शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

गाळप सुरू असलेले सोलापूर जिल्ह्यातील कारखाने साखर आयुक्तांच्या दप्तरी बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:50 AM

सहकारमंत्र्यांच्या दोन्ही कारखान्यांचा समावेश; ३१ कारखाने सुरू; केवळ २५ कारखान्यांचीच नोंद

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३१ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरूसाखर आयुक्तांच्या दप्तरी २५ कारखान्यांचेच गाळप सुरू झाल्याची नोंद सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे दोन्हीही कारखाने अद्यापी सुरू झाले नसल्याचे साखर आयुक्तांच्या दप्तरावरुन स्पष्ट होते

सोलापूर:  जिल्ह्यातील जवळपास ३१ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असला तरी साखर आयुक्तांच्या दप्तरी २५ कारखान्यांचेच गाळप सुरू झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे दोन्हीही कारखाने अद्यापी सुरू झाले नसल्याचे साखर आयुक्तांच्या दप्तरावरुन स्पष्ट होते.

राज्यात सर्वाधिक ३९ साखर कारखाने असलेला सोलापूर जिल्हा सध्या दुष्काळामध्ये अडकला आहे. या जिल्ह्यातील ३९ पैकी २५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या २५ नोव्हेंबरच्या माहितीवरुन दिसून येते. सुरू असलेल्या २५ साखर कारखान्यांचे २५ नोव्हेंबरपर्यंत ३२ लाख ९० हजार ९२३ मे.टन इतके गाळप झाले आहे. राज्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत हे गाळप उच्चांकी आहे.

झालेल्या गाळपातून ३० लाख ४१ हजार ३२० क्विंटल साखर तयार झाली असून उतारा सरासरी ९.२४ इतका पडला आहे. गाळप सुरू  असलेल्या २४ कारखान्यांमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, विठ्ठल गुरसाळे, भीमा टाकळी सिकंदर,  पांडुरंग श्रीपूर, संत दामाजी,  मंगळवेढा, आदिनाथ करमाळा, सहकार शिरोमणी वसंतदादा काळे, विठ्ठलराव शिंदे, माढा, कूर्मदास, माढा, लोकनेते बाबुरावआण्णा  पाटील शुगर, सासवड माळी शुगर, विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, सिद्धनाथ शुगर तिºहे, जकराया वटवटे,भैरवनाथ शुगर विहाळ, इंद्रेश्वर शुगर, बार्शी, सीताराम महाराज खर्डी,फॅबटेक शुगर, नंदूर, युटोपियन शुगर, कचरेवाडी, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ आलेगाव, जयहिंद शुगर, आचेगाव, बबनराव शिंदे शुगर्स, गोकुळ माऊली,  विठ्ठल रिफायनरी, करमाळा आदींचा समावेश आहे.

 साखर आयुक्तांकडे अद्यापही कारखाने सुरू नसल्याची  नोंद असलेल्यामध्ये सिद्धेश्वर, कुमठे, मकाई भिलारवाडी, करमाळा, लोकमंगल अ‍ॅग्रो, बीबीदारफळ, लोकमंगल शुगर, भंडारकवठे,  मातोश्री लक्ष्मी शुगर,  गोकुळ शुगर या सहा कारखान्यांचा समावेश असला तरी हे कारखाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. मागील दोन, तीन व त्यापेक्षा अधिक वर्षांपासून शंकर सहकारी, संतनाथ वैराग, सांगोला सहकारी, स्वामी समर्थ अक्कलकोट, आर्यन बार्शी, शेतकरी चांदापुरी, लोकशक्ती, शिवरत्न उद्योग, करकंब  हे आठ कारखाने बंद आहेत. 

विठ्ठलराव शिंदे राज्यात प्रथममाढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे गाळप राज्यात सर्वाधिक म्हणजे ४ लाख ६२ हजार ७०६ मे.टन. इतके झाले असून ४ लाख ५४ हजार ६५० क्विंटल साखर तयार झाली आहे. गाळपात विठ्ठलराव शिंदे राज्यात प्रथम तर १०.२६ उतारा घेऊन श्रीपूरचा पांडुरंग  कारखाना राज्यात प्रथम आहे. 

गाळप परवाना काहींना मिळाला नसताना सुरू असलेल्या कारखान्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.  काहींना परवाना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गाळप सुरू असूनही नोंद नसलेल्या कारखान्याबाबत साखर आयुक्तांशी चर्चा करतो.-डॉ. संजय भोसले, प्रादेशिक सहसंचालक 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेPuneपुणेSubhash Deshmukhसुभाष देशमुख