शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

सोलापूर जिल्ह्यातील हुमणीचे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना : पांडुरंग मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 19:46 IST

संवाद ; खबरदारी आणि एकात्मिक कीड नियंत्रण हाच पर्याय

बाळासाहेब बोचरेसोलापूर: पाऊस नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांना हुमणी किडीने अधिक संकटात टाकले असून, शेतकºयांचे झालेले नुकसान भरून काढणे अवघड असले तरी पुढे होऊ नये, यासाठी शेतकºयांनी एकात्मिक कीड नियंत्रणावर भर देण्याची गरज आहे, असे डॉ. पांडुरंग मोहिते यांनी सांगितले. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू कृषी महाविद्यालयात अखिल भारतीय कृषी संशोधन केंद्राचा प्रकल्प असून, त्यामध्ये डॉ. मोहिते हे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न: ही कीड अचानक कधी नव्हे इतकी उद्भवली कशी?डॉ. मोहिते: याला ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणता येईल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे यंदा पावसाचे गणित बिघडले आहे. ज्यावेळी धो-धो पाऊस पडतो, पाणी साठते तेव्हा मातीमधील हुमणी मरून जाते. पण अल्पसा पाऊस पडतो तेव्हा मातीमधील ही कीड बाहेर येते आणि झाडाझुडपांवर ती मोठी होते. त्याच ठिकाणी नर-मादीचे मिलन होते आणि मादी जमिनीत जाऊन अंडी घालते. एकावेळी ५५ ते ६५ अंडी ही मादी घालते. त्यापासून जन्मलेल्या या अळ्या जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खाऊन टाकतात. खरीप असो वा रब्बी त्यामुळे पिकाच्या मुळ्या पोखरल्याने रोपांची संख्या कमी होते व अपेक्षित उत्पन्न येत नाही. 

प्रश्न: याला तातडीची उपाययोजना काय करता येईल?डॉ. मोहिते: वास्तविक ही कीड मातीत आहे. पिकाचे नुकसान झाल्यावर ही कीड असल्याचे कळते. त्यामुळे तिच्यावर कीटकनाशकांचा मारा करणे अवघड आणि किचकट आहे. झालेले नुकसान भरून काढता येत नाही, तरीही पिकांचे महत्त्व ओळखून उर्वरित पीक वाचवायचे असेल तर एकरी पाच ते सहा हजार रुपये खर्चात नियंत्रण करणे शक्य आहे. जेथे सरीमध्ये पाणी साठवणे शक्य आहे तेथे पाणी साठवले की मातीमधील कीड मरून जाते. पण सरीमध्ये पाणी जात नसल्याने कीड लागलेल्या रोपाच्या मुळाजवळ खड्डे पाडून १०० ग्रॅम बेटॅरायझम बुरशी किंवा सूत्रकृमी पॉवर १५ लिटरच्या पंपात टाकून ढवळावी. पंपाचा नोझल काढून मुळाजवळच्या खड्ड्यात सोडावी किंवा पहारीच्या साहाय्याने मुळाजवळ सूर मारायचा आणि त्यामध्ये क्लोरोपायरीफॉस ५० टक्के प्रवाही एक लिटर किंवा फ्ल्यूबेंड्यामाईड २५० मिली किंवा क्लोथायोनिडीन २५० ग्रॅम किंवा इमिडा आणि फिप्रोनील यांचे संयुक्त कीटकनाशक १६० ग्रॅम यापैकी एक ४०० लिटर पाण्यात मिसळून तुंबलेल्या पाण्यावर तवंग सोडावा.

प्रश्न: हुमणी होणार नाही यासाठी काय करावे?डॉ. मोहिते- पुढील वर्षी पाऊस असाच झाला  तर हुमणीचे संकट हे यापेक्षा अधिक होणार आहे. त्यासाठी आताच उपाययोजना करणे आवश्यक आहे. हुमणीच्या बंदोबस्तासाठी सूत्रकृमी पावडर तयार करण्यात येत आहे.  मात्र मागणीच्या प्रमाणात पुरवठा होऊ शकत नसल्याने बेंगलोरच्या एका प्रयोगशाळेशी याबाबत करार करण्यात आला आहे. त्यामुळे हुमणी नियंत्रणात येण्यासाठी उपाययोजना होतील. ------------------------------काय कराव्यात उपाययोजना

  • आज मिळणारे सर्व भुंगे शेतकºयांनी एकत्रितपणे नष्ट करावेत. 
  • नवीन पिकाची लावणी करण्यापूर्वी शेतात पाणी अडवून त्यावर तवंग सोडावा. त्याला आळवणीही म्हणतात.
  • नवीन ऊस लावताना जो खताचा डोस देतो त्या डोसमध्येच फ़ोरेट किंवा  फिप्रनील किंवा  रेनाक्झीपायर किंवा डर्सबान यांचे दाणेदार एकरी १० किलो मिसळावे व जमिनीत टाकावे. नंतर लागण करावी. 
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती