शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

धक्कादायक; शालेय पोषण आहारातल्या चवळीत निघाले भुंगे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 13:01 IST

निकृष्ट कसा द्यायचा: शिक्षक  झाले त्रस्त, आहार नियोजनावर परिणाम

ठळक मुद्देपंढरपूर तालुक्यात गत महिन्यापासून पुरवठा करण्यात येत असलेली चवळी ही निकृष्ट दर्जाचीपुरवठा करण्यात आलेल्या चवळीत भुंगे आढळून आले प्रत्यक्षात चवळी खराब झालेली आहे, यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली

पंढरपूर :  शालेय भोषण आहारात शासनाकडून देण्यात येत असलेल्या दाळी तसेच कडधान्यामध्ये चवळी ही निकृष्ट दर्जाची पुरवली जात  असल्याचे समोर येत आहे. भुंगे लागलेले असल्याने ती खराब होत असून, वापरण्यायोग राहिलेली नाही. तालुक्यात थोड्याफार फरकाने ही स्थिती असल्याचे समोर येत  आहे. 

शासनाकडून कोणताही मुलगा कुपोषित राहू नये, शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पट वाढावा यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेचा सर्व मुलांना फायदा होत आहे. पोषण आहारात चवळी, मसूर, तूर यासह भाताचा समावेश आहे. मे महिन्यापासून मटकी डाळ बंद करण्यात आली आहे. 

पंढरपूर तालुक्यात गत महिन्यापासून पुरवठा करण्यात येत असलेली चवळी ही निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर येत आहे. पुरवठा करण्यात आलेल्या चवळीत भुंगे आढळून आले आहेत. त्यामुळे चवळी खराब होऊन आहारात वापरण्यायोग्य राहिलेली नाही. आठवड्यातून तीन दिवस चवळीचा आहार देण्याची सूचना देण्यात येत असताना, प्रत्यक्षात चवळी खराब झालेली आहे. यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. चवळी ऐवजी इतर दाळींचा वापर हा पोषण आहारात करावा लागत आहे. 

शासनाकडून आलेले पोषण आहार धान्य हे सुस्थितीत राहावे यासाठी प्रत्येक शाळेकडून सोय केली जात आहे. दोन महिन्यात एकदा धान्याचा पुरवठा केला जातो. गत महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या धान्यामध्ये चवळी वगळता इतर धान्य चांगल्या दर्जाचे आहे. चवळीत ही निकृष्ट असल्याने त्यामध्ये भुंगे लागल्याचे समोर येत आहे. 

तत्काळ कारवाई- शिक्षण विस्तार अधिकाºयांमार्फत पोषण आहारात देण्यात येणाºया चवळी तसेच इतर धान्याची तपासणी करण्यात येईल. चवळीमध्ये सर्वाधिक प्रोटिन्स असतात. पुरवठादाराकडून निकृष्ट दर्जाची चवळी  देण्यात येत असल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली. 

गत महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या चवळीत भुंगे आढळून आले. ती आहारात वापरणे कठीण बनले आहे. धान्य ठेवण्याच्या ठिकाणी  स्वच्छता असतानाही असा प्रकार घडत आहे. यामुळे आहार नियोजनावर परिणाम होत आहे. - आर. आर. भालेराव, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, वाखरी

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा