शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

कॅन्सरच्या विरोधात व्यापक लढा हवा : शिरीष कुमठेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:54 IST

तंबाखूचे विविध प्रकाराने सेवन केल्यामुळे साधारणपणे ५० लाख लोक प्रतिवर्षी मृत्युमुखी पडतात. म्हणजेच एकूण कॅन्सरग्रस्त रुग्णांपैकी २२ टक्के इतका ...

ठळक मुद्देतंबाखूचे विविध प्रकाराने सेवन केल्यामुळे साधारणपणे ५० लाख लोक प्रतिवर्षी मृत्युमुखी पडताततंबाखूच्या सेवनाने तोंड, घसा, जीभ, स्वरयंत्र, अन्ननलिका, स्वादूपिंड, फुफ्फुसे, जठर, मूत्राशय, गर्भाशय इ. कॅन्सर उद्भवतात हे आता सिद्ध झाले

तंबाखूचे विविध प्रकाराने सेवन केल्यामुळे साधारणपणे ५० लाख लोक प्रतिवर्षी मृत्युमुखी पडतात. म्हणजेच एकूण कॅन्सरग्रस्त रुग्णांपैकी २२ टक्के इतका तो मोठा आकडा आहे. याचाच अर्थ असा की, जर आपण तंबाखूच्या वापरावर विविध मार्ग वापरून बंधने आणू शकलो तर मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे ओझे कमी करू शकू. तंबाखूच्या सेवनाने तोंड, घसा, जीभ, स्वरयंत्र, अन्ननलिका, स्वादूपिंड, फुफ्फुसे, जठर, मूत्राशय, गर्भाशय इ. कॅन्सर उद्भवतात हे आता सिद्ध झाले आहे.

अलीकडच्या काळात जगभरात दारू पिण्याच्या व्यसनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. प्रौढ लोकांपासून ते तरुण अल्पवयीन मुले-मुली मद्यपान करताना दिसतात. दारूच्या सेवनाने तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, जठर, लिव्हर, स्वादूपिंड व स्तन या आठ अवयवांचे कॅन्सर होतात. या व्यसनाविरुद्ध देखील आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती करून हे कॅन्सर होणे टाळू शकतो.

आपल्या देशासकट अनेक पाश्चात्य देशात, वाढते वजन व लठ्ठपणाची देखील जणूकाही लाट आली आहे, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, वाढती सुबत्ता हे या मागचे मुख्य कारण आहे. लठ्ठपणामुळे आतड्याचा, स्तनाचा, गर्भाशयाचा, बीजांड कोशाचा तसेच स्वादूपिंड, जठर, अन्ननलिका, मूत्रपिंड व पित्ताशयाचा कॅन्सर होतो. योग्य वजन राखणे, योग्य व संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या तीन गोष्टींनी आपण ३३ टक्के कॅन्सरना प्रतिबंध करू शकतो.

आजमितीला जगभरात सुमारे ५४ टक्के लोक हे शहरात राहतात आणि इ. स. २०५० पर्यंत हाच आकडा ६६ टक्क्यांपर्यंत जाईल, शहरीकरणाचा हा वेग जसा वाढत जाईल. तसतशी बदलती जीवनशैली, आरोग्य समस्या, नागरी सुविधा यांना तोंड देण्यासाठी आपल्या पुढे अनेक आव्हाने उभी राहतील, म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकारे तसेच महापालिका सारख्या स्थानिक सरकारी संस्था व इंडियन कॅन्सर सोसायटी, लायन्स, रोटरी सारख्या सामाजिक संस्था यांच्यामार्फत आपण आग्रहीपणे कॅन्सरसारख्या घातक, रोगाला प्रतिबंध करण्याच्या कामात पुढाकार घेऊन कार्यरत होणे आवश्यक आहे.

सोलापुरातील इंडियन कॅन्सर सोसायटीची स्थापना डॉ. सुशीला पाटील यांच्या पुढाकारातून १९८० साली झाली. तेव्हापासून ते आजतागायत या संस्थेमार्फत सातत्याने कॅन्सर निदान शिबिरे, जनजागृती व्याख्याने व प्रदर्शने, कॅन्सरविषयक उपचारासाठी मार्गदर्शन इ. उपक्रम राबवले जातात. संस्थेच्या रेल्वे लाईन्स स्थित वास्तूमध्ये मरणासन्न व आधारहीन कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी ‘शांतीनिकेतन’ नावाचे शुश्रुषा केंद्र मोफत चालवले जाते.

४ फेब्रुवारीच्या जागतिक कॅन्सर दिनानिमित्त आपण सगळ्या सुजाण नागरिकांनी आपापल्या परीने क ूंल्ल ंल्ल िक ६्र’’ या घोषवाक्यानुसार या घातक रोगाविरुद्धच्या व्यापक लढा उभारून त्यात सक्रिय सहभाग घ्यावा ही अपेक्षा.-डॉ. शिरीष कुमठेकर(लेखक सर्जन व कॅन्सरतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूरcancerकर्करोगHealthआरोग्यMedicalवैद्यकीय