शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पायी वारीसाठी फक्त दोन वारकऱ्यांना परवानगी, पंढरपुरात १७ ते २५ जुलैदरम्यान संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 07:45 IST

शनिवारी १७ जुलैला दुपारी दोन वाजल्यापासून ते रविवार २५ जुलैला दुपारी ४ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.

सोलापूर: आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला बसने येणाऱ्या दहा पालख्यांसोबत ४०० वारकऱ्यांना येण्याची आणि वाखरीपासून प्रतिकात्मक पायी वारी करण्यास परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्ष पायी वारी करण्यास प्रत्येकी दोन म्हणजे केवळ २० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, १७ ते २५ जुलैदरम्यान पंढरपूर शहरासह या परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. (Only two Warakaris allowed for wari, curfew in Pandharpur from 17th to 25th July)

शनिवारी १७ जुलैला दुपारी दोन वाजल्यापासून ते रविवार २५ जुलैला दुपारी ४ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. पंढरपूर शहरासह या परिसरातील भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी, आदी गावांमध्ये संपूर्ण संचारबंदी राहणार असून, अत्यावश्यक सेवांना मात्र यातून वगळण्यात आले आहे.

सर्व मानाच्या १० पालख्या १९ जुलैला वाखरी येथे दुपारी तीनपर्यंत दाखल होणार आहेत. त्यानंतर वाखरी ते इसबावी येथील विसावा मंदिर हे तीन किलोमीटरचे अंतर पायी चालण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दहा पालख्यांमधून प्रत्येकी दोन याप्रमाणे केवळ २० वारकऱ्यांनाच पायी वारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर वारकऱ्यांना मात्र बसमधूनच पंढरपूरमधील आपापल्या मठाच्या ठिकाणी रवाना व्हावे लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा११ ते २८ जुलैदरम्यान पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंदच राहील. दहा पालख्या २४ जुलैला पंढरपूरहून परतीला निघतील. २० जुलैला आषाढी एकादशी असून, यादिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाईची पूजा होणार आहे.

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूरvarkariवारकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे