शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध पाण्याच्या नावाखाली बोगस कंपन्या पाजतायंत सोलापूरकरांना बोअरिंगचं घाणेरडं पाणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 14:17 IST

विलास जळकोटकर  सोलापूर : एकीकडे उजनीचे दूषित पाणी.. सोलापूरकरांना विषाणूजन्य आजाराने घातलेला विळखा.. डॉक्टरांकडून शुद्ध पाणी वापराचा सल्ला.. त्यामुळे ...

ठळक मुद्देकोणताही शासकीय परवाना नाही, अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद नाहीप्रयोगशाळेतून पाण्याची तपासणी नाही, तरीही रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल विशेष म्हणजे या जारमधील पाणी ‘लोकमत टीम’ने तपासले असता तब्बल ४६८ टीडीएस इतका निघाला

विलास जळकोटकर 

सोलापूर: एकीकडे उजनीचे दूषित पाणी..सोलापूरकरांना विषाणूजन्य आजाराने घातलेला विळखा.. डॉक्टरांकडून शुद्ध पाणी वापराचा सल्ला.. त्यामुळे घाबरुन सोलापूरकरांनी शुध्द पाण्याचे जार घरी मागवण्यास सुरुवात केली. मग काय? या परिस्थितीचा गैरफायदा उचलून बोगस मिनरल वॉटरच्या उद्योगाला उधाणच येणार नाही तर काय? होय.. गेली कित्येक वर्षे सोलापूर शहर आणि परिसरात मिनरल वॉटरच्या नावाखाली विनापरवाना दूषित पाणी पुरवणारी टोळी सक्रिय झाली आहे. 

सोलापूर शहरात ७०० हून अधिक आणि जिल्ह्यात १००० च्यावर मिनरल वॉटर प्लान्ट थाटले आहेत. यातील नोंदणीकृत प्लान्टची संख्या फार कमी आहे. २० लिटर पाण्याच्या जारची किंमत २० ते ३० रुपये आकारली जाते. मात्र यातून मिळणारे पाणी किती शुद्ध आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुन गुनिया, कावीळ अशा साथीच्या रोगांनी थैमान मांडले. उपचारासाठी हॉस्पिटलकडे जाणाºया रुग्णांना डॉक्टरांकडून दूषित पाण्यामुळे असे आजार उद्भवत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्याच्या भीतीने अनेकांचा ओढा साहजिकच मिनरल वॉटरकडे मोठ्या प्रमाणात वळू लागला आहे. नेमका याचाच लाभ उठवत अनेकांनी मिनरल वॉटरचे प्लान्ट उभारले. काहींनी नियमानुसार नोंदी करुन व्यवसाय सुरु केलाय, मात्र ही संख्या नगण्य आहे. 

आपल्या पाल्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी पालकांनी मिनरल वॉटरचे जार मागवले खरे, पण नेमके त्याची शुद्धता किती याची पाहणी करण्याचे कष्ट फारसे कोणी घेत नाही. खरंच या पाण्याचा टीडीएस (टोटल डिझाल्व्ह सॉलीड) पाहिलाय का? तर नाही हेच उत्तर अनेकांशी साधलेल्या संवादावरुन आढळून आलंय. बोअर, विहिरीतील घाणेरडे पाणी उपसायचे अन् थंड करुन हेच मिनरल वॉटर म्हणून विकायचे असा सारा खटाटोप सर्रासपणे सुरु आहे. यामुळे काही अधिकृतपणे नोंदणी करुन झार पुरवणाºया मंडळींची मात्र गोची होतेय. इकडं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जारच्या पाण्याचा वापर करुनही आजार हटण्याचं नाव घेतलं जात नाही, अशावेळी पालक त्रासले आहेत. यामुळे मिनरल वॉटर म्हणून विकल्या जाणाºया झारवर प्रश्न निर्माण झाले आहे. 

मिनरल वॉटरच्या गावोगावी निर्माण झालेल्या या व्यवसायावर कोणाचा तरी अंकुश असायला हवा. दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष होत असल्याने सोलापूर जिल्ह्यात काय देशभर दूषित पाण्याची समस्या निर्माण झालीय. अन्न व औषध प्रशासनाकडे फक्त मिनरल वॉटर सील केलेले बॉटल आणि जार यांचीच नोंदणी झाल्याचे दिसते. 

सध्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु असलेले प्लान्ट अन्न व औषध प्रशासनाच्या कक्षेत

टीडीएस ३० ते ९० दरम्यान असावा- उजनी जलाशयातून उपलब्ध होणाºया पाण्याचा टीडीएस १००० ते १२०० पर्यंत आहे. तर अन्य पाण्याचा टीडीएस सरासरी ५०० ते ८०० च्या दरम्यान आहे. त्यामुळे हे पाणी आरोग्यासाठी अपायकारक ठरते. वास्तविक पाहता शुद्धीकरण करताना तो ३० ते ९० च्या दरम्यान खाली आणला जातो, तरच ते पाणी पिण्यायोग्य मानले जाते, अशी माहिती या व्यवसायातील सुहास आदमाने यांनी दिली. यावेत म्हणून मंत्रालयापर्यंत मागणी करुनही त्याची पूर्तता होत नसल्याची खंत शासकीय सूत्रांनी दिली.

पाण्याचे नमुने तपासून घेणे बंधनकारक- सरकारी नियमानुसार मिनरल वॉटरचा व्यवसाय करणाºया मंडळींनी वेळोवेळी शासनाने प्रमाणित केलेल्या एनएबीएल यांच्याकडूनच पाण्याचे नमुने तपासून घेतले पाहिजेत. त्याशिवाय पाण्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. अनेक मंडळी खासगी लॅबमधून पाण्याची तपासणी करतात. आमच्याकडे जारच्या पाण्याबद्दलचे नमुने तपासणीसाठी येणारे प्रमाण फार कमी असल्याचे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे प्रभारी कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस. बी. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

खुल्या जारमधून पाणी विक्री बेकायदेशीर- शुद्ध आणि थंड पाण्याच्या जारची सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. वास्तविक पाहता अशा खुल्या पाणी विक्रीला बंदी आहे. सीलबंद पाणीविक्रीसाठी परवाना आवश्यक आहे. त्यासाठी प्रयोगशाळेची सक्ती आहे. जिल्ह्यात असे शुद्ध पाण्याचे ३९  आणि थंड पाण्याचे ४०० प्लान्ट परवानाधारक असल्याची माहिती पुढे आली आहे. खुल्या जारमधून पाणीविक्रीस बंदी असून, ती शहर, जिल्ह्यात खुलेआम सुरु आहे. त्यावर शासनाच्या अन्न भेसळ विभागाचे नियंत्रण नाही. दरम्यान अन्न औषध प्रशासनाने यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले मात्र कार्यवाही झाली नाही.

वर्षाला ४५ लाखांचे नुकसान- वास्तविक सोलापूर जिल्ह्यात १५०० हून अधिक मिनरल वॉटरचे प्लान्ट आहेत. प्रत्येकांना वर्षभरासाठी परवाना मिळवण्यासाठी ३ हजार रुपये मोजावे लागतात. जिल्ह्यातील हे दीड हजार जारधारकांकडून किमान ४५ लाख बुडतात. तरीही पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर शासनही गांभीर्याने घेताना दिसत नाही.

कोणत्या घटकाची होते तपासणी- शासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी आलेल्या पाण्याची दोन प्रकारे तपासणी केली जाते. यात रासायनिक, अनुजीव तपासणीसाठी अनुक्रमे ६०० अन् ३०० रुपये अधिकृत फी आकारली जाते. कोलीफाम आणि थर्मोटॉलरन्ट या विषाणूंचे किती प्रमाण आहे यावरुन पाण्याची शुद्धता निश्चित केली जाते. यात शुद्ध पाण्याचे परिणाम ठरवण्यासाठी टीडीएस (एकूण विद्राव्य घटक) किमान ५०० च्या आत असणे आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार आणि कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस. बी. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सांगोला धाडीनंतर ‘लोकमत’चा शोध- कोणताही शासकीय परवाना नाही, अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद नाही, प्रयोगशाळेतून पाण्याची तपासणी नाही, तरीही रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल या मिनरल वॉटरच्या माध्यमातून सुरु आहे. ग्रामीण भागदेखील यातून सुटला नाही. सांगोल्यात एका बोगस कंपनीवर धाड पडल्यानंतर ‘बातमी मागची बातमी’ शोधण्यासाठी लोकमत टीम लागली कामाला. विशेष म्हणजे या जारमधील पाणी ‘लोकमत टीम’ने तपासले असता तब्बल ४६८ टीडीएस इतका निघाला.

दूषित पाण्यातील विषाणूजन्य जंतूमुळे उलटी, जुलाब, हेपॅटायटिस ए अर्थात कावीळ, सर्दी, ताप, खोकला, पोटाचे विकार आदी आजार उद्भवतात़ लहान मुले आणि वृद्धांना याची जलदगतीने लागण होते.  - प्रा. डॉ. विठ्ठल धडके, व्ही. एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर

पाण्याच्या गुणवत्तेबद्दल तपासणी अधिकार आमच्याकडे आहेत, मात्र यासाठी मानदे कायद्यानुसार सीलबंद असलेल्या मिनरल वॉटर बाटल्या आणि जारची तपासणी होते. जारद्वारे लूज पाणी विक्री करणारे व्यावसायिक आमच्या कक्षेत येत नाहीत. मुळात सीलबंद शिवाय अन्य पाणी विक्री करता येत नाही.- प्रदीप राऊत, सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater transportजलवाहतूक