शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athavale: 'संजय राऊतांनी मुलीच्या लग्नात पाहिजे तेवढा खर्च करावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 14:57 IST

सोलापूर/पंढरपूर - शिवसेना नेते संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गेल्या ...

सोलापूर/पंढरपूर - शिवसेना नेते संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरुन, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, भाजपला याबाबत काहीच आक्षेप नसल्याचं आठवलेंनी म्हटलं. 

खाजगी कार्यक्रमानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोमवारी पंढरपूर येथे आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपाइंचे राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, संतोष पवार, ॲड. कीर्तिपाल सर्वगोड, सचिन भोसले आदी उपस्थित होते. आठवले पुढे म्हणाले, पाच राज्यांत निवडणुका होत आहेत. त्या ठिकाणी भाजप व एनडीएची सत्ता येणार आहे. राज्य सरकार योग्य काम करीत नाही. देशातील इतर राज्यांतील रस्त्यांच्या तुलनेने आपल्या राज्यातील रस्ते खूप खराब आहेत. रस्त्यांवर खूप खड्डे आहेत. याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. राज्य सरकार दलित समाजावर अन्याय करीत आहे. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला निधी दिला नाही. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आ. रमेश कदम यांना शिक्षा झाली आहे, परंतु त्यांची शिक्षा दलित समाजातील तरुणांना देऊ नये. राज्य सरकारने या महामंडळासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. रिपाइं सतत मुस्लीम समाजाच्या बाजूनेच असते. परंतु हिजाबवरून शाळेसारख्या पवित्र ठिकाणी धर्म आणू नये, असे खा. आठवले यांनी सांगितले.

राऊतांनी मुलीच्या लग्नात पाहिजे तेवढा खर्च करावा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहसोहळा एका  पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला. या सोहळ्यातील कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात आठवलेंनी मत व्यक्त केले आहे. शिवसेनेचे खा. संजय राऊत सतत मोदींवर टीका करीत असतात. त्यांच्या या कृतीचा फटका शिवसेनेलाच बसेल. राऊत यांनी त्यांच्या मुलीचे लग्न जसे करायचे तसे करावे. लग्नात पाहिजे तेवढा खर्च करावा, याबाबत भाजपचा काही आक्षेप नसल्याचे खा. आठवले म्हणाले.

ब्लॅक पँथर चळवळ पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्न सुरू

पँथरला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. संघर्ष करणारी संघटना रिपाइंबरोबर असावी, असा कार्यकर्त्यांचा विचार आहे. यामुळे ब्लॅक पँथर चळवळ पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असल्याचे आठवले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना