शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

पावसाच्या पाण्याने बोरामणी येथील शेततळ्यात पावणेदोन कोटी लिटर पाणी भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:09 PM

सोलापूर : सोलापूर म्हटले की दुष्काळी जिल्हा अशी ओळख. यंदा तर ५० टक्केही पाऊस नसल्याने सगळीकडे पाणीटंचाईच. अशा परिस्थितीत ...

ठळक मुद्देबोरामणीच्या शेतकºयाचा उपक्रम वीस एकर द्राक्षबाग बहरली, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुकपावसाच्या पाण्याने पावसाळ्यात शेततळे भरून घेतले

सोलापूर : सोलापूर म्हटले की दुष्काळी जिल्हा अशी ओळख. यंदा तर ५० टक्केही पाऊस नसल्याने सगळीकडे पाणीटंचाईच. अशा परिस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील शेतकरी सिद्राम बिराजदार यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पावणेदोन कोटी लिटर पाण्याचा साठा शेततळ्यात पावसाच्या पाण्याने करून ठेवला आहे. या पाण्यावर बिराजदार यांची वीस एकर द्राक्षबाग बहरत असून त्यांच्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भरभरून कौतुक केले आहे.

बिराजदार यांनी मागील वर्षी आपल्या शेतात सुमारे अर्धा एकर क्षेत्रात सामूहिक शेततळे योजनेतून तळे बांधले. यासाठी त्यांना तब्बल १५ लाख रुपयांचा खर्च आला आहे. राज्य शासनाचे त्यांना ३ लाख ३९ हजार रुपयांचे अनुदान यासाठी मिळाले आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी, यासाठी बिराजदार यांनी पावसाच्या पाण्याने पावसाळ्यात शेततळे भरून घेतले. त्यानंतर विहीर व बोअरच्या पाण्याचाही साठा याठिकाणी केला. त्यामुळे त्यांच्या आज सुमारे वीस एकर द्राक्षबागेस पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शेततळ्यामधील पाण्याचा आधार असल्याने बिराजदार यांनी सरिता, नानासाहेब, थॉमसन, आर. के., शरद, मणिकर, डबल एस आदी जातींची द्राक्षलागवड केली आहे. यासाठी त्यांनी आतापर्यंत वीस एकर क्षेत्रासाठी तीस ते चाळीस लाख रुपयांचा खर्चही औषधे, मजुरी आदींसाठी केला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत बिराजदार शेतकरी कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सने सोमवारी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असताना शेततळ्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या बागायती शेतीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. शेततळे बांधण्यासाठी अनुदान अपुरे असून अनुदान वाढविण्यात यावे, ठिबक सिंचनसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी यावेळी सिद्राम बिराजदार यांचे सुपुत्र आप्पा यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. मागेल त्याला शेततळे योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या दोन्ही योजनांतून शेततळे घेण्याचा मार्ग आता मोकळा असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बागायतदार शेतकरी सिद्राम यांच्या पत्नी निर्मला यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी संवाद साधला. 

एक कोटीचे द्राक्ष काढणार - बिराजदार- शेततळ्याच्या पाण्यावर विविध प्रकारच्या जातीचे द्राक्ष उत्पादन घेण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत आहे. गतवर्षी सुमारे ५० लाख रुपयांची द्राक्षं यु.के व बांगलादेश यासारख्या देशासाठी निर्यात झाली आहेत. यंदाच्या वर्षीही निर्यात होणार असून, यातून सुमारे एक कोटी रुुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया यावेळी आप्पा बिराजदार यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरीagricultureशेतीWaterपाणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgovernment schemeसरकारी योजना