शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

टोल नाक्यावरून पास, पण शहराच्या नाक्यावर थांबून राहिली जड वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:22 IST

सोलापूर : संचारबंदीमुळे संपूर्ण राज्यभरात जड वाहतुकीचे प्रमाण घटले आहे. सोलापुरातील प्रमाण ६० टक्‍क्‍यांवर आले आहे. सकाळी सात ते ...

सोलापूर : संचारबंदीमुळे संपूर्ण राज्यभरात जड वाहतुकीचे प्रमाण घटले आहे. सोलापुरातील प्रमाण ६० टक्‍क्‍यांवर आले आहे. सकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान जड वाहतुकीला नो एंट्री करण्यात आली असून या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे, याचा ट्रान्सपोर्ट व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला असून या काळात नो एंट्री उठवून शहरातून जड वाहतुकीला परवानगी मिळावी यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने हालचाली चालवल्या आहेत.

सध्या सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत जड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून कर्नाटक, आंध्रमध्ये जाणाऱ्या वाहतूकदारांची मोठी गोची होत आहे. सध्या ४० टक्केच वाहतूक सुरू असून दूध आणि फळे वगळता वन औषधे, अन्नधान्य यांची वाहने ही टोल नाके पार करून आली, मात्र शहराच्या नाक्यावर ही वाहने अडकून पडली आहेत. महाराष्ट्रातील संचारबंदीनंतर आता आंध्र आणि कर्नाटमध्ये लॉकडाऊन होत आहे. येथे थांबणाऱ्या वाहनांचा दोन्ही राज्यांतील वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

--

कोठून काय वाहतूक होते...

मराठवाडा : केमिकल

विशाखापट्टणम : गॅस सिलिंडर, ऑक्सिजन

बंगळुरू : इंजेक्शन, औषधी गोळ्या

हुबळी : आयुर्वेदिक औषधे

हैदराबाद : औषधे

---

सध्या संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक थांबली आहे. वाहतूक व्यवसायाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अनेक लोकांचा रोजगार थांबला असून या लोकांना अन्नधान्यासह औषधांची गरज पडत आहे. टोल नाक्यावरून ही वाहने शहराच्या सीमेवर येतात, मात्र नो एंट्रीमुळे नाक्यावरच थांबून राहतात. सध्या नो एंट्री उठवण्याची गरज आहे.

- उदयशंकर चाकाेते,

सदस्य ऑल इंडिया काँग्रेस ट्रान्सपोर्ट असोसिएशन

मुंबई, पुणेमार्गे मधुमेहाची औषधे, साध्या सर्दी, ताप, खोकल्यावरील औषधांची वाहतूक वाढली आहे. त्याचबराेबर अन्नधान्याची वाहतूक होते. यापैकी बरीच वाहतूक ही शहराच्या नाक्यावर थांबली आहे. यापूर्वी पालकमंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

- प्रकाश अवसेकर,

सदस्य, ऑल इंडिया काँग्रेस ट्रान्सपोर्ट असोसिएशन

सध्या संचारबंदी असून जड वाहतुकीला पूर्वीपासून केवळ रात्री नऊ ते सकाळी सात या वेळेत मुभा दिली आहे. यामुळे रात्रीत आलेल्या गाड्या गोडावूनपर्यंत आणून उतरवणे हे जिकिरीचे आहे. याला संचारबंदीचे नियम अडसर ठरताहेत. रात्री दुकाने आणि गोडावून उघडता येत नाहीत.

- केशव हिरासकर,

व्हीआरएल ट्रान्सपोर्ट