शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सोलापुरात पाणीटंचाई; आता २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:19 PM

सोलापूर : शहर पाणीपुरवठ्याचा महत्त्वपूर्ण स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा दोन दिवसांत कोरडा पडणार आहे. टाकळी इनटेकमधील ...

ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा दोन दिवसांत कोरडा पडणार टाकळी इनटेकमधील जलसाठा पाहता २५ मार्चपर्यंत पाणी पुरेल अशी शक्यताउजनी धरणातून १५ मार्चपर्यंत पाणी सोडण्यात यावे, असे तिसरे स्मरणपत्र मनपा प्रशासनाकडून जलसंपदा विभागाला

सोलापूर : शहर पाणीपुरवठ्याचा महत्त्वपूर्ण स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा दोन दिवसांत कोरडा पडणार आहे. टाकळी इनटेकमधील जलसाठा पाहता २५ मार्चपर्यंत पाणी पुरेल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून १५ मार्चपर्यंत पाणी सोडण्यात यावे, असे तिसरे स्मरणपत्र मंगळवारी मनपा प्रशासनाकडून जलसंपदा विभागाला देण्यात येणार आहे. 

उजनी धरणातून १५ जानेवारीला औज बंधाºयासाठी पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी २१ जानेवारीपर्यंत औज बंधाºयात पोहोचले. हे पाणी १० एप्रिलपर्यंत पुरेल, अशी आशा होती. परंतु, कर्नाटक हद्दीतून दररोज ७० एमएलडी पाण्याचा बेकायदेशीर उपसा सुरू झाला. तो रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क करावा, असे महापालिका प्रशासनाने कळविले होते. पण जलसंपदा विभागाने हात वर केले. यामुळे औज बंधाºयातील पाणी लवकर कमी झाले.

पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी औज बंधाºयात ०.६५ मीटर पाणी होते. बंधाºयातील पाणी टाकळी इनटेकमध्ये घेण्यात आले आहे. टाकळी इनटेकमध्ये ११ फूट पाणी आहे. हे पाणी २५ मार्चपर्यंत पुरेल, अशी आशा आहे. यादरम्यानच्या काळात १५ मार्चपर्यंत उजनीतून पाणी सोडण्यात यावे. हे पाणी २१ मार्चपर्यंत औज बंधाºयात येईल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाने यापूर्वी ५ फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारीला पत्र पाठविले आहे. मंगळवारी तिसरे स्मरणपत्र पाठविले जाईल. 

बेकायदेशीर पाणी उपशाचा बंदोबस्त कोण करणार?- महापालिका औज बंधाºयातून दररोज ९० एमएलडी पाणी उपसा करते तर कर्नाटक हद्दीतून दररोज ७० एमएलडी पाणी उपसा होतो. जलसंपदा विभागाने पाण्याच्या संरक्षणासाठी पावले उचलावीत, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यात शहराला जादा पाणी लागते. मार्चनंतर पुन्हा मे महिन्यात उजनीतून पाणी सोडण्याची मागणी होती. सध्या उजनीची पाणीपातळी खालावत आहे. एप्रिल महिन्यात बेकायदेशीर पाणी उपसा न रोखल्यास शहरावर जलसंकट ओढावणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई