शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

पथदर्शी कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 10:46 AM

दिनविशेष...- कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी केली रयत शिक्षण संस्थेची स्थापना

आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक आहे. कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये काले, ता. कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. चालू वर्ष हे संस्थेचे शताब्दी वर्ष आहे. 

या शतकात महाराष्टÑाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासात रयत शिक्षण संस्थेने अत्यंत भरीव असे योगदान दिलेले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाचा स्वाभिमान जागृत करणे, जातीविरहित समाज निर्मिती, विद्यार्थी आणि समाजात श्रमप्रतिष्ठेचा मूलमंत्र रुजविणे हीच खरी कर्मवीर अण्णांच्या कार्याची दिशा होती. याशिवाय अण्णांनी एक अतिशय व्यवहारिक विचार प्रत्यक्ष कृतीत आणला तो म्हणजे, समाजात सर्वार्थाने स्वावलंबन साध्य करावयाचे असेल तर शिक्षण, शेती व ग्रामीण विकास या परस्परपूरक बाबींच्या एकत्रित विकासाचा विचार होय.  

दुर्गम खेडोपाड्यात, वाड्यावस्त्यांवर, अति मागास भागात सर्व जाती-धर्माच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे व शाळा स्थापन करण्यासाठी अण्णांनी महाराष्टÑभर पायपीट केली. त्या काळात त्या परिसरातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांचे दैन्य त्यांनी जवळून पाहिले होते म्हणून शिक्षण प्रसाराबरोबरच ग्रामीण रयतेला आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभे करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या सल्ल्याने व सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने अण्णांनी जमिनी खंडाने मिळविल्या. देवापूर, हिंगणी, पळसवडे या राजेवाडी तलावाच्या पंचक्रोशीतील शेतकºयांना एकत्रित करून १९५२ मध्ये ‘सहकारी शेती संस्था’ स्थापन केली. सभासद शेतकºयांच्या जीवनात खºया अर्थाने आर्थिक परिवर्तन झाले. 

देवापूर गावाने तर त्या साली सरकारला सर्वाधिक लेव्ही दिल्यामुळे गावाला १० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. १९५३ मध्ये जॉन मथाई (भारताचे माजी अर्थमंत्री) यांनी या सहकारी शेतीच्या प्रयोगाला आवर्जून भेट देऊन कर्मवीरांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पुढे टाटा ट्रस्टच्या ‘रुरल डेव्हलपमेंट बोर्डा’ने कर्मवीर भाऊरावांच्या सहकार्याने त्याच परिसरातील देवापूर, गंगोती, हिंगणी, जांभुळणी, पानवन, पुळकोटी, पळसवडे, शिरताव व वळई या नऊ गावांच्या आर्थिक विकासाचा आराखडा तयार केला व या गावात शेती व ग्रामीण विकासाच्या अनेक योजना यशस्वीपणे कार्यान्वित केल्या. 

हे अण्णांचे कार्य पाहून ग्वाल्हेरच्या जिवाजीराव शिंदे यांनी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे, जामगाव, कर्जत, कोळपेवाडी, प्रवरानगर इ. ठिकाणची शेकडो एकर जमीन अण्णांच्या झोळीत दान म्हणून टाकली. पुढे सांगली जिल्ह्यातील आष्टा, कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी अशा महाराष्टÑातील अनेक ठिकाणी अनेक दानशूरांनी अण्णांना जमिनी दान केल्या. अण्णांनी त्या-त्या परिसरातील शेतकरी, संस्थेच्या शाखेतील विद्यार्थी व रयत सेवकांच्या सहाय्याने या जमिनीची मशागत करून अनेक ठिकाणी फळबागा फुलविल्या. शाळा व महाविद्यालयांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून दिले. 

शाहू महाराजांनी रुकडी येथील दान म्हणून अण्णांना दिलेल्या १०१ एकर जमिनीवर सध्या संस्थेने पायलट प्रोजेक्ट म्हणून फळबाग प्रकल्प साकारलेला आहे. ‘शेतकºयांची प्रतिष्ठा वाढली तर देशाची प्रतिष्ठा वाढेल’ हे खरे तर या पाठीमागचे अण्णांचे तत्त्वज्ञान होते. सध्या महाराष्टÑातील दुष्काळी भागाची अवस्था अतिशय चिंताजनक अशी आहे. शेतकरी आणि युकांचे आत्मबळ वाढविण्याचे काम कर्मवीरांनी केले. त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य झिजविले. ग्रामीण मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट उपसले. त्या पार्श्वभूमीवर कर्मवीर भाऊराव अण्णांचे शेती विकासाचे प्रयोग महाराष्टÑाला निश्चितच पथदर्शी ठरतील.- प्रा. उत्तमराव हुंडेकर(लेखक हे सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा