शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कुरनूरमधील गाळ काढण्यासाठी गावकरी स्वयंप्रेरणेने सरसावले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:59 IST

‘लोकमत’ च्या मालिकेचा परिणाम, ‘लोकमत’च्या सामाजिक जाणिवेचे हे यश असल्याच्या शेतकºयांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

ठळक मुद्देलोकसहभाग आणि शासकीय पातळीवरून चालना मिळाल्यास धरणातून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा होऊ शकतोसद्यस्थितीत एक पोकलेन आणि दहा टिपरच्या माध्यमातून गाळ उपसा करण्यात येत आहे. आगामी काळात गाळ उपसा वाढल्यास यंत्रसामुग्री वाढवणार असल्याचे सिद्धाराम भंडारकवठे यांनी सांगितले

शंभूलिंग अकतनाळ चपळगाव : पोटात गाळ साचल्यामुळे कोरडे पडलेल्या कुरनूर धरणाच्या पुनरुज्जीवनासाठी गावकरी सरसावले आहेत. तलावात साठलेला गाळ काढण्यासाठी गावकरी एकत्रित आले असून, या कामाला सोमवारपासून सामूहिकपणे सुरुवात झाली आहे.‘लोकमत’ने कुरनूर धरणाच्या सध्याच्या अवस्थेवर प्रकाश टाकणारी मालिका प्रकाशित केली होती. त्याची दखल घेऊन गावकरी स्वयंप्रेरणेने पुढे आले आहेत. ‘लोकमत’च्या सामाजिक जाणिवेचे हे यश असल्याच्या प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत.

यावर्षी अत्यल्प पावसामुळे अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कुरनूर धरणात जेमतेम तेवीस टक्केच पाणीसाठा झाला होता. भविष्यात ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्थांसह शेतकरीवर्गाने गाळ काढावा, या हेतूने चपळगावातील बळीराजांनी एकत्रित येऊन कुरनूर धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ केला आहे.

चपळगावचे सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. आगामी पावसाळ्यापर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 

धरणात दूरवर गाळाचे साम्राज्य पसरले असून, लोकसहभाग आणि शासकीय पातळीवरून चालना मिळाल्यास धरणातून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा होऊ शकतो. सद्यस्थितीत एक पोकलेन आणि दहा टिपरच्या माध्यमातून गाळ उपसा करण्यात येत आहे. आगामी काळात गाळ उपसा वाढल्यास यंत्रसामुग्री वाढवणार असल्याचे सिद्धाराम भंडारकवठे यांनी सांगितले. यावेळी विकास मोरे, चंदू माशाळे, विजय कोरे, प्रशांत पाटील, शिवबाळप्पा कल्याणशेट्टी, रवी कोरे आदींसह गावकरी मोठ्या संख्येने हजर होते. आभार विजय कोरे यांनी मानले.

एक ब्रास म्हणजे २८३२ लिटर पाणी वाढणार...!- कुरनूर धरणातून सध्या गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम लाखमोलाची ठरणार आहे. कारण एक ब्रास गाळ काढल्यानंतर त्या ठिकाणी भविष्यात जवळपास २८३२ लिटर पाणीसाठा वाढणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ काढल्यास मोठ्या पटीने पाणीसाठा वाढणार आहे. याचा फायदा होईल. पहिल्या दिवशी ५५० ब्रास गाळ उपसा करण्यात आला.

लोकमतची लोकोपयोगी पत्रकारिता अक्कलकोट तालुक्याची तहान भागविणार आहे. कुरनूर धरणात गाळ वाढल्याने प्रत्यक्ष पाणीसाठा कमीच आहे. गाळ काढल्यानंतर प्रत्यक्ष पाणीसाठा वाढणार आहे.- चंद्रकांत माशाळे, शेतकरी 

सद्यस्थितीत कुरनूर धरणातील गाळ शेतात टाकण्याची मनी इच्छा आहे. परंतु आर्थिक बाब दुबळी ठरत आहे, मात्र गाळ काढण्यासाठी शासनाकडून मदत मिळाली तर माझ्या शेतात गाळ टाकणार आहे.- शिवबाळप्पा कल्याणशेट्टी

सोमवारपासून कुरनूर धरणातील गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली. सर्वप्रथम मी माझ्या शेतात गाळ टाकणारा पहिला शेतकरी ठरलोय याचा मनस्वी आनंद होत आहे.- राजशेखर ममदापुरे, शेतकरी

‘लोकमत’च्या मालिकेनंतर गाळ काढण्याची मोहीम हाती घेणे गरजेचे वाटले. याविषयी गावातील शेतकºयांशी चर्चा केली. सर्वांनी होकार दिल्यानंतर जुळवाजुळव करून आम्ही गाळ काढण्याची मोहीम सुरू केली आहे.- सिद्धाराम भंडारकवठे 

टॅग्स :Solapurसोलापूरriverनदीdroughtदुष्काळWaterपाणीwater shortageपाणीटंचाई