शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

खडीचा नाही पत्ता.. खड्ड्यांची नाही गिनती ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:26 IST

सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था: प्रवासाचे अंतर वाढले दुप्पट-तिप्पट; खेडोपाडी-राज्य महामार्गावर हीच तºहा; नागरिक- वाहनधारकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

ठळक मुद्देपंढरपूर तालुका - इकडंबी खड्डा अन् तिकडंबी तीच स्थिती, जायचं कसं सांगाबार्शीला जोडणारा एकही रस्ता नाही धडधाकटअक्कलकोट तालुक्यात खड्डे इतके की गावात पोहोचायला लागतो तिप्पट वेळ 

सोलापूर : दळणवळणाच्या दृष्टीने राज्य-महामार्ग, खेडोपाड्यांचे रस्ते हे मुख्य श्वास म्हणून ओळखले जातात; मात्र हे केवळ कागदोपत्री आहे की काय असा प्रश्न आता गावगड्यापासून ते शहरांपर्यंत सर्वांनाच पडू लागला आहे. लालफितीच्या कारभारामध्ये रस्ता नावाच्या कामासाठी प्राधान्य द्यावे लागते हे कुणाच्याच गावी नसावे, अशी स्थिती जिल्हाभरात ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यांवर पुन्हा पुन्हा  मलमपट्टी करायची.. लाखो रुपयांचा चुराडा.. प्रत्यक्ष एका पावसातच रस्त्याची वाट लागते, अशा बोलक्या प्रतिक्रिया गावोगावच्या तरुणाईपासून वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या आजोबांपासून व्यक्त करण्यात आल्या. वर्षात एकाच मार्गावरील रस्त्यावर तीन-तीन वेळा दुरुस्ती करायची आणि बिले उचलायची अशीही तºहा असल्याचेही लोकांमध्ये कुजबुज आढळून आली. या साºया प्रकारामध्ये काही अपवाद वगळले तर खडीचा पत्ता नाही.. खड्ड्यांची तर गिनतीच नाही. अनेक ठिकाणी कधीकाळी केलेले डांबरी केव्हाच वाहून गेल्याचे चित्र दिसून आले. 

पंढरपूर तालुका - इकडंबी खड्डा अन् तिकडंबी तीच स्थिती, जायचं कसं सांगापंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रोज हजारोंच्या संख्येने भाविकांची ये-जा असते़ मात्र शहराला जोडणारे रस्ते खड्डेमय बनले आहेत़ वाखरी परिसरात एक दुचाकीस्वार खड्डा चुकविताना गाडीवरून पडला़ त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘अहो साहेब, इकडंबी खड्डा अन् तिकडंबी तीच स्थिती, जायचं कसं सांगा’ असा सवाल केला़ या नागमोडी वळणे घेण्याच्या नादात गाडी घसरून पडल्याचे त्यांनी सांगितले़

बार्शीला जोडणारा एकही रस्ता नाही धडधाकटबार्शी : मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या बार्शी शहरातून सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, परांडा, भूम, मोहोळ या चारही दिशेला जाणाºया राज्य, जिल्हा व ग्रामीण मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. या सर्वच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे हे अंतर काटण्यासाठी तिप्पट वेळ लागत आहे़ तसेच वाहनधारकांना वाहन चालवताना देखील कसरत करावी लागत आहे़ या प्रकारामुळे गावोगावच्या नागरिकांपासून वाहनधारक वैतागले आहेत. बार्शी हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी एक व्यापारीपेठ आहे. शहरात नेहमीच वाहनांची सतत वर्दळ असते़ शहरातील रस्ते तर भुयारी गटारी योजनेच्या कामांमुळे खराब झालेच आहेत; मात्र बार्शी शहरात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी केवळ लातूर-कुर्डूवाडी हा राज्यमार्ग सोडला तर एकही रस्ता सुस्थितीत नाही़ मागील वर्षी या रस्त्याचे काम झाल्यामुळे तो चांगला आहे़ 

अक्कलकोट तालुक्यात खड्डे इतके की गावात पोहोचायला लागतो तिप्पट वेळ अक्कलकोट :  तालुक्यात बोटावर मोजण्याइतकेच रस्ते चांगले आहेत.  बहुतांश रस्ते अर्थात तालुक्यातील एकूण ३०० किलोमीटर रस्ते अत्यंत खराब झाले आहेत़ जीवनवाहिनी समजल्या जाणाºया रस्त्यांची चांगलीच वाट लागली आहे. यामुळे दळणवळणाचे प्रमाण घटले आहे़ तडवळसह इतर भागात जैसे थे स्थिती आहे़ मागील ७ वर्षांत या रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. या खराब रस्त्यांकडे लोकप्रतिनिधी ना अधिकारी कोणीच वाली राहिलेला नसल्याची खंत तालुकावासीयातून व्यक्त होत आहे.

करमाळा - वर्षातून झाली तीनवेळा रस्त्याची डागडुजीकरमाळा : परतीच्या पावसाने अहमदनगर-टेंभुर्णी राज्यमार्गावरील कंदर ते जातेगाव व करमाळा ते पुणे मार्गावर वीटदरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षभरात तीन वेळा रस्त्याच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करूनसुध्दा रस्त्यावर खड्डे कसे काय पडतात, असा सवाल नागरिकांसह वाहनचालकांमधून होत आहे.  अहमदनगर ते जातेगावपर्यंतचा संपूर्ण ७५ कि.मी.च्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. साईडपट्ट्या उखडल्या आहेत. अहमदनगरहून करमाळ्यास येण्यासाठी चांगला रस्ता असताना दीड तास वेळ लागायचा, पण आता खड्ड्यांमुळे तीन तास लागत आहेत. 

माढा - टाकला मुरुम बुजवले खड्डे ; खेड्यांना जोडणाºया रस्त्यांची लागली वाट

कुर्डूवाडी : पडलेल्या परतीच्या पावसामुळे माढा तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे़ रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते आहे़ शहरांना जोडणारे काही मुख्य मार्ग वगळता खेड्यांना जोडणारे बहुतांश मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत त्यांची वाट लागली आहे. दुरुस्तीसाठी बांधकाम खात्याने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकbarshi-acबार्शीkarmala-acकरमाळाmadha-acमाढाpandharpur-acपंढरपूर