शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

रोपळ्याची द्राक्षं कोलकात्याच्या बाजारात; दीड एकरात निघाली २६ टन द्राक्षं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:37 IST

डॉक्टर दाम्पत्याची यशोगाथा: उजाड माळरानावर द्राक्षबाग फुलविली

ठळक मुद्देशेतीकडे आम्ही एक छंद म्हणून पाहिलो़ मागील दोन वर्षांत यामधून लाखो रुपयांचे उत्पादन पहिल्या वर्षी लागवड आणि फाउंडेशनसाठी केलेला खर्च निघालाशेती हा व्यवसाय म्हणून जर पाहिले तर यामधूनही मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात

मारुती वाघमोडनिंब : वैद्यकीय क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कोल्हे दाम्पत्याने उजाड माळरानावर द्राक्षबाग फुलवली आहे़ मशागत, कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने लागवड आणि सलग ७५ दिवस फवारण्या करून अवघ्या दीड एकरावर १३ लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे एका डॉक्टर दाम्पत्याने.

डॉक्टर प्रशांत कोल्हे व डॉक्टर निशिगंधा कोल्हे या दाम्पत्याने रोपळे (ता़ पंढरपूर) येथील स्वत:च्या शेतात ही किमया साधली आहे़ उजाड माळरानावरील या शेतीमध्ये कुसळही उगवत नव्हते, अशा ठिकाणी चार एकरावर मशागत करून जमिनीचे सपाटीकरण करून घेतले़ ती सुपीक बनवली़ आता माळरानावर पाणी आणायचं कुठून? असा प्रश्न उपस्थित झाला़ अशाप्रसंगी अडीच किलोमीटर अंतरावर असणाºया कॅनॉलवरून पाईपलाईन करून पाणी खेचून आणले़ आणलेले पाणी साठवायचे कुठे, असाही प्रश्न त्यांच्यापुढे होता़ त्यासाठी ५० लाख लिटर साठवण क्षमता असणारे एक शेततळे उभारले़ या कॅनॉलमधून ज्यावेळी पाणी सुटले त्यावेळी हे शेततळे भरून घेतले़ त्यानंतर दीड एकरावर द्राक्षाच्या लागवडीचा निर्णय घेतला.

 या दीड एकरात शेणखत वापरले व त्यानंतर १० बाय ५ अंतरावर खड्डे घेऊन रुस्टॉक लावले़ त्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत रोपांची काडी, डोळे भरणे ही कामे करून घेतली़ जानेवारी महिन्यात एस़ एस़ एऩ या वाणाचे डोळे भरले़ त्यानंतर प्रत्येक वेलीजवळ एक बांबू आधारासाठी लावला़ त्याची वाढ होऊ लागताच लोखंडी वाय आकाराचे फाउंडेशन उभारले़ वाय आणि एच आकाराची काडी तयार करण्यात आली़ फलधारणा झाली आणि आॅक्टोबरमध्ये छाटणी करण्यात आली़ फलधारणेसाठी फवारणी करण्यात आली़ बहार धरण्यात आल्यानंतर कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने सलग ७५ दिवस फवारण्या करून वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव रोखला.

दररोज २० लिटर पाणी - दीड एकर क्षेत्रावर प्रत्येक रोपाला ठिबकद्वारे दररोज २० लिटर पाणीपुरवठा केला़ साडेतीन महिन्यांनंतर द्राक्ष जागेवर येऊन स्थानिक व्यापाºयांनी खरेदी केली़  तो काढला जात आहे़यंदा ५० रुपये किलो दर मिळण्याची अपेक्षा आहे़ यातून २६ टन उत्पादन मिळेल़ १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे़

शेतीकडे आम्ही एक छंद म्हणून पाहिलो़ मागील दोन वर्षांत यामधून लाखो रुपयांचे उत्पादन मिळाले आहे़ पहिल्या वर्षी लागवड आणि फाउंडेशनसाठी केलेला खर्च निघाला़ शेती हा व्यवसाय म्हणून जर पाहिले तर यामधूनही मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात़ सध्या स्पर्धेचे युग असून, शेतकरी चांगल्या प्रतीची द्राक्षं बाजारात आणली तरच पैसे मिळतील़- डॉ़ प्रशांत कोल्हे, द्राक्ष उत्पादक, रोपळे

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी