शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

एक घागर पाण्यासाठी तीन तासांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 3:03 PM

मोहोळ तालुक्यातील नरखेड गावातील दुष्काळी कहाणी; पाण्याअभावी विहिर, बोअर पडले कोरडे

ठळक मुद्देवैराग रोडवर मोहोळपासून १३ कि.मी. अंतरावर वसलेले साडेपाच हजार लोकसंख्येचे नरखेड हे गावभोगावती नदी गेल्या सहा महिन्यांपासून व सीना नदी महिन्यापासून कोरडी जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्यामुळे ४०० फुटांपर्यंत बोअर घेतले तरी ते कोरडे जात असल्याने गावकरी आणि शेतकरी हतबल

हणमंत पवार 

नरखेड : वैराग रोडवर मोहोळपासून १३ कि.मी. अंतरावर वसलेले साडेपाच हजार लोकसंख्येचे नरखेड हे गाव. गावात मोठ्या वाड्या-वस्त्या. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी भोगावती नदीमध्ये दोन विहिरी, ग्रामपंचायत कार्यालयालगत विहीर, सीना नदीवरून दोन गावांतर्गत पाईपलाईन, गावामध्ये पाण्याचे ४ आड, ४ हातपंप, १०-१२ बोअर एवढी साधने असूनही फक्त ग्रामपंचायत कार्यालयातील बोअर आणि सीना नदीवरील संगमावरून केलेली पाईपलाईन हा पर्याय वगळला तर गावातील विहिरी, बोअर आटले आहेत.

ग्रामपंचायतीचे सर्वच बोअर बंद पडले आहेत. सिद्धेश्वर मंदिरासमोरील बोअरला तुटक-तुटक पाणी येत असल्याने हा आधारही कधी बंद पडेल, याचा भरवसा राहिलेला नाही.

ज्वारी हे मुख्य पीक गावकरी घेतात, मात्र पाण्याअभावी उत्पादन घटले आहे. ज्वारीव्यतिरिक्त इतर पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. भोगावती नदी गेल्या सहा महिन्यांपासून व सीना नदी महिन्यापासून कोरडी आहे. जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्यामुळे ४०० फुटांपर्यंत बोअर घेतले तरी ते कोरडे जात असल्याने गावकरी आणि शेतकरी हतबल झाले आहेत. 

गावाशेजारील अनेक वाड्यावस्त्यांवर बोअर, विहिरी आहेत. त्याही २० ते २५ मिनिटांपुढे चालत नाहीत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय आहे. गावात ४-५ दूध डेअºया आहेत, परंतु पाणीटंचाईमुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे. दुपारच्या तीव्र उन्हामध्येसुद्धा पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जनावरांच्या खाद्याचे भाव वाढल्याने दुधाचा व्यवसायही तोट्यात आल्याने गावकºयामंध्ये नैराश्य दिसत आहे. नरखेड भागासह गावात चारा छावणीची मागणी करूनसुद्धा मंजूर झाली नाही.

या संकटाच्या दिवसात गावातील बागायतदार बांधव स्वत:च्या पीकशेतीला पाणी न देता तेच पाणी गावाला देत आहेत. सोसायटी चेअरमन जयवंत पाटील, काकासाहेब पाटील, गौरीहर भडंगे, पांडुरंग शेंडगे, वसंत भडंगे, हरिदास मोटे, सुनील भडंगे यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. काही बोअरमालकांनीही सहकार्याचा हात गावासाठी पुढे केला आहे. नरखेडसह मसले चौधरी, देगाव येथे सर्वात जास्त पाणीटंचाई असून त्या खालोखाल डिकसळ, भोयरे, एकुरके, बोपले, मलिकपेठ, हिंगणी, भांबेवाडी, यलमवाडी आदी भागातील वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई भासत आहे.

पाणी मिळविण्यासाठी अख्या गावात जणू स्पर्धाच..- या गावाला भेट दिली तेव्हा ग्रामपंचायतीसमोरील बोअरवर प्रचंड गर्दी दिसली. दोन घागरीसाठी व्यवसाय-कामधंदा सोडून नंबर लावून दिवसभर रांगेत असलेले गावकरी दिसले. ते म्हणाले, फक्त दोन घागरीसाठी दिवसभर रांगेत ३ तास उभे राहावे लागत आहे. संगमावरील सीना नदीवर पाण्यासाठी खड्डा खोदून नवीन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दोन टँकरद्वारे गावात पाणी येते. ते विहिरीमध्ये सोडले जाते. तेथून पाईपलाईनने गावाला येते. ते मिळविण्यासाठी अख्या गावात जणू स्पर्धा असते. 

गावातील सर्व विहिरी कोरड्या पडल्याने आम्ही सीना नदीवरील संगमातून नवीन पाईपलाईन केली आहे, तर दोन टँकर व काही बोअरच्या माध्यमातून गावातील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- उमेश पाटील, जि. प. सदस्य 

सीना नदीवरील घाटणे बॅरेज ५ ते ७ मीटरने अडविल्यास व गावातील पाण्याचे नियोजन केल्यास नरखेडसह भागातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी सीना-भोगावती जोडकालवा होणे गरजेचे आहे. - शहाजी मोटे, माजी सरपंच

ग्रामपंचायतीला पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या वतीने मोठा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु दुष्काळ, पाणीटंचाई व नियोजनाअभावी पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत.- सुधाकर काशिद गुरुजी, अंनिस कार्यकर्ते 

नरखेडमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून दोन टँकरला मंजुरी मिळाली आहे. नवीन पाईपलाईन व काही बोअरच्या आणि गावाशेजारील शेतकºयांच्या खासगी बोअरच्या माध्यमातून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे.-तात्यासाहेब नाईकनवरे, ग्रामसेवक

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळWaterपाणीwater transportजलवाहतूक