दीड वर्षांपूर्वी डायघर येथे कचºयावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी बंदिस्त पद्धतीने कचºयावर प्रक्रिया केली जाणार असून त्याची दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून निगेटिव्ह प्रेशर प्रणालीचा वापर करण्याबरोबरच कचºयापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प खाजगी कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.

येथे रोज १३ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यानुसार, एका कंपनीला काम देण्यात आले असून त्यांच्याकडूनदेखील वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. १८ महिन्यांत हा प्रकल्प उभारायचा असून त्यातील सुमारे आठ महिने विविध प्रक्रिया आणि संमंती मिळविण्यात गेले आहेत. त्यानंतर, आता वर्ष उलटत आले आहे. असे असले तरी आता खºया अर्थाने येथील प्रकल्प मार्गी लागले, असा दावा पालिकेने केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेelectricityवीजthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र