शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:19 PM

कोणतेही मूल ते लहान असो किंवा तरुण हे त्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे प्रसंगी जगाचे भविष्य असते.

ठळक मुद्देआई-वडील दिवसभर नोकरी, व्यवसायानिमित्त व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी ते नक्की देऊ शकतात. कोणतीही गोष्ट तो आई-वडिलांपाशी बोलेल एवढा मोकळेपणा या नात्यात असणे गरजेचे आहे

लहान मूल म्हणजे एक कोरी करकरीत पाटी. त्या पाटीवर जसे गिरवाल तसे त्याचे व्यक्तिमत्त्व घडत जाते, त्याचे आयुष्य बनत जाते. पण या पाटीवर गिरविण्याची मुख्य भूमिका कोणाची?, तर ती त्याच्या पालकाची म्हणजेच आई-वडिलांची, त्यानंतर मग त्याचे शिक्षक, मित्रमंडळी व समाजाची. यातील नंतरचे घटक निवडण्यामध्ये व त्यावर लक्ष ठेवण्यामध्ये पालक आपली भूमिका चांगल्या रितीने वठवू शकतात. पण पालकाची भूमिका चुकली तर सारेच चित्र बिघडू शकते. लहान मूल विशेषत: आईच्या अगदी जवळ असते़ त्यास योग्य ते संस्कार करणे, चांगले वळण लावणे, शिस्त लावणे हे आईशिवाय चांगल्या रीतीने कोण करू शकेल? मूल शाळेत जायला लागल्यानंतर मात्र ही जबाबदारी आई-वडील दोघांची बनते. 

ज्या घरात आजी- आजोबा आहेत त्या घरात मुलांच्या जडणघडणीत त्यांचादेखील वाटा असतो. आजच्या काळात आई-वडील दोघांनाही नोकरी, व्यवसाय करणे क्रमप्राप्त असले तरी एकत्र कुटुंब टिकवणे, मुलांना त्यांच्या आजी-आजोबांच्या छायेत ठेवणे हे तरी पालक निश्चितपणे करू शकतात. 

आई-वडील दिवसभर नोकरी, व्यवसायानिमित्त व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी ते नक्की देऊ शकतात. त्याच्याशी संवाद साधू शकतात. त्याच्या शाळा, कॉलेजमध्ये सध्या काय चालू आहे? त्याची मित्रमंडळी कोण आहेत? मोबाईल, इंटरनेटवर तो नक्की काय पाहतोय ? त्याच्या वर्तणुकीतील वेळोवेळी होणारे बदल याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे हे क्रमप्राप्त आहे. कोणतीही गोष्ट तो आई-वडिलांपाशी बोलेल एवढा मोकळेपणा या नात्यात असणे गरजेचे आहे. मुलाला त्याच्या आई-वडिलांशिवाय कोणीही इतर व्यक्ती चांगल्या रीतीने समजू शकत नाही. त्यासाठी पालकांनी आपली भूमिका चोख बजावणे गरजेचे आहे.

आपल्या पाल्यासाठी योग्य शाळा, कॉलेज निवडणे, चांगल्या मित्राचे महत्त्व त्याला सांगणे, समाजातील चांगल्या घटनांचे त्यास साक्षीदार बनविणे व वाईट प्रवृत्ती, घटनांपासून त्यास दूर ठेवणे यात पालक म्हणून आपण कशी भूमिका निभावतो यावर या इतर घटकांचा चांगला, वाईट परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो. त्यामुळे या घटकांचीदेखील खरी दोर ही पालकांच्याच हातात असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .

चांगली शाळा, कॉलेज, मित्रमंडळी, समाजातील घटक नक्कीच त्याचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यास मदत करतात. पालक आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस झटत असतात. त्याच्या भविष्याची गुंतवणूक करीत असतात. या धावपळीत, व्यस्ततेत जी मुख्य गुंतवणूक म्हणजे त्यांची मुले, यांच्याकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ शकते. पालक आपली व्यस्ततेची सबब पुढे करतात. पण जी तुमची अनमोल गुंतवणूक आहे ती मुले व्यसनी, परावलंबी, शिक्षणात पीछेहाट झालेली, गुन्हेगार प्रवृत्तीची झालेली आपल्याला परवडणार आहे का?मुलांना प्रोत्साहन देणे, अपयशामध्ये खंबीरपणे त्याच्या पाठीशी राहणे, खेळ, साहित्य, कला यामध्ये त्याचा रस निर्माण करणे. विविध स्पर्धेमध्ये त्याचा सहभाग करून घेणे, आपल्या संस्कृतीची, परंपरेची त्यास नीटशी ओळख करू देणे या सर्व कामी पालक म्हणून आपण सक्रिय असणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस मुले चुकली तर त्यास योग्य त्या वाटेवर आणणे, त्याच त्याच चुकांपासून त्यास परावृत्त करणे, आपल्या जीवनातील चांगल्या-वाईट अनुभवांचे सार त्यास देणे हे पालकाशिवाय दुसरे चांगल्या रितीने कोण करू शकेल? 

कोणतेही मूल ते लहान असो किंवा तरुण हे त्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे प्रसंगी जगाचे भविष्य असते. त्याचे योग्य ते पालनपोषण करणे, भविष्याची निगा राखणे, त्याचे एका चांगल्या व्यक्तीत रूपांतर करणे यात पालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. इतिहासातील महापुरूषांच्या जीवनावरून या गोष्टीला बळकटी प्राप्त होते. आपल्या व्यस्ततेला, धावपळीला, भविष्यातील गुंतवणुकीला, करीअरला थोडासा लगाम घालून पालकांनी आपली भूमिका काटेकोरपणे बजावली तर मुलांचे भविष्य नक्कीच उज्वल बनेल, यात कोणतीही शंका नाही.  - महेश भा. रायखेलकर(लेखक संगणक प्रशिक्षक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षण