शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

उजनीचा पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंत घसरला ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 3:14 PM

भीमानगर :   उजनी धरणाची पाणीपातळी ४३ टक्क्यांपर्यंत खाली आली असून, मागील वर्षी आजच्या दिवशी उजनी धरणात १०५.८१ टक्के ...

ठळक मुद्देआॅगस्ट महिन्यात पाणीसाठा होता १०६ टक्केधरणात सध्या ८६.९९ टीएमसी पाणीसाठा २३.३३ टीएमसी पाणी उपयुक्त साठा

भीमानगर :  उजनी धरणाचीपाणीपातळी ४३ टक्क्यांपर्यंत खाली आली असून, मागील वर्षी आजच्या दिवशी उजनी धरणात १०५.८१ टक्के एवढा पाणीसाठा होता. आॅगस्ट महिन्यात १०६ टक्के असलेला पाणीसाठा डिसेंबर महिन्यात कमालीचा घटला आहे. 

यावर्षीच्या पावसाळ्यात आॅगस्ट महिन्यात उजनी धरण १०६ टक्के भरूनही पाण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला असल्याचे जाणकार सांगतात. आज धरणात पाणीसाठा केवळ ४३ टक्के इतकाच आहे.याचे परिणाम ऐन उन्हाळ्यात दिसणार आहेत. सध्या सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याची मागणी होत असून ,रब्बी हंगामासाठीची जानेवारी महिन्यात बोगद्यातून सीना नदीत व कालव्याला पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे जानेवारी- फेब्रुवारी महिन्यातच धरण रिकामे होणार आहे.

 सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून पाण्याचा उपसा सुरूच असून, त्यातच उन्हाळ्यात बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढणार आहे. याशिवाय सीना-माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव उपसा सिंचन योजना, बार्शी उपसा सिंचन, शिरापूर उपसा सिंचन योजना या सर्व योजनांना ठरल्याप्रमाणे आवर्तने द्यावी लागणार आहेत.

यामुळे धरणातील साठा मायनसमध्ये येण्यास वेळ लागणार नाही. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रामणे उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्याला साधारणपणे जानेवारीच्या २० तारखेला पाणी सोडण्याचे नियोजन आहे. जानेवारीमध्ये सोडलेले पाणी साधारणत: ३० दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यापर्यंत पाण्याची फार अशी गंभीरता जाणवणार नाही, मात्र त्यानंतर पाणी.. पाणी.. करण्याची वेळ येणार आहे.

धरणात २३.३३ टक्के उपयुक्त साठा- धरणात सध्या ८६.९९ टीएमसी पाणीसाठा असला तरी त्यापैकी २३.३३ टीएमसी पाणी उपयुक्त साठा आहे. त्यानंतर मात्र मृत साठ्यातील पाणी वापरावे लागणार आहे. हे पाणी पुढील वर्षी जुलै-आॅगस्ट महिन्यापर्यंत जपून वापरावे लागणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात धरणातील पाणीसाठा १०५ टक्के होता, तरीही जुलैपर्यंत धरण मायनसमध्ये आले होते. यावर्षीची स्थिती तर फारच गंभीर आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई