शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सेंद्रिय शेतीमुळे मैंदर्गीच्या माळरानावर २८ कांड्यांचा ऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 14:50 IST

सेंद्रिय शेती : पारंपरिक शेतीला फाटा, दुष्काळावर मात करीत नवा प्रयोग

ठळक मुद्दे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील प्रा. तोटप्पा हसरमनी यांनी पारंपरिक शेतीपाच एकरावर एक डोळा उसाची लागवडदुष्काळावर मात करत सेंद्रिय शेतीचा अवलंब

शिवानंद फुलारी अक्कलकोट : तालुक्यातील मैंदर्गी येथील प्रा. तोटप्पा हसरमनी यांनी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत दुष्काळावर मात करत सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. पाच एकरावर एक डोळा उसाची लागवड केली आहे. त्याला सध्या २८ कांड्या आहेत. बांबूसारख्या पिकलेल्या उसाचे गुºहाळ करून ‘गुºहाळ घर’ ते बनविणार आहेत. गुळाला जागतिक बाजारपेठेत चांगला भाव असल्याने तिकडे गूळ पाठविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

पुण्यात नोकरी असली तरी प्रा. हसरमनी यांची वडिलोपार्जित जमीन मैंदर्गी येथे आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने सेंद्रिय शेतीचे स्वप्न पाहून त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बोअरच्या माध्यमातून पाच एकरमध्ये एक कांडी उसाची लागवड केली आहे. त्याला ठिबकद्वारे पाणी देण्यात येत असून, पूर्णपणे रासायनिक मात्रांचा वापर टाळून ते सेंद्रिय पद्धतीने ऊस वाढवत आहेत. दहा महिन्यांच्या कालावधीतच २८ कांड्यांचा ऊस आहे.

बारा महिन्यांनंतर सेंद्रिय गूळ तयार करून देशातील मल्टी शहरासह, विदेशात विक्री करण्यासाठी सध्या गूळ घर ते तयार करीत आहेत. त्यांना सांगलीचे कृषीभूषण संजीव माने, डॉ. प्रा. विशाल सरदेशमुख, डॉ. होलमुखे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. तोटप्पा हसरमनी यांना या कामासाठी अभियंत्या असलेल्या त्यांच्या पत्नी शिवलीला हसरमनी, त्यांच्या आई शिवलिंगाव्वा हसरमनी यांची मदत मिळत आहे. ते विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधर असले तरी कृषी क्षेत्रातून ते पीएच. डी करीत आहेत.

खत, पाणी व्यवस्थापन...च्ऊस लागवड करण्याआधी तागाची लागवड करून रोटरने त्याला जमिनीत गाढण्यात आले. भरणीवेळी कोंबडी खत, निंबोणी पेंड, मायक्रोन ड्रीयन्स सूक्ष्मजीव वायूचाही वापर खत फवारणीत करण्यात आला. बीज लागवडीपूर्वी २०० लिटर पाण्यामध्ये बियाणे बुडवून लागवड केली. नत्र, स्फूरद, पालाश याचाही वापर करण्यात आला. खत याचे स्थिरीकरण आले.यामुळे हुमणी,मावा,करपा या रोगापासून संरक्षण मिळते. तण महिला मजुरांच्या माध्यमातून काढण्यात आले. त्यात आंतरपीक म्हणून कावेरी वाणाच्या गव्हाची पेरणी करण्यात आली. दहा क्विंटल गव्हाचे उत्पन्नही त्यांना मिळाले आहे.

सध्या देशाला विषमुक्त सेंद्रिय शेतीची गरज आहे. नोकरी करण्यापेक्षा शेती आता महत्त्वाची बनत असून, नवनवीन प्रयोग व कमी पाण्यावर शेती यशस्वी होत आहे. भविष्यात सोलवर शेती, विदेशी मार्केट विकसित करण्याचा माझा मानस आहे.-प्रा. तोटप्पा हसरमनी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी