शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

अरे व्वा... रेल्वेत मोबाईल चोरीला गेला तर, टीसीच दाखल करून घेणार गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 7:01 PM

प्रवाशांचा प्रवास खंडित नाही होणार; लोहमार्ग अन् रेल्वे सुरक्षा बल करणार मदत

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : रेल्वेत मोबाईल चोरीला गेला, बॅग विसरली किंवा अन्य वस्तूंची चोरी अथवा गुन्हा घडल्यास प्रवाशांना आता प्रवास खंडित करून पोलीस ठाणे गाठण्याची गरज नाही. कारण आता रेल्वेत असणारे तिकीट तपासणी अधिकारी (टीसी)च गुन्हा दाखल करून घेणार आहेत. याकामी लोहमार्ग पोलीस अन् रेल्वे सुरक्षा बलाचे जवान मोठी मदत करणार आहेत.

पोलिसांकडे दररोज मोबाईल चोरीच्या असंख्य तक्रारी दाखल होतात. मोबाईल चोर हे सामान्यपणे महिला व ज्येष्ठ नागरिकांना आपली शिकार बनवतात. कारण त्यांच्याकडून प्रतिकाराची शक्यता कमी असते. मोबाईल चोरी होण्याचा धोका टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांना विविध उपक्रम, जनजागृती, प्रचार, प्रसाराव्दारे जागृत करण्याचे काम केले जाते. दरम्यान, प्रवाशांचा मोबाईल किंवा अन्य वस्तू चाेरीला अथवा आणखीन काही गुन्हे घडल्यास प्रवास खंडित न करता रेल्वेतच तिकीट तपासणी अधिकारी गुन्हा दाखल करतील अन् तो रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करतील असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

-------------

प्रवाशांना अशी देता येईल तक्रार...

जर एखाद्या प्रवाशाचा मोबाईल हरवला, चोरीला गेला, बॅग हरवली अथवा अन्य काही तक्रार किंवा गुन्हा घडल्यास संबंधित रेल्वेतील तिकीट तपासणी अधिकारी (टीसी) यांच्याकडून टीटीई (TTE) फॉर्म घेऊन तो भरून द्यावा. तिकीट तपासणी अधिकारी तो फॉर्म संबंधित रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडे देतील. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गुन्हा दाखल करून तो लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करतील. लोहमार्ग पोलीस त्या घटनेचा शोध करून तपास पूर्ण करतील.

----------

प्रवाशांनो मदतीसाठी १८२ वर संपर्क करा...

रेल्वे प्रवासात चोरी, दरोडा अन्य घटना घडल्यास प्रवाशाने त्वरित १८२ या रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करावा. संपर्कानंतर तत्काळ संबंधित रेल्वे एक्सप्रेसमधील रेल्वेचे पोलीस प्रवाशांच्या मदतीसाठी येतील. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती घेऊन शक्य तेवढी मदत प्रवाशांना रेल्वे पोलीस करतील.

-------------

देशात कुठेही तक्रार दाखल करता येणार

मोबाईल व अन्य चोरीच्या घटना किंवा इतर गुन्हा घडल्यास संबंधित तिकीट तपासणी निरीक्षकाकडे आपली तक्रार नोंदविता येणार आहे. कोणत्याही राज्यातील कोणत्याही रेल्वे प्रवाशाला कुठेही तक्रार दाखल करण्याची ही सुविधा आहे.

---------

प्रवाशांना प्रवास खंडित न करता आपल्या मोबाईल, बॅग व अन्य चोरीच्या घटनांविषयी रेल्वेतील तिकीट तपासणी अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेकदा अडचणी येतात. कोणतीही समस्या असेल तर १८२ या क्रमांकावर संपर्क करा. या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर लगेचच्या स्थानकावर लोहमार्ग किंवा आरपीएफचे जवान प्रवाशांच्या मदतीस येतात.

- अमोल गवळी, पोलीस निरीक्षक, सोलापूर लोहमार्ग पोलीस

 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी