शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

सेंद्रिय शेतीमुळे मैंदर्गीच्या माळरानावर २८ कांड्यांचा ऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 14:50 IST

सेंद्रिय शेती : पारंपरिक शेतीला फाटा, दुष्काळावर मात करीत नवा प्रयोग

ठळक मुद्दे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील प्रा. तोटप्पा हसरमनी यांनी पारंपरिक शेतीपाच एकरावर एक डोळा उसाची लागवडदुष्काळावर मात करत सेंद्रिय शेतीचा अवलंब

शिवानंद फुलारी अक्कलकोट : तालुक्यातील मैंदर्गी येथील प्रा. तोटप्पा हसरमनी यांनी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत दुष्काळावर मात करत सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. पाच एकरावर एक डोळा उसाची लागवड केली आहे. त्याला सध्या २८ कांड्या आहेत. बांबूसारख्या पिकलेल्या उसाचे गुºहाळ करून ‘गुºहाळ घर’ ते बनविणार आहेत. गुळाला जागतिक बाजारपेठेत चांगला भाव असल्याने तिकडे गूळ पाठविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

पुण्यात नोकरी असली तरी प्रा. हसरमनी यांची वडिलोपार्जित जमीन मैंदर्गी येथे आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने सेंद्रिय शेतीचे स्वप्न पाहून त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बोअरच्या माध्यमातून पाच एकरमध्ये एक कांडी उसाची लागवड केली आहे. त्याला ठिबकद्वारे पाणी देण्यात येत असून, पूर्णपणे रासायनिक मात्रांचा वापर टाळून ते सेंद्रिय पद्धतीने ऊस वाढवत आहेत. दहा महिन्यांच्या कालावधीतच २८ कांड्यांचा ऊस आहे.

बारा महिन्यांनंतर सेंद्रिय गूळ तयार करून देशातील मल्टी शहरासह, विदेशात विक्री करण्यासाठी सध्या गूळ घर ते तयार करीत आहेत. त्यांना सांगलीचे कृषीभूषण संजीव माने, डॉ. प्रा. विशाल सरदेशमुख, डॉ. होलमुखे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. तोटप्पा हसरमनी यांना या कामासाठी अभियंत्या असलेल्या त्यांच्या पत्नी शिवलीला हसरमनी, त्यांच्या आई शिवलिंगाव्वा हसरमनी यांची मदत मिळत आहे. ते विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधर असले तरी कृषी क्षेत्रातून ते पीएच. डी करीत आहेत.

खत, पाणी व्यवस्थापन...च्ऊस लागवड करण्याआधी तागाची लागवड करून रोटरने त्याला जमिनीत गाढण्यात आले. भरणीवेळी कोंबडी खत, निंबोणी पेंड, मायक्रोन ड्रीयन्स सूक्ष्मजीव वायूचाही वापर खत फवारणीत करण्यात आला. बीज लागवडीपूर्वी २०० लिटर पाण्यामध्ये बियाणे बुडवून लागवड केली. नत्र, स्फूरद, पालाश याचाही वापर करण्यात आला. खत याचे स्थिरीकरण आले.यामुळे हुमणी,मावा,करपा या रोगापासून संरक्षण मिळते. तण महिला मजुरांच्या माध्यमातून काढण्यात आले. त्यात आंतरपीक म्हणून कावेरी वाणाच्या गव्हाची पेरणी करण्यात आली. दहा क्विंटल गव्हाचे उत्पन्नही त्यांना मिळाले आहे.

सध्या देशाला विषमुक्त सेंद्रिय शेतीची गरज आहे. नोकरी करण्यापेक्षा शेती आता महत्त्वाची बनत असून, नवनवीन प्रयोग व कमी पाण्यावर शेती यशस्वी होत आहे. भविष्यात सोलवर शेती, विदेशी मार्केट विकसित करण्याचा माझा मानस आहे.-प्रा. तोटप्पा हसरमनी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी