शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

खुल्या भरतीतील अटी रद्द करत डाकसेवक बनले मुंबईचे पोस्टमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 3:21 PM

दीड वर्षाची लढाईला मिळाले यश;  राज्यातल्या १५२ डाकसेवकांनाही खात्यात सामावून घेतले

ठळक मुद्देखुल्या भरतीतील अटी रद्द करायला भाग पाडल्याने राज्यभरातील १५२ ग्रामीण डाकसेवक आता मुंबईत पोस्टमन म्हणून दाखल झाले ग्रामीण डाकसेवकावर अन्याय करणारा नियम पोस्टमनसाठी आणला गेला होता़ दहा-दहा वर्षे सेवा करणाºया सेवकाला संधीच नव्हती़

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : खुल्या भरतीसाठी लावलेल्या नियमाविरोधात दीड वर्षांपासून लढा देऊन ग्रामीण पोस्टमन संघटनेने अटीच रद्द करायला लावल्या़ तसेच मुंबईतल्या रिक्त जागांवर खात्यांतर्गत काम करणाºया ग्रामीण डाकसेवकांना संधी देण्यास भाग पाडले आहे़ मागील महिन्यात पंढरपूर विभागातून दोन तर सोलापूर शहर विभागातील तीन ग्रामीण डाकसेवकांनी मुंबईचे पोस्टमन म्हणून काम करण्याची संधी मिळवली आहे.

काही दिवसांपूर्वी पोस्टामध्ये खुली नोकरभरती सुरू करण्यात आली़ दहावी उत्तीर्ण झालेले खात्यांतर्गत कर्मचारी हे डाकसेवक म्हणून काम करायला लागले़ दहावी इयत्तेवर सेवेत दाखल झालेल्यांना पुढे पोस्टमन म्हणून संधी नव्हती़ मात्र खुल्या भरतीमध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला वाहन परवाना आणि एमएस-सीआयटीची पात्रता लावून कोणत्याही शहरातील उमेदवाराला चक्क पोस्टमन पदावर संधी दिली.

 दुजाभाव करणारा नियम ग्रामीण डाकसेवकांना भेडसावू लागला़ आॅल इंडिया पोस्टमन एम्प्लॉईज युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण चाळके यांच्या नेतृत्वाखाली सेके्रटरी राजेश सागर आणि ग्रामीण डाकसेवक राजकुमार आतकरे यांनी मुंबईचे संचालक व्यवहारे आणि दिल्ली कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला़ ‘खुल्या भरतीत उमेदवारांना लावलेल्या अटी रद्द करा आणि खात्यांतर्गत जुन्या पद्धतीच्या अटी लागू करा’ हा एकच मुद्दा घेऊन पाठपुरावा चालवला़ खुल्या भरतीमुळे खात्यांतर्गत ग्रामीण डाकसेवकांवर अन्याय व्हायचा आणि त्यांना पुढे संधी मिळत नव्हती.

अन् मार्चमधील परीक्षा पुढे ढकलली- खुल्या भरतीत लावलेल्या नियम-अटी रद्द झाल्या़ तत्पूर्वी मार्चमध्ये पोस्टमनसाठी होणाºया परीक्षार्थींपैकी जे पात्र ठरले होते त्यांना थांबवत ही परीक्षाच पुढे ढकलायला लावली़ आता ही भरती खात्यांतर्गत होणार असल्याचे ग्रामीण डाकसेवक संघटनेकडून सांगितले जाते़ तसेच आता ग्रामीण डाकसेवकही संगणक प्रशिक्षण घेऊन पोस्टमन होऊ शकतात़ 

मुंबईचे पोस्टमन झालेले ग्रामीण डाकसेवक- पंढरपूर विभाग - पांडुरंग सुरेश काळे (बिटरगाव), संजय देवकुळे (नातेपुते)सोलापूर विभाग - आरशिया जहागीरदार (सय्यद वरवडे), मुल्ला (होनमुर्गी), रत्नाबाई अचलेरे (शिंगडगाव).

ग्रामीण डाकसेवकावर अन्याय करणारा नियम पोस्टमनसाठी आणला गेला होता़ दहा-दहा वर्षे सेवा करणाºया सेवकाला संधीच नव्हती़. खुल्या भरतीतील अटी रद्द करायला भाग पाडल्याने राज्यभरातील १५२ ग्रामीण डाकसेवक आता मुंबईत पोस्टमन म्हणून दाखल झाले आहेत़ तसेच सोलापूर आणि पंढरपूर विभागातून पाच जणांनाही त्यामध्ये संधी मिळाली आहे़ - राजकुमार आतकरे सचिव, ग्रामीण डाकसेवक 

टॅग्स :SolapurसोलापूरPost Officeपोस्ट ऑफिसMumbaiमुंबई