शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

रोपळ्याची द्राक्षं कोलकात्याच्या बाजारात; दीड एकरात निघाली २६ टन द्राक्षं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:37 IST

डॉक्टर दाम्पत्याची यशोगाथा: उजाड माळरानावर द्राक्षबाग फुलविली

ठळक मुद्देशेतीकडे आम्ही एक छंद म्हणून पाहिलो़ मागील दोन वर्षांत यामधून लाखो रुपयांचे उत्पादन पहिल्या वर्षी लागवड आणि फाउंडेशनसाठी केलेला खर्च निघालाशेती हा व्यवसाय म्हणून जर पाहिले तर यामधूनही मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात

मारुती वाघमोडनिंब : वैद्यकीय क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कोल्हे दाम्पत्याने उजाड माळरानावर द्राक्षबाग फुलवली आहे़ मशागत, कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने लागवड आणि सलग ७५ दिवस फवारण्या करून अवघ्या दीड एकरावर १३ लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे एका डॉक्टर दाम्पत्याने.

डॉक्टर प्रशांत कोल्हे व डॉक्टर निशिगंधा कोल्हे या दाम्पत्याने रोपळे (ता़ पंढरपूर) येथील स्वत:च्या शेतात ही किमया साधली आहे़ उजाड माळरानावरील या शेतीमध्ये कुसळही उगवत नव्हते, अशा ठिकाणी चार एकरावर मशागत करून जमिनीचे सपाटीकरण करून घेतले़ ती सुपीक बनवली़ आता माळरानावर पाणी आणायचं कुठून? असा प्रश्न उपस्थित झाला़ अशाप्रसंगी अडीच किलोमीटर अंतरावर असणाºया कॅनॉलवरून पाईपलाईन करून पाणी खेचून आणले़ आणलेले पाणी साठवायचे कुठे, असाही प्रश्न त्यांच्यापुढे होता़ त्यासाठी ५० लाख लिटर साठवण क्षमता असणारे एक शेततळे उभारले़ या कॅनॉलमधून ज्यावेळी पाणी सुटले त्यावेळी हे शेततळे भरून घेतले़ त्यानंतर दीड एकरावर द्राक्षाच्या लागवडीचा निर्णय घेतला.

 या दीड एकरात शेणखत वापरले व त्यानंतर १० बाय ५ अंतरावर खड्डे घेऊन रुस्टॉक लावले़ त्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत रोपांची काडी, डोळे भरणे ही कामे करून घेतली़ जानेवारी महिन्यात एस़ एस़ एऩ या वाणाचे डोळे भरले़ त्यानंतर प्रत्येक वेलीजवळ एक बांबू आधारासाठी लावला़ त्याची वाढ होऊ लागताच लोखंडी वाय आकाराचे फाउंडेशन उभारले़ वाय आणि एच आकाराची काडी तयार करण्यात आली़ फलधारणा झाली आणि आॅक्टोबरमध्ये छाटणी करण्यात आली़ फलधारणेसाठी फवारणी करण्यात आली़ बहार धरण्यात आल्यानंतर कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने सलग ७५ दिवस फवारण्या करून वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव रोखला.

दररोज २० लिटर पाणी - दीड एकर क्षेत्रावर प्रत्येक रोपाला ठिबकद्वारे दररोज २० लिटर पाणीपुरवठा केला़ साडेतीन महिन्यांनंतर द्राक्ष जागेवर येऊन स्थानिक व्यापाºयांनी खरेदी केली़  तो काढला जात आहे़यंदा ५० रुपये किलो दर मिळण्याची अपेक्षा आहे़ यातून २६ टन उत्पादन मिळेल़ १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे़

शेतीकडे आम्ही एक छंद म्हणून पाहिलो़ मागील दोन वर्षांत यामधून लाखो रुपयांचे उत्पादन मिळाले आहे़ पहिल्या वर्षी लागवड आणि फाउंडेशनसाठी केलेला खर्च निघाला़ शेती हा व्यवसाय म्हणून जर पाहिले तर यामधूनही मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात़ सध्या स्पर्धेचे युग असून, शेतकरी चांगल्या प्रतीची द्राक्षं बाजारात आणली तरच पैसे मिळतील़- डॉ़ प्रशांत कोल्हे, द्राक्ष उत्पादक, रोपळे

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी