शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सोलापूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 15:20 IST

करमाळ्यात सर्वात कमी पाऊस : डाळिंबाला तेल्या रोगाचा धोका

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १८० मिलिमीटर आहे गतवर्षी १३ आॅगस्ट २०१७ पर्यंत २४६.८२ मिलिमीटर पाऊस पडला होतायंदा या तारखेपर्यंत फक्त ११०.६७ मिलिमीटर पाऊ स पडला आहे

गोपालकृष्ण मांडवकर सोलापूर : यंदा पावसाने मारलेली दडी शेतकºयांची चिंता वाढविणारी आहे. यंदाच्या पावसाने गतवर्षीची सरासरी ओलांडणे तर सोडाच निम्माही पाऊस झाला नाही. यामुळे शेतशिवार तहानलेला असून, पीक परिस्थितीही धोक्यात आली आहे.

१३ आॅगस्टपर्यंतची परिस्थिती विचारात घेता सोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १८० मिलिमीटर आहे. गतवर्षी १३ आॅगस्ट २०१७ पर्यंत २४६.८२ मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा या तारखेपर्यंत फक्त ११०.६७ मिलिमीटर पाऊ स पडला आहे. ही टक्केवारी ४४.७६ आहे. 

सोलापूर जिल्ह्यात सिंचन मोठ्या प्रमाणावर होते. उसाचे क्षेत्र मोठे आहे. असे असतानाही पावसाची टक्केवारी अद्यापही निम्म्याच्या खालीच आहे. यामुळे शेतकºयांची आणि प्रशासनाचीही चिंता यंदा वाढलेली दिसत आहे. आतापर्यंत बार्शीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आहे तर करमाळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे. बार्शीमध्ये                 ७३ मिमी तर करमाळा फक्त ३३.८३ मिमी पावसाची नोंद १३ आॅगस्टपर्यंत झाली आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, माढा, मंगळवेढा या तालुक्यांमध्येही पावसाची स्थिती यंदा फारशी समाधानकारक नाही. तर बार्शीसह करमाळा, पंढरपूर आणि माळशिरस  या तालुक्यात बºयापैकी पाऊस  पडला आहे. 

डाळिंबाचे निम्म्यावर क्षेत्र तेल्याने बाधितजिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड झाली आहे. मात्र या तिन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पंढरपूर तालुक्यात १० हजार १८५.५० हेक्टर क्षेत्रात डाळिंबाची लागवड आहे. त्यापैकी ६ हजार ९२२ हेक्टर क्षेत्र तेल्याने बाधित असल्याचा अहवाल आहे. सांगोला तालुक्यात १४ हजार ७८१ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब असले तरी निम्मे म्हणजे ७ हजार ९४५.५० हेक्टर क्षेत्र तेल्या रोगाने ग्रासले आहे. माळशिरस तालुक्यात ६ हजार ७६० हेक्टरवरील डाळिंबापैकी ३ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाचे पीक तेल्याच्या प्रभावाखाली आले आहे. हमखास नगदी उत्पन्नाचे हे पीक यंदा चांगले असले तरी तेल्या रोगामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

पेरणी क्षेत्र वाढले तरीही दुष्काळाचा धोकाजिल्ह्याचे सरासरी पेरणी क्षेत्र ८९ हजार हेक्टर आहे. मात्र यंदा मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. अडीच पटीने क्षेत्र वाढले असून, १ लाख ९५ हजार ८२२ हेक्टरवर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. पेरणी क्षेत्राची ही टक्केवारी २४८ असल्याची विक्रमी नोंद यंदा प्रथमच कृषी विभागाने घेतली आहे. यात जूनमध्ये पेरणी झालेल्या मूग, उडीद, तसेच तूर, सोयाबिन, सूर्यफूल, भुईमूग या पिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. पेरणीचे क्षेत्र वाढूनही पाऊस पुरेसा नाही. त्यामुळे दुष्काळाचा धोका वाढला आहे. वेळेवर पाऊस न झाल्याने पिके वाया जाण्याची भीती  आतापासूनच शेतकºयांमध्ये व्यक्त होत आहे.

मूग, सोयाबीन, उडीदला माव्याने ग्रासलेमूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांना सध्या मावा रोगाने ग्रासले आहे. या पिकांची पेरणी जून महिन्यात झाली होती. ही पिके सध्या फुलोºयावर असली तरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे पिके धोक्यात आहेत. तूर, सोयाबिन, सूर्यफूल आणि भुईमूग ही पिके वाढीच्या मार्गावर असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसFarmerशेतकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय