शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

टेकटॉक : गुगल, फेसबुक मुकाट्याने पैसे टाका!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 8:40 AM

जगाच्या एका टोकावरची बातमी अवघ्या काही सेकंदांत आणि एका माऊसच्या क्लिकवरती जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचू लागली आहे.

- प्रसाद ताम्हणकर

गेल्या काही वर्षांत टेक कंपन्यांनी मानवी आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान बनवले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲपसारख्या माध्यमातून जगभरातील अब्जावधी लोक एकमेकांशी जोडले तर गेलेच; पण संपूर्ण जगाचेच एका लहानशा खेड्यात रूपांतर झाले आहे. जगाच्या एका टोकावरची बातमी अवघ्या काही सेकंदांत आणि एका माऊसच्या क्लिकवरती जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचू लागली आहे. जुने मित्र शोधणे असो, स्वत:चे विचार, भावना सहजतेने व्यक्त करणे असो वा स्वत:च्या एखाद्या छोट्या-मोठ्या व्यवसायाची जाहिरात करणे असो; टेक कंपन्यांनी सर्वांसाठी एक वेगळे विश्व मोकळे करून दिले आहे. 

मात्र हे चित्र कितीही सुखदायक दिसत असले, तरी ह्या टेक कंपन्यांची मुजोरी, ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीशी त्यांनी चालवलेले खेळ, कोणत्याही देशाच्या कायद्यांना झुगारण्याची वृत्ती ह्यामुळे ह्या कंपन्या गेल्या काही काळापासून अनेक देशांच्या सरकारच्या रडारावरती आलेल्या आहेत. फेसबुक, ट्विटरसारखी माध्यमे जगभरातील अनेक राजकारणी, सरकारी प्रवक्ते, उद्योजक, अनेक सरकारी संस्था नागरिकांशी संवादासाठी वापरत आहेत. ह्या सर्व सोशल माध्यमांचे महत्त्व वादातीत असले, तरी आता कुठेतरी त्यांच्यावरती लगाम लावणे आवश्यक असल्याचे मत सर्वच प्रमुख देशांतील सरकारांना वाटू लागले आहे. 

ह्या सर्व कंपन्यांवरचा प्रमुख आक्षेप म्हणजे, गुगल, फेसबुक, ॲमेझॉनसारख्या दिग्गज टेक कंपन्या जगभरातील अनेक देशांमध्ये व्यवसायाच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवत आहेत; मात्र त्या त्या देशाला ह्या नफ्यातील काही हिस्सा देण्यास मात्र  ठामपणे नकार देत असतात. जगातील काही प्रमुख देशांत ह्यासंदर्भात विविध टेक कंपन्यांवरती खटले चालू आहेत. 

ह्याचेच पुढचे पाऊल म्हणजे ‘जी-७’ ह्या प्रमुख विकसित देशांच्या संघटनेने, आता आपापल्या देशात ह्या टेक कंपन्यांवरती १५% कर आकारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतानेही ह्या कंपन्यांभोवती नियम आणि अटींचे फास आवळण्यास सुरुवात केलेली आहेच. ‘कंपनी राज’ची सुरुवात पुन्हा सुरू होणे कोणत्याही देशाच्या लोकशाहीसाठी किती घातक आहे, हे आता ह्या प्रमुख देशांच्या लक्षात येऊ लागले आहे, हे महत्त्वाचे. 

(prasad.tamhankar@gmail.com)

टॅग्स :googleगुगलFacebookफेसबुक