शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

धक्कादायक; ऊस वाहतुकीच्या निष्काळजीपणाचे जिल्ह्यात ठरले १२३ निष्पाप बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 09:45 IST

ट्रॅक्टराला रिफ्लेक्टर नसल्याने, रस्त्यावर दगड ठेवल्याचे वाढले अपघात

सोलापूर : गळीत हंगामाच्या काळात ऊसाची वाहतूक करताना निष्काळजीपणा अनेकांच्या जीवावर बेततो. गेल्या पाच वर्षांत हाच निष्काळजीपणा जिल्ह्यातील १२३ निष्पापांचा बळी घेणारा ठरला. ऊस वाहतूक ट्रॅक्टराच्या पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्याने आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली ठेवलेले दगड रस्त्यावरच पडल्याने अनेक अपघात घडले आहेत. साखर उद्योगातील बेफिकिरीही या घटनांसाठी तितकीच कारणीभूत असू शकते.

दरवर्षी ऊस वाहतुकीसाठी बीड, परभणी, अहमदनगर आणि नांदेड या चार जिल्ह्यांतून हजारो वाहने सोलापूर जिल्ह्यात येतात. त्यांच्यासोबत हजारो शेतमजूर, ऊसतोडणी कामगार, ठेकेदार, वाहन धारक, चालक असा लवाजमा असतो. ही ऊस तोडणीसाठी आलेली वाहतूक आणि तोडणी यंत्रणा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असते. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची संपूर्ण जबाबदारी याच यंत्रणेवर असते. मात्र, वाहतुकीतील निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो.

पूर्वी जवळच्या वाहतुकीसाठी बैलगाडी आणि दूरच्या वाहतुकीसाठी ट्रकचा वापर केला जात होता. ऊस तोडणी कामगार आणि वाहतूक यंत्रणा त्या काळी मर्यादित होती. गेल्या आठ वर्षांत जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या तुलनेत तोडणी कामगार आणि वाहतूक करणारी वाहने कैकपटीने वाढली. बैलगाड्यांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. ट्रकवाहतूक कमी झाली. वाढत्या संख्येमुळे ट्रॅक्टरच्या वाहतुकीचे अनेक बळी ठरत आहेत .

रस्त्यावरचे दगड जीवघेणे

ऊसाची वाहतूक करताना एका ट्रॅक्टरला २ ट्रेलर जोडले जातात. या दोन्ही ट्रेलरमध्ये प्रत्येकी किमान दहा ते अकरा टन ऊस भरला जातो. वाहन रस्त्यावर चालताना समोर चढ आला तर वाहनाची क्षमता कमी पडते. वाहन थांबवतात आणि चाकाखाली तात्पुरता दगड ठेवतात. किरकोळ बिघाडाच्यावेळी वाहन जागेवर थांबते. नंतर पुढे जाताना रस्त्यांवर ठेवलेले चाकाखालील दगड बाजूला न काढता तसेच निघून जातात. दगड जागेवर तसेच राहिल्याने रात्रीच्या वेळी अनेक वाहनधारक जीवाला मुकतात.

रिफ्लेकटरचा अभाव

बैलगाडी अथवा अथवा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी रस्त्यात बंद पडतात. अशावेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनांना ते स्पष्ट दिसण्यासाठी पाठीमागील बाजूंस रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार अथवा अन्य वाहने त्यावर येऊन आदळतात. त्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. महामार्गावर असे अपघात अधिक होतात.

ओव्हरटेक करताना लांबी नडते

एका ट्रॅक्टरला दोन अथवा कधीकधी तीन ट्रेलर जोडून उसाची वाहतूक केली जाते. रस्त्यावरून जाताना ओव्हरटेक करणाऱ्या वेगवान वाहनांना ट्रेलरची ही लांबी अडचणीची ठरते . वळणं घेत रस्त्यांवरून जातांना चालकाचे त्यावर नियंत्रण नसते. इतर वाहनांना कट बसल्याने अपघात होतात.या लांबीवर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSugar factoryसाखर कारखानेroad safetyरस्ते सुरक्षा