शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

तीस टक्के लोक व्यसनमुक्त होतील; मानसोपचार तज्ज्ञांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:06 IST

लॉकडाउनचा असाही फायदा; व्यसन सोडणाºयांसाठी लॉकडाउनचा काळ हा सुवर्णकाळ

ठळक मुद्देसाधारणत: अठरा ते तीस वयोगटातील अनेक तरुणवर्ग हा शौक म्हणून व्यसन करत असतोतीस ते साठ वर्षांपर्यंतचा वर्ग हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यसन करत असतोव्यसन करणाºयांना आपल्या व्यसनाचा साठा करून ठेवण्याची संधी मिळाली नाही

सोलापूर : सध्या सोलापूरसह देशभरात लॉकडाउन सुरू आहे. यातच सोमवारपासून सोलापुरात संपूर्ण संचारबंदी करण्यात आली आहे. ही संचारबंदी आणि लॉकडाउन हे सध्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचे आहेच, सोबतच ज्यांना व्यसन सोडायची इच्छा आहे पण ते सोडू शकत नव्हते त्यांच्यासाठी लॉकडाउनचा काळ हा सुवर्ण काळ असू शकतो. या लॉकडाउन काळात व्यसनी वस्तू न मिळाल्यामुळे जवळपास तीस ते चाळीस टक्के लोक हे व्यसन सोडू शकतात, असा विश्वास मानसोपचार तज्ज्ञ डॉ. गंगाधर कोरके यांनी  ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला. 

साधारणत: अठरा ते तीस वयोगटातील अनेक तरुणवर्ग हा शौक म्हणून व्यसन करत असतो आणि तीस ते साठ वर्षांपर्यंतचा वर्ग हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यसन करत असतो. व्यसन करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्यसनाची उपब्धता. म्हणजेच तंबाखू, दारू, चरस, गांजा इत्यादी. यांची सहजरीत्या उपलब्धता ही खूप महत्त्वाची असते. पण सध्या अचानकपणे लॉकडाउन झाले. यामुळे व्यसन करणाºयांना आपल्या व्यसनाचा साठा करून ठेवण्याची संधी मिळाली नाही.

यामुळे अनेक व्यसन करणाºयांना वाटत होते की, आपण हे व्यसन केले नाही तर आपण जगूच शकत नाही, आपलं डोकं काम करत नाही, झोपच येणार नाही असे त्यांना वाटत होते. पण त्यांना गेल्या किंवा येत्या अनेक दिवसांपर्यंत व्यसनी वस्तू न मिळाल्यामुळे त्यांच्यात आपण व्यसनाशिवाय जगू शकतो हा आत्मविश्वास आलेला असतो. यामुळे अनेक लोक व्यसनापासून दूर जाऊ शकतात. याचबरोबर सध्या माणूस हा घरातच थांबून आहे. यामुळे त्याला घरच्यांचा पाठिंबाही मिळत आहे. यामुळे कोणत्याही छोट्या-मोठ्या करणामुळे व्यसनाकडे वळणारा माणूस व्यसनाची उपलब्धता नसल्यामुळे तो यापासून लांब जाऊ शकतो. यातूनच त्याचे व्यसन सुटू शकते.

व्यसन सुटण्यापूर्वीची लक्षणे- जे लोक व्यसन करत होते, ते आता अचानक बंदिस्त झाले. त्यांच्याकडचा व्यसनाचा साठा संपला. आपल्या सर्व मित्रांना विचारूनही कोठूनही व्यसन न मिळाल्यामुळे ते थोडे चिडखोर स्वभावाचे बनलेले असत. त्यांना झोप न येणे, भांडण करणे असे होत असते. पण तीन-चार दिवसात व्यसनी वस्तू न मिळाल्यास त्यांच्यातील ही लक्षणे कमी होऊ लागतात. त्यांना एकप्रकारे आपण व्यसनाशिवाय जगू शकतो, असा आत्मविश्वास येऊ लागतो. यालाच वैद्यकीय भाषेत ‘विड्रॉल फेज’ म्हटले जाते. हा कालावधी जवळपास आठ दिवसात संपून जातो.

या वयोगटातील व्यसनी व्यक्ती व्यसन सोडण्याची शक्यता जास्तव्यसन करणारे हे १८ ते ३० वयोगट आणि तीस ते साठ वयोगटापर्यंतचा एक गट असतो. यातील दुसरा गट म्हणजेच तीस वर्षांपुढील लोकांना आपल्या व्यसनाशिवायही जीवन जगण्याचा आनंद कळायला सुरुवात होते, त्यांना जास्त फरक पडू शकतो. पण ज्यांना सोडायची इच्छाशक्ती असते अशांना हा काळ जास्त प्रभावी असेल, असे मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात.

लॉकडाउनमुळे आपणांस कमीत कमी गरजा कळतात. आपण खूप अल्प गोष्टीतही संतुष्ट राहू शकतो. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पाहणे हेही गरजेचे आहे. यामुळे अनेकांना जीवनाचे महत्त्व कळते. लॉकडाउनमुळे तीस वर्षांपुढील व्यसन करणारे व्यसन सोडू शकतात, असा अंदाज आहे. यामुळे हा लॉकडाउन व्यसन सोडणाºयांसाठी सुवर्णसंधी म्हणायला हरकत नाही. - डॉ. गंगाधर कोरके, मानसोपचार तज्ज्ञ.

जे कॉलेज जीवनात व्यसन सुरू करतात आणि ती सोडायची इच्छा असूनही सोडू शकत नाहीत त्यांना हा सुवर्ण काळ ठरू शकतो. कारण व्यसन हे व्यसनाच्या साहित्य उपलब्धतेवर अवलंबून असते. आता उपलब्धता बंद झाल्यामुळे व्यसन हे पूर्ण बंद होऊ शकते. यासाठी तीस ते चाळीस दिवसांचा कालावधी लागतो, पण सुरुवातीचे आठ दिवस खूप त्रास होतो.- डॉ. आतिश बोराडे, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल