शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

Sharad Pawar : पळपुट्या नेत्यांविरुद्ध संघर्षाची सुरुवात सोलापुरातूनच, पवारांनी सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 2:46 PM

Sharad Pawar : अनेक वर्ष पक्षात महत्त्वाची पदं भूषवलेले अनेक नेते पक्ष सोडून पळून गेले. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता होती. त्यावेळी या पळपुट्या नेत्यांविरोधात संघर्ष करण्याची गरज होती.

ठळक मुद्देकोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सोलापूरला आलो होतो. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधींना घेऊन सोलापूरमध्ये बैठक घेतली होती.

सोलापूर/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे निर्माते खासदार शरद पवार हे 2 दिवसीय सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरात येताच त्यांनी कोरोना कालवधीत घेतलेल्या बैठकीची आणि विधानसभा निवडणुकांच्या आठवणी जागवल्या. तसेच, राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना आता घरी बसवायचं आहे, असे म्हणत सोलापूरातून आपण संघर्षाची सुरूवात केली होती, याची आठवणही पवारांनी सांगितली.  

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सोलापूरला आलो होतो. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधींना घेऊन सोलापूरमध्ये बैठक घेतली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आज सोलापूरमध्ये येण्याचा योग आला. सोलापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याबद्दल प्रशासन, राज्य सरकार आणि आरोग्य कर्मचारी यांना धन्यवाद द्यायला हवे, असे पवार यांनी म्हटले.

तसेच, आणखी एक गोष्ट सोलापूरच्या निमित्ताने आठवली. विधानसभेच्या निवडणुकीआधी सोलापूर जिल्ह्यात अनेक नेत्यांची पळापळ सुरू होती.अनेक वर्ष पक्षात महत्त्वाची पदं भूषवलेले अनेक नेते पक्ष सोडून पळून गेले. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता होती. त्यावेळी या पळपुट्या नेत्यांविरोधात संघर्ष करण्याची गरज होती. तो निर्णय आम्ही घेतला व त्या संघर्षाची सुरुवात याच हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहातून केली. माझे पहिले भाषण येथेच झाले होते. त्यावेळी चर्चा होती की, भाजपचेच सरकार येणार. पण, आज राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण आत्मविश्वासाने लढल्याची आठवण पवार यांनी सोलापुरात करून दिली. 

पाहुण्यांची चिंता वाटत नाही

शरद पवारांनी सोलापुरात जबरदस्त बॅटिंग केली. काल अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण, पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असा टोला पवारांनी लगावला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पवारांनी त्यांना सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) पाठवलेल्या नोटिशीची आठवण सांगितली. विधानसभा निवडणुकीआधी मला बँकेसंदर्भात ईडीची नोटीस आली होती. मी त्या बँकेचा सभासदही नव्हतो, ना त्या बँकेकडून मी कधी कर्ज घेतलं होतं. त्यानंतर काय झालं, ते सगळ्यांनी पाहिलं. मला ईडीची नोटीस दिली आणि सबंध महाराष्ट्रानं भाजपाला येडी ठरवलं, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधलं.

बंदमध्ये शांततेत सहभाग नोंदवा

लखमीपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर भाजपा नेत्याच्या मुलानं गाडी चढवल्याचा प्रकार घडला. त्यावरूनही पवारांनी जोरदार टीका केली. शांततेत निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपा नेत्यांनी गाड्या घातल्या; शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून एक प्रकारे त्यांची हत्याच केली, असा गंभीर आरोप पवारांनी केला. लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामध्ये सहभागी होऊन शांततेच्या मार्गानं निषेध नोंदवा, असं आवाहन त्यांनी केलं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSolapurसोलापूरBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या