शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

सोलापूर जिल्ह्यातील हुमणीचे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना : पांडुरंग मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 19:46 IST

संवाद ; खबरदारी आणि एकात्मिक कीड नियंत्रण हाच पर्याय

बाळासाहेब बोचरेसोलापूर: पाऊस नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांना हुमणी किडीने अधिक संकटात टाकले असून, शेतकºयांचे झालेले नुकसान भरून काढणे अवघड असले तरी पुढे होऊ नये, यासाठी शेतकºयांनी एकात्मिक कीड नियंत्रणावर भर देण्याची गरज आहे, असे डॉ. पांडुरंग मोहिते यांनी सांगितले. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू कृषी महाविद्यालयात अखिल भारतीय कृषी संशोधन केंद्राचा प्रकल्प असून, त्यामध्ये डॉ. मोहिते हे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न: ही कीड अचानक कधी नव्हे इतकी उद्भवली कशी?डॉ. मोहिते: याला ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणता येईल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे यंदा पावसाचे गणित बिघडले आहे. ज्यावेळी धो-धो पाऊस पडतो, पाणी साठते तेव्हा मातीमधील हुमणी मरून जाते. पण अल्पसा पाऊस पडतो तेव्हा मातीमधील ही कीड बाहेर येते आणि झाडाझुडपांवर ती मोठी होते. त्याच ठिकाणी नर-मादीचे मिलन होते आणि मादी जमिनीत जाऊन अंडी घालते. एकावेळी ५५ ते ६५ अंडी ही मादी घालते. त्यापासून जन्मलेल्या या अळ्या जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खाऊन टाकतात. खरीप असो वा रब्बी त्यामुळे पिकाच्या मुळ्या पोखरल्याने रोपांची संख्या कमी होते व अपेक्षित उत्पन्न येत नाही. 

प्रश्न: याला तातडीची उपाययोजना काय करता येईल?डॉ. मोहिते: वास्तविक ही कीड मातीत आहे. पिकाचे नुकसान झाल्यावर ही कीड असल्याचे कळते. त्यामुळे तिच्यावर कीटकनाशकांचा मारा करणे अवघड आणि किचकट आहे. झालेले नुकसान भरून काढता येत नाही, तरीही पिकांचे महत्त्व ओळखून उर्वरित पीक वाचवायचे असेल तर एकरी पाच ते सहा हजार रुपये खर्चात नियंत्रण करणे शक्य आहे. जेथे सरीमध्ये पाणी साठवणे शक्य आहे तेथे पाणी साठवले की मातीमधील कीड मरून जाते. पण सरीमध्ये पाणी जात नसल्याने कीड लागलेल्या रोपाच्या मुळाजवळ खड्डे पाडून १०० ग्रॅम बेटॅरायझम बुरशी किंवा सूत्रकृमी पॉवर १५ लिटरच्या पंपात टाकून ढवळावी. पंपाचा नोझल काढून मुळाजवळच्या खड्ड्यात सोडावी किंवा पहारीच्या साहाय्याने मुळाजवळ सूर मारायचा आणि त्यामध्ये क्लोरोपायरीफॉस ५० टक्के प्रवाही एक लिटर किंवा फ्ल्यूबेंड्यामाईड २५० मिली किंवा क्लोथायोनिडीन २५० ग्रॅम किंवा इमिडा आणि फिप्रोनील यांचे संयुक्त कीटकनाशक १६० ग्रॅम यापैकी एक ४०० लिटर पाण्यात मिसळून तुंबलेल्या पाण्यावर तवंग सोडावा.

प्रश्न: हुमणी होणार नाही यासाठी काय करावे?डॉ. मोहिते- पुढील वर्षी पाऊस असाच झाला  तर हुमणीचे संकट हे यापेक्षा अधिक होणार आहे. त्यासाठी आताच उपाययोजना करणे आवश्यक आहे. हुमणीच्या बंदोबस्तासाठी सूत्रकृमी पावडर तयार करण्यात येत आहे.  मात्र मागणीच्या प्रमाणात पुरवठा होऊ शकत नसल्याने बेंगलोरच्या एका प्रयोगशाळेशी याबाबत करार करण्यात आला आहे. त्यामुळे हुमणी नियंत्रणात येण्यासाठी उपाययोजना होतील. ------------------------------काय कराव्यात उपाययोजना

  • आज मिळणारे सर्व भुंगे शेतकºयांनी एकत्रितपणे नष्ट करावेत. 
  • नवीन पिकाची लावणी करण्यापूर्वी शेतात पाणी अडवून त्यावर तवंग सोडावा. त्याला आळवणीही म्हणतात.
  • नवीन ऊस लावताना जो खताचा डोस देतो त्या डोसमध्येच फ़ोरेट किंवा  फिप्रनील किंवा  रेनाक्झीपायर किंवा डर्सबान यांचे दाणेदार एकरी १० किलो मिसळावे व जमिनीत टाकावे. नंतर लागण करावी. 
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती