शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सोलापूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 15:20 IST

करमाळ्यात सर्वात कमी पाऊस : डाळिंबाला तेल्या रोगाचा धोका

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १८० मिलिमीटर आहे गतवर्षी १३ आॅगस्ट २०१७ पर्यंत २४६.८२ मिलिमीटर पाऊस पडला होतायंदा या तारखेपर्यंत फक्त ११०.६७ मिलिमीटर पाऊ स पडला आहे

गोपालकृष्ण मांडवकर सोलापूर : यंदा पावसाने मारलेली दडी शेतकºयांची चिंता वाढविणारी आहे. यंदाच्या पावसाने गतवर्षीची सरासरी ओलांडणे तर सोडाच निम्माही पाऊस झाला नाही. यामुळे शेतशिवार तहानलेला असून, पीक परिस्थितीही धोक्यात आली आहे.

१३ आॅगस्टपर्यंतची परिस्थिती विचारात घेता सोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १८० मिलिमीटर आहे. गतवर्षी १३ आॅगस्ट २०१७ पर्यंत २४६.८२ मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा या तारखेपर्यंत फक्त ११०.६७ मिलिमीटर पाऊ स पडला आहे. ही टक्केवारी ४४.७६ आहे. 

सोलापूर जिल्ह्यात सिंचन मोठ्या प्रमाणावर होते. उसाचे क्षेत्र मोठे आहे. असे असतानाही पावसाची टक्केवारी अद्यापही निम्म्याच्या खालीच आहे. यामुळे शेतकºयांची आणि प्रशासनाचीही चिंता यंदा वाढलेली दिसत आहे. आतापर्यंत बार्शीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आहे तर करमाळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे. बार्शीमध्ये                 ७३ मिमी तर करमाळा फक्त ३३.८३ मिमी पावसाची नोंद १३ आॅगस्टपर्यंत झाली आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, माढा, मंगळवेढा या तालुक्यांमध्येही पावसाची स्थिती यंदा फारशी समाधानकारक नाही. तर बार्शीसह करमाळा, पंढरपूर आणि माळशिरस  या तालुक्यात बºयापैकी पाऊस  पडला आहे. 

डाळिंबाचे निम्म्यावर क्षेत्र तेल्याने बाधितजिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड झाली आहे. मात्र या तिन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पंढरपूर तालुक्यात १० हजार १८५.५० हेक्टर क्षेत्रात डाळिंबाची लागवड आहे. त्यापैकी ६ हजार ९२२ हेक्टर क्षेत्र तेल्याने बाधित असल्याचा अहवाल आहे. सांगोला तालुक्यात १४ हजार ७८१ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब असले तरी निम्मे म्हणजे ७ हजार ९४५.५० हेक्टर क्षेत्र तेल्या रोगाने ग्रासले आहे. माळशिरस तालुक्यात ६ हजार ७६० हेक्टरवरील डाळिंबापैकी ३ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाचे पीक तेल्याच्या प्रभावाखाली आले आहे. हमखास नगदी उत्पन्नाचे हे पीक यंदा चांगले असले तरी तेल्या रोगामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

पेरणी क्षेत्र वाढले तरीही दुष्काळाचा धोकाजिल्ह्याचे सरासरी पेरणी क्षेत्र ८९ हजार हेक्टर आहे. मात्र यंदा मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. अडीच पटीने क्षेत्र वाढले असून, १ लाख ९५ हजार ८२२ हेक्टरवर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. पेरणी क्षेत्राची ही टक्केवारी २४८ असल्याची विक्रमी नोंद यंदा प्रथमच कृषी विभागाने घेतली आहे. यात जूनमध्ये पेरणी झालेल्या मूग, उडीद, तसेच तूर, सोयाबिन, सूर्यफूल, भुईमूग या पिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. पेरणीचे क्षेत्र वाढूनही पाऊस पुरेसा नाही. त्यामुळे दुष्काळाचा धोका वाढला आहे. वेळेवर पाऊस न झाल्याने पिके वाया जाण्याची भीती  आतापासूनच शेतकºयांमध्ये व्यक्त होत आहे.

मूग, सोयाबीन, उडीदला माव्याने ग्रासलेमूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांना सध्या मावा रोगाने ग्रासले आहे. या पिकांची पेरणी जून महिन्यात झाली होती. ही पिके सध्या फुलोºयावर असली तरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे पिके धोक्यात आहेत. तूर, सोयाबिन, सूर्यफूल आणि भुईमूग ही पिके वाढीच्या मार्गावर असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसFarmerशेतकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय