शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

World high blood pressure day; ताणतणाव टाळा, पथ्ये पाळा अन् हृदयरोगाला पळवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:25 PM

जागतिक उच्च रक्तदाब दिन;  वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा मौलिक सल्ला

ठळक मुद्देजगात २००० सालच्या नोंदीनुसार २६ टक्के नागरिक रक्तदाबाने ग्रस्त १४०/९० पेक्षा जास्त रक्तदाब असणे याला हायपर टेन्शन किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असं म्हटलं जातं.रक्तदाब असणाºया रुग्णांनी पुढील बाबी वाचून दक्षता घेणे गरजेचे

विलास जळकोटकर 

सोलापूर : धावपळीच्या जगात ताणतणावाला मूठमाती देऊन नियमित अन् वेळेवर आहार घ्या. दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक सुरळीत ठेवा. उच्च रक्तदाबासारखी भेडसावणारी समस्या यातून आपोआप नाहिशी होईल. कोणत्याही आजाराचा बाऊ न करता त्याच्याशी सलगी करून नियमित औषधोपचार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ताणतणाव आपोआप टळेल. शरीर सुदृढ ठेवण्यास मदत होईल, अशा टिप्स देताना जीवनाचा मनस्वी आनंद लुटा, असा मौलिक सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना दिला. 

जगात २००० सालच्या नोंदीनुसार २६ टक्के नागरिक रक्तदाबाने ग्रस्त आहेत. २०२५ नंतर हे प्रमाण २९ टक्क्यांवर जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रक्तदाब हा आजार प्रामुख्याने वयाच्या चाळिशीपासून सुरू होतो. अर्थात त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनाही तो होतो. साधारणत: चक्कर येणे, डोके दुखणे, डोळ्याला दोन प्रतिमा दिसणे, शरीराला घाम सुटणे, बेशुद्ध होणे, फीट येणे ही साधारणत: ढोबळ कारणे असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विठ्ठल दडके यांनी सांगितले.

याशिवाय हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे म्हणतात.. १४०/९० पेक्षा जास्त रक्तदाब असणे याला हायपर टेन्शन किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असं म्हटलं जातं. रक्तदाब होण्याची मुख्य कारणे म्हणजे खूप जास्त काम, चिंता, राग, जेवणामध्ये मिठाचे, तेलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कडक होऊन जाणाºया रक्तवाहिन्या हे असते. जास्त वजन असणे, किडनीची रक्तवाहिनी बारीक असणे हे देखील रक्तदाब होण्याची कारणे मानली जातात. 

शरीर सुदृढ ठेवायचे असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने औषधोपचाराबरोबरच आठवड्यातून किमान ५ दिवस दररोज अर्धा तास व्यायाम करणे गरजेचे आहे. वजन नियंत्रणात ठेवावे. आहारात जास्त मीठ वापरू नये. चरबीयुक्त तेलकट पदार्थ टाळावेत. योगा, प्राणायाम करावे, नियमित वेळेवर झोपावे अणि व्यसनापासून दूर राहणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वाचकांनी उच्च रक्तदाबापासून सावधान राहण्यासाठी योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

रुग्णांनो प्रथम हे लक्षात घ्या अन् अंमल करा- रक्तदाब असणाºया रुग्णांनी पुढील बाबी वाचून दक्षता घेणे गरजेचे आहे. रक्तदाब नियमित केला नाही तर हृदय आघात (हॉट अ‍ॅटॅक), किडनी फेल होणे, रक्तवाहिन्या जाड, कठीण होऊन जाणे असे आजार होऊ शकतात. रक्तदाबाचे निदान झाले असेल तर डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर नियमित घ्यावीत. वजन जास्त झालेले असेल तर आपल्या उंचीप्रमाणे वजन कमी करावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित व्यायाम करावा. आपल्या खाण्यामध्ये मिठाचे, तेलाचे प्रमाण खूप कमी करावे. मांसाहार कमी करावा. चिप्स, लोणची, पापड, सॉस, चॉकलेट, आईस्क्रीम, केक आणि कोल्ड्रिंक्स घेऊ नयेत. नेहमी ताज्या भाज्यांचा वापर करावा. केळी, संत्री, नारळाचे पाणी, रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी चांगले असते. सूर्यफुलाचे तेल किंवा सोयाबीन तेल जेवणामध्ये वापरावे. मांसाहारामध्ये मासे खाण्यास परवानगी आहे. रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या आहारात गहू, तांदूळ, राळी, मका, अंकुरीत दाळी यांचा समावेश असावा, असा सल्ला हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे यांनी रुग्णांना दिला आहे. 

या तपासण्या करा...

  • - मूत्रपिंड विकार तपासणी
  • - शरीरातील चरबीचे प्रमाण
  • - मधुमेह तपासणी
  • - ईसीजी, थॉयरॉईडची तपासणी गरजेची
  • - तरुण रुग्णाचा रक्तदाब वाढला तर त्याची होमोसिस्टीम तपासणी करावी.
टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल