शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांच्या २१८ पैकी ६० फिडर्सवर भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 1:04 PM

अधीक्षक अभियंत्यांची माहिती: विजेच्या मागणीत वाढ, निर्मितीत घट

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात तांत्रिक, वाणिज्य असे गृहीत धरून ४० टक्के वीज गळतीसोलापूर जिल्ह्यात फक्त शेतीपंपांवरील जोडणीवर भारनियमन हे भारनियमन थोड्या काळासाठी असून, ग्राहकांनी या काळात महावितरणला सहकार्य करावे

अप्पासाहेब पाटीलसोलापूर : कोळशाचा तुटवडा, पाणी वापरावर आलेले निर्बंध यामुळे राज्यातील वीजनिर्मितीत मोठ्या प्रमाणात घट झाली़ यामुळेच महावितरण प्रशासनाला नाइलाजास्तव भारनियमन करावे लागत आहे़ सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांच्या २१८ पैकी ६० फिडर्सवरून पहिल्या तासापेक्षा २ तास अधिकचे भारनियमन करण्यात येत असल्याची माहिती सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, अकलूज, पंढरपूर, बार्शी असे पाच विभाग येतात़ या पाच विभागांतर्गत जिल्ह्यात २५४ उपविभागीय कार्यालये कार्यरत आहेत़ त्यात १३६६ फिडर्स आहेत़ त्यापैकी २१८ फिडर्स शेतीपंपांचे आहेत़ आॅक्टोबर हीटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे. त्यामुळे सोमवारपासून सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोळशाचा तुटवडा व पाण्याची कमतरता जाणवत असल्याने भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरणने सांगितले़ सोलापूर जिल्ह्यातील ज्या भागात वसुली कमी आहे व वीज गळती जास्त त्या भागात प्रामुख्याने भारनियमन करण्यात येत असल्याचेही सांगितले.

शहरात भारनियमन नाही... पण

- सोलापूर शहरात महावितरणकडून कोणत्याही प्रकारचे भारनियमन करण्यात येत नाही़ मात्र ज्या भागात लाईन बंद होणे, स्मार्ट सिटीच्या कामासाठी बंद करणे, तारा तुटणे, शॉर्टसर्किटने वायर जळणे, ट्रान्स्फॉर्मर बदलणे, महावितरणकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात आदी प्रकारांमुळे त्या त्या भागातील वीज काही काळासाठी बंद करण्यात येत असते़ त्यामुळे ग्राहकांना वाटते की, भारनियमन सुरू झाले की काय? पण शहरात कुठेही भारनियमन नसल्याचेही स्पष्टीकरण ज्ञानदेव पडळकर यांनी दिले़

सोलापूर जिल्ह्यात फक्त शेतीपंपांवरील जोडणीवर भारनियमन करण्यात येत आहे़ ज्या भागात ४० टक्के विजेची हानी आहे, जिथे वसुली कमी आहे, त्याच भागात प्रामुख्याने भारनियमन करण्यात येत आहे़ हे भारनियमन थोड्या काळासाठी असून, ग्राहकांनी या काळात महावितरणला सहकार्य करावे़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, सोलापूर

वीज गळती ४० टक्क्यांवर पोहोचलीमहावितरणच्या मुख्य तारेवर आकडा टाकणे, अनधिकृत वीजजोडणी, हुक टाकणे, मीटर डायरेक्ट करणे, मीटरमध्ये पट्टी टाकणे, मीटरमध्ये छेडछाड करून चुकीचे रीडिंग दाखविणे, मीटर बंद पाडणे यांसारख्या चुका करून शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होती़ सोलापूर जिल्ह्यात तांत्रिक, वाणिज्य असे गृहीत धरून ४० टक्के वीज गळती होत असल्याची माहिती महावितरणने सांगितली.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन