या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान

By संतोष कनमुसे | Updated: October 11, 2025 18:35 IST2025-10-11T18:34:24+5:302025-10-11T18:35:28+5:30

भारतीय आयटी टेक इंडस्ट्रीजमध्ये काही दिवसांपासून नोकरी कपात सुरू आहे. एआयचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे.

50 thousand jobs in the IT industry are at risk! Jobs will go slowly; This is the plan of tech companies | या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान

या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान

सध्या जगभरात एआयमुळे मोठी क्रांती झाली आहे. अनेकांनी आपल्या दररोजच्या कामात एआयचा वापर सुरू केलाय. टेक कंपन्यांमध्ये एआयमुळे मोठा फरक पडलाय. भारतीय टेक इंडस्ट्रीमध्येही एआयमुळे मोठा बदल झाला. अनेक कंपन्यांमध्ये नोकऱ्या कमी होत असल्याचे दिसतंय.

२०२५ च्या अखेरीस ५०,००० हून अधिक लोक त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात, असं बोललं जात आहे. या वर्षी अनेक कंपन्यांनी आधीच मोठ्या प्रमाणात टाळेबंदी लागू केली आहे आणि काही कंपन्या अजूनही करत आहेत. या निर्णयामुळे टेक कंपन्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही

एका अहवालामध्ये आयटी तज्ञाने त्यांचा अनुभव सांगितला आहे. "एक दिवस एचआरने मला फोन केला आणि मला सांगितले की माझी आता गरज नाही. त्यांनी मला सांगितले की हा माझा शेवटचा दिवस आहे आणि मी लगेच निघू शकतो. त्यांनी सांगितले की हा कामगिरीशी संबंधित मुद्दा आहे आणि मला तीन महिन्यांचा पगार देऊन काढून टाकण्यात आले." त्याचप्रमाणे, काही कंपन्या ही प्रक्रिया हळू पद्धतीने करत आहेत. व्यवस्थापन छुप्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे.

टीसीएसने जुलैमध्ये मार्च २०२६ पर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २% किंवा अंदाजे १२,००० लोकांना काढून टाकणार असल्याची घोषणा केली. फक्त TCSच नाही तर अनेक मोठ्या आणि लहान टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना शांतपणे राजीनामा देण्यास किंवा इतर नोकऱ्या शोधण्यास सांगत आहेत. २०२३ ते २०२४ दरम्यान अंदाजे २५,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाईल आणि या वर्षी ही संख्या दुप्पट होऊ शकते.

छुप्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची कपात सध्या भारतीय आयटी आणि तंत्रज्ञान उद्योगासाठी एक मोठा धोका निर्माण करत आहे. अंदाजानुसार, वर्षाच्या अखेरीस ५०,००० नोकऱ्या जाऊ शकतात.

कंपन्या एआयचा वापर वाढवत आहेत

कंपन्या एआयचा वापर वाढवत आहेत. म्हणूनच कंपन्या अतिरिक्त कर्मचारी कमी करत आहेत. एआय अनेक कामे करत आहे. यामुळे मानवी कर्मचार्‍यांची गरज कमी होत आहे. टीसीएस आणि एक्सेंचरने एकत्रितपणे जागतिक स्तरावर २३,००० हून अधिक नोकऱ्या कमी केल्या आहेत. एक्सेंचरने ८६५ मिलियन डॉलर्सच्या खर्च कपात योजनेचा भाग म्हणून जून ते ऑगस्ट दरम्यान ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

Web Title : उद्योग में एआई के कारण 50,000 नौकरियाँ खतरे में!

Web Summary : एआई उन्नति से 2025 तक भारतीय तकनीकी उद्योग में 50,000 नौकरियाँ खतरे में हैं। कंपनियाँ चुपचाप कार्यबल को कम कर रही हैं, कार्यों के लिए एआई का उपयोग कर रही हैं, जिससे छंटनी हो रही है। टीसीएस और एक्सेंचर ने इस बदलाव के कारण विश्व स्तर पर हजारों नौकरियाँ कम कर दी हैं।

Web Title : 50,000 jobs at risk in industry due to AI adoption.

Web Summary : AI advancements threaten 50,000 jobs in the Indian tech industry by 2025. Companies are quietly reducing workforce, using AI for tasks, leading to silent layoffs. TCS and Accenture have already cut thousands of jobs globally due to this shift.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.